Saturday, October 25, 2008

ठाकरे की Thackeray - २

रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय उमेदवारांना मुंबईत मारहाण केली गेली. या उमेदवारांची काय चूक होती? नोकरीच्या आशेने ते जेथे बोलवले तेथे आले होते.
जर मराठी वृत्तपत्रांत खरोखरच जाहिरात आली नसेल तर चूक असलीच तर ती रेल्वे बोर्डाचीच होती. या उमेदवारांची त्यात काय चूक होती? रेल्वे बोर्डाच्या यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याला गाठून जाब विचारण्याऐवजी या उमेदवारांनाच मारहाण करणे सुसंस्कृत (sorry, राज ठाकरे आणि त्यांच्या सेनेकडून
सुसंस्कृतपणाची अपेक्षा जरा जास्तच आहे) माणसाला लज्जास्पद नाही का? विचार करा, असाच प्रकार आपल्या मुलाबाबत परप्रांतात झाला तर? आपल्याच बस जाळणे म्हणजे मराठी माणसाचेच नुकसान नाही का? http://www.mumbaimirror.com/net/mmpaper.aspx?page=article&sectid=15&contentid=2008102220081022034449255edf6f445
त्या दिवशी बांद्रे न्यायालयात ज्यांच्या केस होत्या त्यांचे किती हाल झाले ते त्यांनाच माहीत! इतरांनाही इस्पितळात जाता/नेता न आल्याने, महत्त्वाच्या कामाला बाहेर न पडता आल्याने कितीकांना गैरसोय सहन करावी लागली. राष्ट्रीय संपत्तीचे जाळपोळीने किती नुकसान झाले! कामाचे तास किती वाया गेले! पण ’राज’ सैनिकांना त्याचे काय? त्यांचा या कश्यासीही काही घेणे देणे नाही.

आजकाल या दंगलखोरांची एक नविनच जमात तयार झालीय. कालच माझ्या आत्याशी बोलत असताना दोन आठवड्यापुर्वी झालेल्या दंगलीबद्द्ल चर्चा चालू होती. त्यावेळी तिने जे काही सांगितले त्यावर विश्वास ठेवणे खरच खुप कठीण आहे. आत्यचा देवपूर (धुळे) मधील दुकानाशेजरील दोन दुकाने फक्त लूटण्यासाठी फोडण्यात आली. संपुर्ण दुकान लुटून खाली झाल्यानंतर पेटवून देण्यात आले. मुंबईतील दंग्यानंतर असे काही झाल्याचे ऎकिवात आले नसले तरी झाले नसेलच असे नाही

to be contd ....

Friday, October 24, 2008

Black and White

This poem was nominated for the best poem for 2005. (Don't know if it is true but the poem is what matters)

Written by an African kid –

“When I born, I black.

When I grow up, I black.

When I go in sun, I black.

When I scared, I black.

When I sick, I black.

And when I die, I still black.


And you white fella …

When you born, you pink.

When you grow up, you white.

When you go in sun, you red.

When you cold, you blue.

When you scared, you yellow.

When you sick, you green.

And when you die, you grey …

And you calling me colored ??”

Thursday, October 23, 2008

ठाकरे की Thackeray !

मराठी माणसाच्या अस्मितेसाठी पेटुन ऊठया-या (की फक्त लोकांना पेटवण्या-या) राज ठाकरेंना खरोखरच मराठी भाषेविशयी, मराठी माणसांविषयी प्रेम आहे का
१. राज ठाकरे स्वतःचे नाव इंग्रजी भाषेत Thackeray असे का लिहीतात ? खरेतर ठाकरे हे इंग्रजीत लिहीतांना Thakare or Thakre असे लिहायला हवे. पण आंग्ल भाषेतून शिकल्येल्या राज यांना हे कधीच जाणवले नसनार कारण की त्यांच्या लेखी ठाकरे is similar to William Makepeace Thackeray, the author of Vanity Fair. Not only does Thackeray use the anglicised spelling, he even pronounces it like the English author, who, as far as I know, was not a Marathi manoos.
२. भाषेकडून आता दुस-या मुद्याकडे वळू.
अ. राज यांचा बचाव करन-या वकीलांमधे एक वकील ऊत्तर भारतीय (भैय्या) आहे. आता एका दिवसासाठी परिक्षेसा्ठी येणा-या विद्यार्थ्यांना देखिल पिटाळूण लावण्या-या ’राज’सैनिकांची अखिलेश चौबेंवर का मेहेर नजर?
ब. राज यांची मूले Bombay Scottish School मध्ये शिकलीत. कृपया लक्ष द्या: Bombay; Mumbai नव्हे. त्यावेळी त्यांना Bombay चे Mumbai करण्यात काय अडचण होती
क. जनतेत प्रक्षोभक भाषणे देणारे राज ठाकरे कोर्टात गप्प का (read source: in.rediff.com/news/2008/oct/21raj10.htm)? त्यांना आपले विचार कोर्टाला पटवून द्यावेशे नाही वाटले?

to be continued

Forgiveness: by Tao

One day, the sage gave the disciple an empty sack and a basket of potatoes. "Think of all the people who have done or said something against you in the recent past, especially those you cannot forgive.

For each of them, inscribe the name on a potato and put it in the sack."

The disciple came up quite a few names, and soon his sack was heavy with potatoes.

"Carry the sack with you wherever you go for a week," said the sage. "We'll talk after that."

At first, the disciple thought nothing of it. Carrying the sack was not particularly difficult. But after a while, it became more of a burden. It sometimes got in the way, and it seemed to require more effort to carry as time went on, even though its weight remained the same.

After a few days, the sack began to smell. The carved potatoes gave off a ripe odor. Not only were they increasingly inconvenient to carry around, they were also becoming rather unpleasant.

Finally, the week was over. The sage summoned the disciple. "Any thoughts about all this?"

"Yes, Master," the disciple replied. "When we are unable to forgive others, we carry negative feelings with us everywhere, much like these potatoes. That negativity becomes a burden to us and, after a while, it festers."

"Yes, that is exactly what happens when one holds a grudge. So, how can we lighten the load?"

"We must strive to forgive."

"Forgiving someone is the equivalent of removing the corresponding potato from the sack. How many of your transgressors are you able to forgive?"

"I've thought about it quite a bit, Master," the disciple said. "It required much effort, but I have decided to forgive all of them."

"Very well, we can remove all the potatoes. Were there any more people who transgressed against you this last week?"

The disciple thought for a while and admitted there were. Then he felt panic when he realized his empty sack was about to get filled up again.

"Master," he asked, "if we continue like this, wouldn't there always be potatoes in the sack week after week?"

"Yes, as long as people speak or act against you in some way, you will always have potatoes."

"But Master, we can never control what others do. So what good is the Tao in this case?"

"We're not at the realm of the Tao yet. Everything we have talked about so far is the conventional approach to forgiveness. It is the same thing that many philosophies and most religions preach - we must constantly strive to forgive, for it is an important virtue. This is not the Tao because there is no striving in the Tao."

"Then what is the Tao, Master?"

"You can figure it out. If the potatoes are negative feelings, then what is the sack?"

"The sack is... That which allows me to hold on to the negativity. It is something within us that makes us dwell on feeling offended.... Ah, it is my inflated sense of self-importance. "

"And what will happen if you let go of it?"

"Then... The things that people do or say against me no longer seem like such a major issue."

"In that case, you won't have any names to inscribe on potatoes. That means no more weight to carry around, and no more bad smells.

The Tao of forgiveness is the conscious decision to not just to remove some potatoes... But to relinquish the entire sack."

Tuesday, October 21, 2008

तीन कविता - कुसुमाग्रज

॥ प्रेम ॥
प्रेम कुणावर करावं
कुणावरही करावं

कारण प्रेम आहे
माणसाच्या संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि भविष्यकाळातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव !


॥ नाते ॥
नात्यास आपुल्या नाव देऊ नकोस काही ।
सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही ॥

व्यवहार कोविंदांचा होईल रोष होवो ।
व्याख्येतूनच त्यांची प्रद्ण्या वाहात जाई ॥

ना तालराग यांच्या बंधात बांधलेला ।
स्वरमेघ मंजूळांचा बरसे दिशात दाही ॥

गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा ।
मंझिलकी जयाची तारांगणात राही ॥


॥ स्मृती ॥
नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुल केंव्हा
त्या माजघरातील मंद दिव्याची वात

वा-यावर येथील रातराणी ही धुंद
टाकता उसासे चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केंव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमंत इमारतींचाच थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केंव्हा
तो नदीकिनारा अन भंगला घाट

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नुपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केंव्हा
तू आर्त मला ऎकविलास जो अभंग

लावण्यवतींचा लालस येथ निवास
मदिरेत माणकपरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुल केंव्हा
ते उदास डोळे त्यातिल करुण विलास

Monday, October 13, 2008

माणसे अरभाट आणि चिल्लर

<जी ए. कुलकर्णी>

<माणसे अरभाट आणि चिल्लर><विष्णू गजानन परचुरे>



एकूण पाने :- 18

FROM 9 TO 26

पान नं:- 9

+

आता यापुढे इंग्रजी शाळेत जायचे म्हणताच मी अगदी हादरून गेलो होतो,

पण तरी त्याबद्दल उतावीळ देखील झालो होतो. आधीची

म्युनिसिपालिटीची शाळा अगदी अंगवळणी पडून गेली होती, आणि शाळा

म्हटले की परूळेकर मास्तरांखेरीज कुणीच डोळ्यांसमोर येत नसे.

ऊनपाऊस असो अगर नसो, परूळेकर मास्तर नेहमी छत्री वापरत व वर्गात

आल्यावर ती ते फळ्याजवळच्या कोपऱ्यात ठेवत. ती मनाप्रमाणे व्यवस्थित

ठेवण्यास त्यांना बक्कळ पाच मिनिटे लागत. अगदी लहान पोरांखेरीज

सारेच जण ज्याला लक्कड म्हणत तो लखू तोपर्यंत फळा पुसून ठेवत असे,

व खडूची पूड भरलेले फडके त्याचा विशेष राग असलेल्या पोरांच्या

तोंडासमोर फडफडवत असे. मग तीन-चार उदाहरणे होत. त्यानंतर

कविता सगळ्यांनी मिळून म्हणायच्या असत. त्या वेळी काही पोरे तोंड

उंघडे ठेवून शुंभासारखी उभी राहत, किंवा उगाचच तोंड हलवत. नंतर

मास्तर महादेव कणेरीला बोलावत. साऱ्या वर्गाला शुध्दलेखन घालायला

सांगत. ते स्वतः बाहेर जात, आणि चहा घेऊ परत आल्यावर खुर्चीत

बसल्या बसल्या डुलक्या घेऊ लागत.



आमच्या वर्गात आठदहा पोरांचा एक फर्मास घोळका होता. ते सगळे जण

जमिनीवर रेघोटया मांडून चिंचोक्याचा खेळ खेळत. आंब्याच्या दिवसांत

केऱ्यां-मीठ खायची हीच वेळ असे. पुष्कळदा समोरील बिगर इयत्तेतील

छोटया पोरांना खिडकीतून खडे मारायची गंमत करण्याची हीच वेळ होती.

वर्गात अगदी दाराशीच नामदेव खटावकर बसे. त्याच्याजवळ एक मोठी.

छडी होती. हेडमास्तर जिना चढून वर येणार असे दिसले की, तो छडी

जोराने कपाटावर हाणू लागे. परूळेकर जागे होत व लगबगीने फळ्याजवळ

जाऊन उभे राहत आणि काही तरी नाटकी लिहू लागत. सगळे चिंचोके,

बसण्यासाठी फळ्या घातलेल्या असत, त्याखाली जात. हेडमास्तर येऊन

गेले की मग आमचे सारे लक्ष घंटेकडे असे. हेडमास्तर आपले घडयाळ

घरी तरी विसरत, किंवा ते बंद तरी पडलेले असे. म्हणून ते निंगू पाटलाला

कोपऱ्यावरच्या शेटजींच्या दुकानात वेळ पाहून यायला सांगत परत

आल्यावर निंगू हटकून दहाबारा मिनेटे जास्तच सांगे. पण मास्तरांना घरी



पान 10



जायची घाई असली तर ते त्याच्यावर खेकसत, ""जा पुन्हा बघून ये पोस्टात

जाऊन. शेटजीचे घडयाळ मालकाप्रमाणेच नुसते बूड ओढणारे आहे."" निंगू

धावत जाऊन पाहून येई, आणखी पाच-सात मिनिटे वाढवून सांगे आणि

मग पितळी तबकडीवर लाकडी हातोडा दणादणा बडवू लागे. यापेक्षा शाळा

काही निराळी असते याची आम्हांला कल्पनाच नव्हती.



इंग्रजी शाळेविषयी आम्हांला पहिली जबरदस्त माहिती मिळाली, ती म्हणजे

वर्गाला सर्वच विषयांना एकच मास्तर नसतात. दर तासाला नवे मास्तर

भूगोलाचे निराळे, मराठीचे निराळे. त्याशिवाय बसायला पुढे डेस्क

असलेली बाके अगर लांब जोडलेल्या खुर्च्या असतात. मी फर्स्ट `बी' मध्ये

गेलो. त्या वेळी बरीच पोरे आधीच वर्गात येऊन बसली होती. मी आणि

परशुराम खुर्च्यावर बसलो, पण त्यांच्या अगदी अरूंद फळ्यांवर आम्हांला

बसता येईना. आम्ही तसाच तोल सावरत कळ काढली. पुढल्या तासात

देशपांडे मास्तर आले. आम्हांला पाहताच ते समोर येऊन उभे राहिले व

कमरेवर हात ठेवून आम्ही बेडूक असल्याप्रमाणे आमच्याकडे पाहू लागले.

ते म्हणाले,""अहो, सिंहासनवाले, खुर्चीवर सरळ बसता येत नाही की काय

तुम्हा विक्रम राजांना ?"" त्यावर सगळी पोरे फिसकल्याप्रमाणे हसू लागली.

मग एकाने सांगितले,""अरे खुर्चीची फळी खाली टाक नि मग बस.""

आमच्या खुर्च्या घडीच्या होत्या. आम्ही अगदी ओशाळून गेलो.



मला वाटले होते, मी इंग्रजी शाळेत गेल्यावर आमच्या वर्गाला दातार

मास्तर येतील. ते आमच्या घरापासून आठदहा घरेच सोडून राहत.

आमच्या घरी त्यांची चांगली ओळख होती. पुष्कळदा आजोबा करंदीकर

आणि अप्पा काळे आले की आमच्या घरी त्यांच्या तास न्् तास गप्पा चालत.

व दादा त्यांना अर्ध्या अर्ध्या तासाने चहा विचारत. पण मी आतून चहा

आणून त्यांच्यासमोर ठेवला की, तेथून माझी हकालपट्टी होत असे. पण

मास्तर सकाळी शाळेत जायला सायकलीवरून निघाले की आम्ही

पाच-सात पोरे त्यांच्या मागोमाग जात असू. मास्तर कधी सरळ सीटवर

बसत नसत. रस्ता थोडा चढ असल्यामुळे पिनवर पाय ठेवून ते उड्या

मारत मारत जात व मग मध्येच उंच होऊन एखादी शिकार पकडावी

त्याप्रमाणे सीट पकडत, आणि त्या वेळी चावट पोरे टाळ्या वाजवत.

मास्तर निदान अर्धी गल्ली तरी अशा उड्या मारतच पार करत. दादा तर

म्हणायचे,""हा किटू अशाच उडया मारत आणखी थोडा पुढे गेला की



पान नं. 11

शाळेतच जाऊन पोहोचेल. मग सीटवर बसण्याची गरजच राहणार नाही.""



दातार मास्तरांमुळे तर दादांनी ही शाळा माझ्यासाठी निवडली होती. पण

पहिल्या तीन-चार वर्षांत मास्तर आमच्या वर्गाला आलेच नाहीत. कधी तरी

भूगोल अथवा शास्त्र असल्या विषयाच्या बदली तासाला येत. पण मग ते

आम्हांला काही तरी लिहायला सांगत इतकेच.



मास्तरांच्या स्वतःच्या शिक्षणाची झालेली परवड आम्हा सगळ्यांना माहीत

होती. शाळेत वार्षिक परीक्षा आली की, आई किंवा वडील हटकून आजारी

पडत व औषधपाण्यातच त्यांचे वर्ष फुकट जात असे. आपल्या हयातीतच

मास्तरांनी बी.ए. व्हावे अशी त्यांच्या वडिलांची फार इच्छा होती. पण ते

मात्र घडले नाही. नंतर बऱ्याच वर्षांनी हिंदी विषय घेऊन बनारसला जाऊन

मास्तर बी.ए. झाले व मोठया कष्टाने मिळवून टिकवून धरलेली त्यांची

नोकरी सुसूत्र झाली. ""तुमचे पेपर कले गेले ?"" असे अनेकदा मास्तर

विद्यार्थ्यांना विचारतात, पण खुद्द मास्तरांनाच तसे विचारण्याची संधी

आम्हांला मिळाली. आम्ही तसे विचारले तर दातार मास्तर हसून म्हणत,

""कसे गेले म्हणजे काय ? गेले एका लहान पेटाऱ्यांतून !"" ते पास झाले हे

समजताच आम्ही गोंगाट करून त्यांच्याकडे पेढे मागू लागलो. एरव्ही

मास्तरांनी म्हटले असते, "" आता जर आवाज कराल तर भोपळ्यांनो, तुम्हा

सगळ्यांनाच पाठवीन प्रिन्सिपालकडे. तेथे मग मिळतील वाट्टेल तेवढे पेढे !""



पण त्या दिवशी मासतरांचे मन ठीक दिसत नव्हते. त्यांनी खिशातून

हातरूमाल काढला, पण तो तपकीर पुसण्यासाठी नव्हे. तपकिरीचा

हातरूमाल वेगळा होता. हा छोटा व स्वच्छ होता. ते खिडकीपाशी गेले व

आमच्याकडे पाठ करून डोळे टिपून परतले. तरी सुध्दा त्यांचे डोळे

अद्याप नानू बापटाप्रमाणे ओले होते. मग मात्र आम्ही खाडकन गप्प झालो

व काही तरी वाचण्याचे ढोंग करू लागलो.



आमच्यापेकी काही जणांना मास्तरांचा एक विशेष जबरदस्त वाटे. दुसऱ्या

शाळेतील आमचे दोस्त भेटले की आम्ही ती गोष्ट पुन्हा पुन्हा त्यांच्या

नजरेस आणत होतो. पुसत्कावर किंवा पुस्तकात कुठे तरी ज्याचे नाव

छापलेले आहे, तो लेखक मेलेलाच असतो, अशी समजूत करून घेण्याचे

ते वय. पण मास्तरांमुळे बोलणारा चालणारा असा एक लेखक प्रत्यक्ष



पान नं. 12

पाहण्याचा अनुभव आम्हांला मिळाला होता. दातार मास्तर म्हणजे न

दुखवता हळूच कान पिरगळणारे, किंवा ""अरे भोपळ्या !"" म्हणत

बिनशिंगाचा राग दाखवणारे नुसते मास्तर नव्हते. मास्तर लेखक व कवी

होते. त्यांचे चार-सहा लेख आणि बऱ्याच कविता प्रसिध्द झाल्या होत्या. ते

लेख किंवा त्या कविता मला कधी पाहायला मिळाल्या नाहीत, पण आपल्या

एका छोटया नाटकाची प्रत मात्र त्यांनी मला दिली होती. देह-घर नावाच्या

घरात अनेक आगंतुक माणसे घुसून राहिली होती. एकाचे नाव होते खादाड.

तो सदोदित काही खात असे. दुसरा एक जण होता त्याचे नाव होते आळशी

व तो नेहमी जांभया देत असे. आणखी एक जण झोपाळू नावाचा होता तो

नेहमी झोपून आडवा पडलेला असे, त्यामुळे त्याला नाटकात फारशी

भाषणे नव्हतीच. अशीच आणखी थोडी माणसे त्या घरात राहत होती. एक

दिवस त्या घराचा मालक उद्योगराव येतो व छडीने बडवत सगळ्यांना

हाकलून घालतो, आणि मग घर सुखाने शोभू लागते. या नाटाकाच्या

जोडीला मास्तरांनी सुबोध रामायण देखील लिहिले होते व त्यात त्यांची

स्वतःची पाच चित्रे छापली होती. त्यांनी लिहिलेल्या दोन गाण्यांची तबकडी

सुध्दा निघाली होती. ती गाणी त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या मालती

जांभेकरने म्हटली होती. त्या काळी रेकॉर्ड निघणे किंवा रेडिओवर कार्यक्रम

मिळणे ही गोष्ट फार दुर्मिळ व डोळे दिपवणारी होती. आज रेडिओ आर्टिस्ट

पेशाला मण भेटतात.



मालती जांभेकरचा एक कार्यक्रम रेडिओवर झाला म्हणून सुनंदा कामत

तर आपल्या खोलीत बसून तेथेच चहा-जेवण मागवू लागली, आणि

महिनाभर आपल्या जुन्या मेत्रिणींशी बोलली नाही. जांभेकरांना सगळ्या

मुलीच होत्या व गल्लीत सारे जण त्यांना ""हाच मुलींचा बाप"" म्हणत.

मालती ही त्यांची सर्वांत थोरली मुलगी. ती स्वभावाने मुळातच थोडी जादा

होती. आपणाला इतरांपेक्षा निराळी हवा श्वासोच्छ्वासासाठी लागते हे

दाखवण्यासाठी ती नेहमी नाक वर करून चाले. आकाशाला नाक

लावण्याची जर एखादी स्पर्धा असती तर मालतीला कायम बक्षीस मिळत

गेले असते ! पण या साऱ्याबद्दल आमचा तिच्यावर काहीच राग नव्हता. एक

तर की आमच्यापेक्षा सात-आठ वर्षांनी मोठी होती,आणि तिला तो तोरा

थोडा शोभूनच दिसे. तिचा आवाज साखरपाकाच्या तारेसारखा होता आणि

ती समोरून गेली की एखादा छबिना गेल्याप्रमाणे वाटे. शिवाय ती



पान नं. 13

खरोखरच बुध्दिमान होती.नंतरच्या आयुष्यात तिने सगळ्या परीक्षांत

फटाफट फर्स्टक्लास मिळवले, आण ती पुण्याच्या एका कॉलेजात

प्रोफेसर झाली. बोटावर मोजण्याइतकीच कॉलेजे असताना त्यांतील

एखाद्या खानदानी कॉलेजात प्राध्यापक होणे हे छाती दडपून

टाकण्याइतकेच यश होते. त्या वेळी आनंदाने व्याकुळ झालेल्या

जांभेकरांचा चेहरा मला आज देखील आठवतो. स्वतः मँट्रिकपलीकडे जाऊ

न शकलेल्या या माणसाचे पाय जमिनीवर ठरेनात. या वेळी त्याने घरी

जाऊन काय वाटले असेल -पेढे ? छट््. त्यांनी गल्लीतील प्रत्येक घरात

वाळ्याची एकेक लहान जुडी नेऊन दिली. यापेक्षा मूठभर दुर्वा देणे कमी

खर्चाचे झाले असते अशी काही जणांनी त्यांची थट्टा केली. एकाने तर

नारळाची शेंडी घरोघरी वाटणे हाच उत्तम मार्ग ठरला असता, असे सुध्दा

सांगितले. कळवळलेल्या चेहऱ्याने जांभेकर आमच्या घरी आले व थोडा

वेळ दादांबरोबर बोलत थांबले. ते फार खजील झाले होते. तरी ते शांतपणे

म्हणाले,""भिजून भिजून वाळा सुगंधी व्हावा, आणि देऊन देऊन

प्राध्यापकाने श्रीमंत व्हावे."" मालतीने नंतर तीन-चार पुस्तके देखील

लिहिली, पण ती नंतरची गोष्ट आहे.



आता एक लेखक, कवी व नाटकार म्हणून दातार मास्तरांविषयी

आम्हांला उदंड अभिमान होता, व पुस्तकावर असलेले त्यांचे छापील नाव

पाहून आम्हांला फार हेवा सुध्दा वाटे.



पहिली तीन वर्षे कशी गेली कोणास ठाऊक ! पण प्रत्येक वर्षी दोन-तीनदा

तरी वर्गातून बाहेर जावे लागले, हे मात्र मला आठवते. सडेकर मास्तर

मराठी घेत व निबंध लिहायला सांगत. त्यांचे विषय चांगलेच ऐसपेस असत.

आणि त्यांचा संबंध सगळ्या जगाशी किंवा बाजार उतरला तरी निदान

अखिल भारताशी असे. भारतातील बेकारी कशी नाहीशी होईल ? युध्दे

कशी थांबतील ? देशभक्ती इत्यादी. त्यांचे सगळेच विषय आमच्या

आवाक्याबाहेर असत व त्यांच्याविषयी आम्हांला काहीच आवड वाटत नसे.

आज चाळीस-पन्नास वर्षांनंतर देखील जगातील युध्दे थांबवण्याचा मार्ग

मला मिळालेला नाही. आमच्या शेजारच्या पांगळ्या मधुकरला त्याला कुठे

खेळायला जाता येत नाही, म्हणून त्याच्या वडिलांनी एक छोटा कुत्रा आणून

दिला. तो एकदा उंबऱ्याबाहेर गेला. मधू पुढे सरकून त्याला आवारायच्या

आत तो रस्त्यावर गेला व एका सारवटाखाली सापडून चिरडून गेला.



पान नं. 14

आमचा पोपट एकदा मांजराने मारला. याविषयी लिहायला मला आवडले

असते. एकदा भीत भीत मी सडेकर मास्तरांना विचारले. तेव्हा ते खेकसून

म्हणाले, ""तुझ्या पोपटाची हकीकत ऐकायला सारं जग वाट पाहत आहे

असा कोण लागून गेला आहेस रे तू दीड बाजीराव ?"" ते ऐकून प्रभाकर,

तातू सामंत, नानू बापट यांनी तोंडे घट्ट मिटून ठेवली. प्रभाकरला त्याच्या

घराजवळ असलेल्या सात चिंचांच्या झाडांविषयी लिहायचे होते. मुद्दाम

लावल्याप्रमाणे ती गोलाकार रेषेत वाढली होती. अनेकदा मी प्रभाकरबरोबर

त्यांच्या त्या गर्द सावलीत जाऊन बसत असे. तेथील सावली देखील

किंचित हिरवट दिसायची व तिला चिंचेच्या कोवळ्या पानांची, फुलांची चव

आहे असे वाटून जीभ शिवशिवू लागे. तेथे गेल्यावर काही करावे, खेळावे,

बोलावे असे वाटतच नसे. नुसते बसावे अगर आभाळावर चिंचपानी नकशी

पाहत अंग पसरावे असे वाटे. प्रभाकरचे वडिल हातभर उंच होते तेव्हा

देखील ही झाडे अशीच खानदानी आणि पोक्त दिसायची असे ते सांगत.

मग काय झाले कुणास ठाऊक ? म्युनिसिपालिटीने ती झाडे तोडून त्या

ठिकाणी दवाखाना बांधण्याचे ठरवले. मग प्रभाकरने आईकडून छोटे नेवेद्या

करून घेतले व प्रत्येक झाडापुढे ठेवले. त्याचे आईवडिल रात्री त्या ठिकाणी

गेले व तेथे एक पणती लावून परतले. रात्रभर आईच्या डोळ्यांतले पाणी

थांबले नाही. झाडावर पहिली कुऱ्हाड पडण्याच्या आधीच प्रभाकरच्या

वडिलांनी ते घर सोडले व ते किल्ल्यात राहायला गेले. तातू सामंतला

आपल्या थोरल्या भावाविषयी लिहायचे होते. त्याने त्या भावाला पाहिले

सुद्दा नव्हते, कारण त्याच्या जन्माआधीच तो वारला होता. पण त्याची आई

त्याला त्याच्याविषयी सतत सांगत असे. तिने त्याचे जुने कपडे, त्याची

पाटी, त्याचा भोवरा-सारे अगदी जपून ठेवले होते. नानू बापट देखील

मधून मधून आमच्याच येऊन बसत असे. पण तो सतत कुठल्या तरी एका

नदीविषयीच बोलत असे, त्यामुळे आम्हांला फार कंटाळा येई. त्याच्या गावी

एक नदी होती. तिच्याकडे पाहत काठावरच्या एका दगडावर बसले की

तिच्या पाण्याबरोबर आपण सुध्दा वाहत जात आहो, नव्या प्रांतात, देशांत

चाललो आहो, असे त्याला वाटे. एकदा तर तो नदीबरोबर इंग्लंडला देखील

गेला होता म्हणे. पण एकदा काही तरी विलक्षण घडले. नदीवर ऊन पडले

की पाण्यात झगझगीत जरीतुकडे दिसत. एकदा ते सगळे एकदम डोळे

झाले व नानूकडे रोखून पाहू लागले. तो घाबरून उठला तेव्हा कुणी तरी

मोठयाने हसले. ते सांगत असताना देखील नानू भेदरायचा. शेवटी हटकून



पान नं. 15

त्याचा प्रश्न असे, ""कोण हसले असेल त्या वेळी ?""



एकदा सडेकर मास्तरांनी निबंधाला विषय दिला : ""प्रयत्न वाळूचे कण

रगडिता ... "" रात्री उशीरापर्यंत जागून मी निबंध लिहिला. प्रयत्न केला तर

सारे काही साध्य होते, प्रयत्न हाच परमेश्वर; `उद्योगाच्या घरी ऋध्दी सिध्दी

पाणी भरी '... इत्यादी, औषधाच्या बाटलीबरोबर: माहितीचा कागद असतो,

त्याप्रमाणे या विषयाबाबतचे हे नेहमीचे भरण अगदी मराठी चौथीपासून

आमच्या जवळ तयार असे. त्याच विषयावर आम्ही दोनदा लिहिले

देखील होते. परंतु या खेपेला माझे मनच उफराटे झाले होते की काय कुणास

ठाऊक, या खेपेला मी एक वेगळाच निबंध लिहिला : ""प्रयत्ने वाळूचे

कण -"" या ओळीचा अर्थ प्रयत्नाने सारे काही साध्य होते, असा मुळीच

नाही. माणूस जन्मभर जरी रगडत बसला तरी वाळूच्या कणांवर थेंबभर

देखील तेल गळणार नाही. या ठिकाणी कवी पूर्णपणे अशक्य अशा गोष्टींची

उदाहरणे देत आहे. मृगजळाने तहानेलेल्या माणसाची (एखाद्या वेळी)

तहान भागेल, रानात सशाचे शिंग सापडू शकेल, वाळूच्या कणांतून तेलाचा

थेंब गळू शकेल, पण मूर्खाचे ह्दय मात्र कधीही धरता येणार नाही. म्हणून

ही ओळ प्रयत्नांची स्तुती करणारी मुळीच नाही. कुणी तरी असला खुळचट

अर्थ डोक्यात घेतला व त्याची परंपरा होऊन बसली. एखाद्या पुजाऱ्याला

पूजा करताना शिंक यावी व ते पाहून पूजेच्या सुरूवातीला शिंकलेच पाहिजे

असा क्रम निर्माण व्हावा, तसे या ओळीबद्दल झाले आहे.""



मास्तरांनी छद्मी आवाजात माझा निबंध वर्गात वाचून दाखवला. पोरे

फिदीफिदी हसली. ते म्हणाले,""जादा शहाणपणा दाखवू नको. निबंध पुन्हा

लिहून आण आणि आता येथून चालता हो."" त्यांनी मला वर्गाबाहेर घालवले.

निबंधाची वही घेण्याची तसदी देखील त्यांनी वाचविली, कारण मी

वर्गाबाहेर पडल्यावर त्यांनी ती वही फर्रदिशी बाहेर फेकली. बऱ्याच

उशीरापर्यंत जागून लिहिलेल्या त्या निबंधाबद्दल मी घरी मात्र काही

बोललो नाही.



पण मला नेहमी नवल वाटायचे ते एका गोष्टीचे. दिवेकर तिसरीत दोनदा

नापास झाला होता. जाधव गणितात उत्तम होता, पण त्याला इंग्रजी येत

नसे. त्या दोघांचे होमवर्क अनेकदा मीच करून देत असे. पण निबंधात मात्र

त्यांना नेहमी दहापेकी आठ-नऊ मार्क पडत. एक दिवस मी रागारागाने



पान नं. 16

त्यांना विचारले, तर ते एकमेकांना ढकलत हसतच राहिले. मग दिवेकर

म्हणाला, ""तू माझा जिगरी दोस्त म्हणून सांगतो. यातली ग्नानबाची मेख

अशी आहे बघ. माझ्याकडे दोन वर्षांच्या जुन्या वह्या आहेत. जाधवचे दोन

भाऊ येथेच शिकून गेले. त्यांच्या वह्या त्याच्याजवळ आहेत. सडेकर

मास्तरांचे सहा-सात विषय ठरलेले असतात, भारतातील बेकारी, युध्दे

कशी थांबतील, दारूबंदी, प्रयत्ने वाळूचे, जातिभेद, खेडयातील जीवन. दर

खेपेला आम्ही तेच जुने निबंध उतरून काढतो. मास्तर कधी तरी दोनचार

वह्या पाहतात, आणि बाकीच्या वह्या त्यांची बायको तपासते. म्हमून आम्ही

आमच्या निबंधावर दहापेकी आठ किंवा नऊ मार्क सुध्दा लिहून ठेवतो.

मास्तरांना वाटते, बायकोने आधीच मार्क दिले आहेत, तर बायकोला वाटते,

मासत्रांनी या वह्या आधीच तपासलेल्या आहेत. आता बघ पुढल्या खेपेला

देशभक्ती हा विषय येतो की नाही ते !""



पण दिवेकराचा अंदाज चुकला. मास्तरांनी यो खेपेला खेडयांतील जीवन

हा विषय दिला आणि या खेपेला दिवेकर-जाधव यांच्या जोडीला माझी

देखील तिसरी मोट कुरकुर आवाज करत चालू लागली, व आमच्या

सगळ्यांना गोठयांतून गाई-वासरे हंबरू लागली.



भूगोलाला कुलकर्णी मास्तर होते. त्यांनी देखील एकदा मला वर्गातून

हाकलले. ते अतिशय नाकातून बोलत. आमचा एक महिना तोंड गच्च दाबून

धरून त्यांच्या बोलण्याची सवय करून घेण्यातच गेला. पण ते काय

सांगतात हे ऐकण्याऐवजी ते कसे सांगतात हे पाहण्याची वृत्ती मात्र गेली

नाही. आमच्या वर्गाला अगदी दरवाज्यापासून दुसऱ्या भितींपर्यंत मोठा

सिमेंट बोर्ड होता. एकदा ते दरवाज्याजवळ उभे राहिले व हात जोडून त्यांनी

बोर्डाच्या वरच्या कोपऱ्यापर्यंत. नेले. मग त्यांचा गुंजारव सुरू झाला.



""गंगा येथे उगम पावते, मग ती अशी हिमालयातून खाली येते."" त्यांनी

जोडलेले हात खाली आणून ओंजळ समोर धरली व गंगेचा प्रवास दाखवत

ते पुढे निघाले. वाटेत ते खुर्ची सरकवून प्लँटफॉर्मवर चढले व तो ओलांडून

पलीकडे उतरले व सरकत सरकत शेवटी बोर्डच संपला. तेथपर्यंत आले

व त्या ठिकाणी तळवे उघडून ""या ठिकाणी गंगा समुद्राला मिळते,"" असे

त्यांनी सांगितले. आता बोर्डच संपला म्हणून गंगा नदी त्यांच्या आवाजातून

निसटून धावत समुद्रात गेली. त्यांच्या इतक्या आवाजाच्या सवयीनंतरही



पान नं. 17

मला हसू आवरले नाही. तेव्हा गंगेला सासरी पोचवल्यावर टेबलावर छडया

हाणत त्यांनी मला वर्गाबाहेर हाकलले.



खरे म्हणजे संस्कृतचे दामले मास्तर सावरी कापसाची आठवण व्हावी असे

गुबगुबीत व सौम्य दिसत. ते जुनेच नव्हेत,तर प्राचीन होते. त्यांना वाढवून

दिलेली दोन वर्षांची मुदत देखील आता संपत आली होती.



ते फार सौम्यपणे बोलत व रूईची केळ फुटल्याप्रमाणे त्यांच्याकडून शब्द

येत. साऱ्या आयुष्यात त्यांनी कधी कुणाला कठोर शब्द वापरला नसेल,

पण त्यांच्याकडून देखील मी एकदा हाकलला गेलो. खरे म्हणजे ते एक

रेकॉर्डच होते.



मास्तर स्वतः थोडे सद््गदित होऊन धर्मराजाविषयी बोलत होते.

पांडवांमध्ये धर्मराजाविषयी मला कधी फारसे आकर्षण वाटले नाही व

त्याच्याविषयी जास्त माहिती करून घेण्याची कधी इच्छा झाली नाही.`नरो

वा कुंजरो वा' हा एकच क्षण त्याच्या आयुष्यात नाटयमय ठरला. पण त्या

क्षणातील क्रौर्य, कारूण्य ही कधी त्याला जाणवली होती की काय कुणास

ठाऊक ! धर्मराज म्हणताच त्या वेळी माझ्यापुढे एकच चित्र येत असे. संत

चित्रपटांतील संत ज्याप्रमाणे हनुवटी वर करून डोळे ओलसर करून

घोगऱ्या आवाजात बोलणारा, भक्ती, सत्य, स्न्मार्ग, कर्तव्य असल्या

शब्दांखेरीज एक वाक्य न बोलणारा, उपदेशाची एकही संधी न सोडणारा,

नातीचे नाक पुसताना देखील उपनिषदांतील एक अवतरण दिल्याखेरीज

न राहणाऱ्या आचार्यांची जी एक पेदास नंतर दिसू लागली होती

त्यांतील एक असल्याप्रमाणे वागणारा - थोडक्यात म्हणजे

सगळ्याच do-gooders प्रमाणे a bit of a bore. पण मास्तर

म्हणत होते,""अरे, तो इतक्या स्वच्छ मनाचा होता की तो दुर्योधनाला

देखील सुयोधन म्हणत असे."" त्यांनी माझ्याकडे बोट दाखवले व ते म्हटले,

""तुला काय वाटतं ?""



त्यांनी तो प्रश्न मलाच का केला हे एक कोडेच होते. मी काही समोरच्या

बाकावर नव्हतो. मी चौथ्या रांगेत अत्यंत निरूपद्रवीपणाने `कालिकांमूर्ती '

वाचत होतो. त्यामुळे तो प्रश्न माझ्यावर येताच माझी धांदल उडाली. मी

म्हटले, ""सर, कोणते आईबाप `वाईट' अशा अर्थाने सुरू होणारी नावे

आपल्या मुलांना देतील ? मुलीचे नाव दुःशीला ठेवतील ? भुते-पिशाच्चे



पान नं. 18

यांपासून संरक्षण व्हावे, व मुले दीर्घायुषी व्हावीत या हेतूने दगडू, धोंडू

मसणू, उकीरडा अशी नावे काही वेळा दिसतात, पण सगळ्याच शंभर

एक मुलांची नावे तशी असतील का ? तेव्हा `दुर' या अक्षरांना `वाईट'

असा अर्थ नंतर केव्हा तरी आला असला पाहिजे. शिवाय ही अक्षरे म्हणजे

काही नंतर लावलेला उपसर्ग नव्हे. ती अक्षरे काढल्यानंतर

उरलेल्या शब्दांना नेहमीच अर्थ उरतो असे नाही. तेव्हा कुठल्या तरी

कीर्तनकाराने सूपभर तांदळासाठी ही वावडी उडवलेली असावी. तरी बरं

धर्मराज आज हयात नाही. नाही तर त्याने `बॅडमिंटन' ला `गुडमिंटन'

म्हटले असते.""



पण या धर्मराजामुळे मी गोत्यात आलो. दामले मास्तरांनी मला वर्गाबाहेर

तर घातलेच, शिवाय प्रगतिपुस्तकावर `उध्दट' असा शेरा लिहिला. त्यामुळे

मला घरी देखील सक्तमजुरी मिळाली. पण या साऱ्या अवधीत आनंदाच्या

काही गोष्टी घडल्या. नाही असे नाही. उत्तम व मराठी हस्ताक्षरासाठी मला

दोनदा बक्षिसे मिळाली. आमच्या शाळेचे अद्याप देशीकरण झाले नव्हते.

आमचे प्रिन्सिपॉल अमेरिकेतून येत. एकदा डॉक्टर हिल नावाचे प्रिन्सिपॉल

होते. निळा सूट घालून ते सावकाश शाळेभोवती फिरू लागले की `ऐरावत'

सरकत असल्याप्रमाणे दिसत. अशा फेऱ्या घालत असता त्यांच्या कोटाच्या

बाहीत वेताची छडी असे. ती काही केवळ शोभेसाठी नसून तिची सणसणीत

ओळख अनेकांना झाली होती. त्या दिवसांत प्रत्येक वर्गात मोठी चित्रे

लावली जात. एकदा हिल आमच्या वर्गात आले व त्यांनी विचारले,""हे

प्राचीन अँम्फी थिएटर कुठे आहे ?"" खरे म्हणजे त्या चित्रावरच `रोम' असे

लिहिले होते. पण ते सांगितल्यानंतर त्यांनी विचारले,""रोम कुठे आहे ?""



त्यावर मी भीत भीतच, उत्तर दिले,""इटलीत"". भीतभीतच कारण त्या वेळी

इटली व ईजिप्त यांबाबत माझ्या मनात बराच गोंधळ होता. ""you are

right"" म्हणत त्यांनी माझे नाव लिहून घेतले. थोडया वेळाने शिवाप्पा एक

नोटिस घेऊन आला. साहेबाने मला ताबडतोब बोलावले होते. ते ऐकूनच

माझे अवसान संपले. कारण साहेबाकडे गेलेला कोणताच मुलगा सरळ

चेहऱ्याने परत येत नसे. ड्रिलमास्तर नातू यांनी तर कुत्सितपणे सांगितले,

""हाताला खोबरेल नाही तर साबण लावून जा. म्हणजे छडया मऊ

वाटतात.""



पान नं. 19

पण तसे काही घडले नाही. मी ऑफिसमध्ये जाऊन उभा राहिल्यावर साहेबाने

एक टाक काढला, व तो म्हणाला ""this is for you."" मी `थँक्यू' म्हणून

बाहेर पडलो, तो वर्गाबाहेर येऊन थांबलो. टाक म्हणजे काचेच्या नळीत

पोपटाच्या कोवळ्या पिसांच्या रंगाचे पाणी होते व त्यात मोहरीएवढा लहान

मासा होता. टाक वर-खाली केला की हो काचेचा मासा जिवंत

असल्याप्रमाणे वर-खाली होत असे. खरे म्हणजे टाक म्हणून त्याचा काहीच

उपयोग नव्हता. शाईत बुडवून त्याने लिहायला बसले की शाई ओघळून

मनगटावर येत असे. पण हिरव्या पाण्याचा रंग मात्र अतिशय आकर्षक

वाटे. रोम इटलीमध्ये आहे, हे माहित असणे म्हणजे काही ज्ञानाची

परमावधी नव्हे. पण तो टाक मी आज देखील जपून ठेवला आहे.



तेव्हापासून मात्र सारे स्वच्छ मोकळे वाटू लागले. दातार मास्तर प्रथमच

आमच्या वर्गावर आले. आणि आम्ही अगदी मॅट्रिक होऊन बाहेर पडेपर्यंत

आम्हांला टिकले. त्यांनी आम्हांला इंग्रजी शिकवले, गणित शिकवले व

विशेष म्हणजे ते मराठीचे तास घेत. दुसरे अविस्मरणीय शिक्षक म्हणजे

सायमन. साधारणपणे कोट, ऐसपेसपणे उडत असलेले धोतर, किंवा स्वच्छ

आभाळापेक्षा भूमातेलाच जास्त जवळ असणारे काचा मारलेले धोतर व

आखूड कोट एवढे कपडे पुरेसे मानणाऱ्या त्या शाळेत सायमन मात्र अत्यंत

नीटनीटकेपणाने सुटात येत. त्यांचे अनेक रंगांचे टाय होते. टायवर

झगझगीत पिन असे. कोटाच्या वरच्या खिशात हातरूमालाची टोकदार

त्रिकोणी घडी असे. ते जवळून गेले की सौम्य आकर्षक सेंटचे हलके पीस

जवळून गेल्याप्रमाणे वाटे. पण माणूस मात्र कुर्रेबाज. त्याला कुठल्या

अलबत्या-गलबत्याची सलगी खपायची नाही, की काही वावगे खपायचे

नाही. मागच्या बाकांवर बसणारी निबर नापाशी पोरे तर त्यांच्या दृष्टीने

रजिस्टरमधील नुसती नावेच होती. कुणी इंग्रजी निबंध पेन्सिलीने अगर

लाल शाईने लिहिला तर वही गेलीच खिडकीबाहेर. वासू केळकरने

निबंधाच्या एका वहीत वर श्री काढून त्याखाली कुठल्या तरी मोठया

पोटांच्या स्वामीचे चित्र लावले, तर खिडकीतून बाहेर फेकलेली वही

शोधायला त्याला पाच मिनिटे लागली.



त्या वेळी आम्हांला रॉपिड रिडिंग नावाचा एक खुळचट विषय होता. त्यात

आम्हांला दोनशे ओळी इंग्रजी कविता वाचाव्या लागत. रँपिड म्हणजे काय

याचा अर्थ मला अजूनही ठाऊक झालेला नाही. सायमन मास्तरांनी ग्रेची



पान नं. 20

`एलिजी' शिकवायला वीस तास घेतले. त्या वेळी अनुभवलेला थरार

अजूनही कधी तरी जागा होऊन आठवण उजळून जातो.



त्यानंतर टेनिसची Tears, Idle Tears व अर्नोल्डची Forsaken

Merman या कविता घेतल्या. ठरल्या ओळी होऊन गेल्या तरी सायमन

मास्तरांचे रॅपिंड चालूच राहिले. अ तुकडीच्या राव मास्तरांनी सगळाच

मामला सात तासांत खलास केला. नंतर ते डिक्टेशन घालून खुर्चीत स्वस्थ

बसत. काही माणसांना कधी काव्याचा स्पर्श होत नाही, कधीच काहीची

काव्याची धुंदी उतरत नाही, हेच खरे. नंतर सायमन इंदूरला गेले. तेथे

त्यांची बायको डॉक्टर होती, आणि सायमनना तेथील विभागाच्या

मिशनमध्ये काम करावे लागणार होते. जाताना त्यांनी काहीवस्तू

आमच्यापेकी काही जणांना वाटल्या. प्रभाकरला एक नक्षीदार दौत

मिळाली. मला त्यांनी एक अँटलास, चार जुनी व अत्यंत सुदंर ख्रिसमस

कार्डे आणि दोनच थेंब अत्तर उरलेली बाटली दिली. अत्तर संपून गेले.

कार्डे देखील कुठे नाहीशी झाली. पण त्यांनी शिकविलेल्या कविता मात्र

देव्हाऱ्यामधील चांदीच्या टाकाप्रमाणे मनात अगदी स्वच्छ आहेत. नंतर

अनेक वर्षांनी स्वतः कविता शिकविण्याचे दिवस आले तेव्हा सतत वाटायचे.

सायमन मास्तरांच्या शिकविण्यातील एक दशांश तरी माझ्यात यावा. पण

तसे कधी घडल्याचे समाधान मला आठवत नाहीत.



सायमन मास्तरांचा तास संपला की शाळेतील दिवसाची सुगंधी घडी जात

असे. त्यानंतर काचा मारलेले व बटाटयांच्या सालीच्या रंगाच्या धोतरातले

दातार मास्तर येत. मग आम्हांला एकदम ऊबदार, घरगुती व काही वेळा

तर वाह्यात वाटू लागे. शाळेत एकदा पुस्तके टाकली की संध्याकाळपर्यंत

तिकडे ढुंकून न पाहमारा थोडे देखील त्या तासाला हजर राहत असे. तो

काही अभ्यासाकरिता येत नसे. पण त्या वेळी वर्गात जी गंमत चाले ती

त्याला आवडे.



दातार मास्तरांनी अगदी मॅट्रिकपर्यंत आम्हांला हा ना तो विषय शिकवला.

पण शिकवणे म्हणजे कोंडट, कंटाळवाणे वातावरणे मात्र कधी नसं.

कुठल्या तरी मोठया माणसाचे श्राध्द चालले आहे असा भास नसे.



विषय कुठलाही असो, प्रथम ते खडूच्या तुकडयांनी भरलेली जुनी

कापूरपेटी काढत. मग फू फू करून टेबल त्यातल्या त्यात स्वच्छ करून



पान नं. 21

घेत, व तपकिरीची डबी काढून चिमूटभर तपकीर नाकपुडयांत भरत.

सायमन मास्तर जवळून गेले की सेंटची बाटली उघडल्याप्रमाणे वाटे, तर

दातार मास्तर येऊ लागले की जवळपास कुठे तरी तपकिरीचे दुकान

असावे असे वाटू लागे. सेंटमुळे एकदम चपापल्याप्रमाणे वाटे, तर

तपकिरीच्या वासाने अवघडलेले मन सेलावत असे.



त्याचीच खूण आजपर्यंत टिकली आहे. काही पूर्वग्रह जबरदस्त असतात व

जळूप्रमाणे ते आयुष्यात कायम चिकटून राहतात. आपली नात घरातील

पुस्तके कशी टराटरा फाडून बाहेर फेकते, किंवा आरसे-कपबशा फोडून

खिडकीतून बाहेर फेकते, हे कौतुकाने व बऱ्याच विस्तराने सांगत

बसणाऱ्या एखाद्या आजोबाला क्षमा करणे काही वेळा मला कठीण वाटत

नाही. पण तंबाखू चघळत ओठांची कुंची करून बडबडणाऱ्या माणसाची

मात्र ताबडतोब बाहेर रवानगी होईल. आपल्या गेल्या ऑपरेशनविषयी

स्टूल रिपोर्टपासूनसारे काही सांगणारी बाई, कडा कातरल्याप्रमाणे काढून

चपातीचा मधलाच भाग खाणारी माणसे, येताना इतर दोन-तीन जणांना

आगंतुकपणे बरोबर आणणारे पाहुणे, जीन्स घालणाऱ्या मध्यमवयीन

स्त्रियां, यांना माझ्याकडे औपचारिक देखील स्वागत नाही. पण कुणी

तपकीर ओढत असेल तर त्याच्याशी अर्धा तास मनमोकळ्या गप्पा मारणे

मला बरे वाटते. मला स्वतःला तपकीर आवडत नाही, पण तपकीर ओढणारे

दातार मास्तर आवडत, व त्यांच्यामुळे त्यांच्या वर्गातील लोकांविषयी मला

जवळीक वाटते.



दातार मास्तरांच्या तासांपेकी एक तास सातवा असे. त्या वेळी पोरे कंटाळून

गेलेली असत. व मास्तर देखील चुरगळलेले दिसत. अशा वेळी क्रिकेट

आणि गडकरी ही मास्तरांची देवते आमच्या मदतीला येत. पण त्यासाठी

गनिमी कावा लढवावा लागे, व त्याची योजना सकाळपासूनच ठरवावी

लागे. खरे म्हणजे मास्तर स्वतः काचा मारलेल्या धोतरात, उघडया

पावलांनी जिमखान्याच्या कोर्टावर टेनिस खेळत आणि बऱ्यापेकी खेळत.

हातभर उंच असलेल्या नाइक मास्तरांनी एकदा सर्व्हिससाठी चेंडू वर

उडवला, पण तो रॅकेट चुकवून त्यांच्या नाकावर पडला व त्यांचा चष्मा

मोडला. तेव्हापासून मास्तर माणसे टेनिस खेळत आहेत हे समजताच

आम्ही आमचा खेळ तसाच टाकून कोर्टाच्या कडेला जाऊन बसत असू.

आम्हांला टेनिसमधले फारसे काही कळत नव्हते, पण नाइक मास्तरांच्या



पान नं. 22

सारखी गंमत पुन्हा घडली तर त्या वेळी आम्हांला गेरहजर राहायचे नव्हते.



कधी कधी तर दातार मास्तर क्रिकेट देखील खेळत. त्या सगळ्यांची कसली

तरी संडे टीम देखील होती. मोठयांत जॅगरी किंग आणि पोरांत गुळाचा

गणपती म्हणून प्रसिध्द असलेले पाटील हे मूळचे गुळाचे व्यपारी

हॉटेलवाले रेगे त्या टीममध्ये होते. शिवाय डाव्या हाताने बोलिंग करणारे

थत्ते वकील, आणि अडीअडचणीला कोणत्याही विषयावर धार्मिक अथवा

राष्ट्रीय कीर्तन करणारे ग्रामोपाध्ये हे देखील होते. असली टीम जगात कधी

झाली असेल की नाही कुणास ठाऊक. एकीकडे जर एखादा गडी कमी

पडला तर दुसऱ्या बाजूचा एक जण इकडे येत असे, किंवा इकडचा एक

खेळाडू दोनदा खेळत असे. दातार मास्तर जरी अधूनमधून क्रिकेट खेळत

असले तरी देवण्णावर मास्तरांप्रमाणे त्यांना क्रिकेट इतिहास काही घडवता

आला नाही.



देवण्णावर मास्तर चालताना डोलत असत व त्या वेळी वारा भरलेले धोतर

जहाजाच्या शिडाप्रमाणे वाटे. खेळताना पायाला एकच पॅड पुरे होत असे.

एक तर साऱ्या टीममध्येच एकंदरीने दोन पॅड होते, व त्यांतील एक दुसरा

खेळाडू वापरत असे. शिवाय खाली वाकून पट्टे बांधणे हे त्यांना एका पॅडच्या

बाबतीत देखील फार जिकिरीचे वाटे. एका रविवारी त्यांनी दातओठ खात

एक चेंडू हाणला, आणि धाव घेण्यासाठी दौंड सुरू केली. विकेटकीपर

खानोलकर मागे वळून चेंडू शोधू लागला. केवळ सवय म्हणूनच जोशी

बाउंडरीकडे धावू लागला. पण चेंडू कुठेच दिसेना. देवण्णावर मास्तर तर

सारखे धावत होते. तीन-चार-पाच धावा झाल्या तरी ते थांबेनात, व चेंडू

देखील सापडेना. मग थत्ते वकिलांच्या ध्यानात सारा प्रकार आला. त्यांनी

देवण्णावरना पकडले, तेव्हा टीममध्ये असलेला काबाडे नुकतीच पेटवलेली

सिगारेट बाजूला टाकून त्यांच्या मदतीला आला, व क्रिकेट पिचचा आखाडा

झाला. थत्ते वकिलांनी देवण्णायवर मास्तरांच्या सोग्यात अडकलेला चेंडू

काढला, व तो स्टंपांवर हाणून ""औट"" म्हणून गर्जना केली.



""पण बॅट््समनला अशी टांग मारून औट करता येतं का ?"" बॅट उगारत

देवण्णावर थत्तेंकडे धावत आवेशाने म्हणाले.



""मग सोग्यात चेंडू घेऊन धावा काढत बसायच्या की काय त्याने कलियुग

संपेपर्यंत?""



पान नं. 23

""मग त्याबद्दल एम.सी.सी.चे नियम दाखवा."" कायदेशीर मोर्चा बांधत

देवण्णावर म्हणाले.



""तरी बरे, ऑस्ट्रेलियातून ब्रॅडमनला घेऊन या म्हणाला नाहीत !"" थत्ते

कुत्सितपणे म्हणाले.



""लोक हो, धोतराचा सोगा म्हणजे काय हे देखील साहेबाला माहीत असणार

नाही. मग सोग्यात चेंडू अडकला म्हणजे काय करायचे, याचे नियम काय

करणार तो आमचं टाळकं !"" समझोता घडविण्यासाठी दातार मास्तर

म्हणाले व आम्ही पोरांनी टाळ्या वाजवल्या.



अखेर तडजोड झाली. देवण्णावर औट झाले. पण नऊ धावा दिल्याखेरीज

हा निर्णय स्वीकारायचे त्यांनी साफ नाकारले. आम्हांला नाइक मास्तरांच्या

नाकावर पडलेला चेंडू पाहायला मिळाला नाही हे खरे; पण एका बॉलमध्ये

नऊ धावा मिळवणारा खेळाडू इतरांना कुठे पाहायला मिळाला ? आज

हेलमेट, पॅड रिस्टबँड असा श्रृंगार करून क्रिकेट खेळतात. शेळी लेंडया

टाकत राहते. त्याप्रमाणे व त्याच गतीने चार-पाच हजार धावा देखील

काढतात. पण एका बॉलमध्ये नऊ धावा घेणारा देवण्णावर मास्तरांसारखा

खेळाडू मात्र आता भूतली होणे नाही. There were giants in those

days ! आणि धावांचा मुद्दा अतिशय महत्वाचा होता. मॅच संपल्यावर सगळे

जण संध्याकाळी भीमाक्काच्या खानावळीत पालापाचोळा जेवण करत, व

मार खाल्लेल्या टीमने तो खर्च करायचा असे. वास्तविक भीमाक्काची

खानावळ असेच नाव वापरत. भीमाक्कानंतर तिचा मुलगा व त्याची बायको

यांनी खानावळ चालवली ती `क्षुधाशांति भवन 'या जबरदस्त नावाने नंतर

आपला व्यवसाय कोणताही असला तरी नावात `भारती' हाशब्द

वापरण्याची लाट आली, आणि रिकामटेकडे लोक खानावळीला

भूक-भारती असे म्हणू लागले. पण मुलगा व सून एव्हाना अंगाने अतिप्रशस्त

वाढून बसली होती, आणि खानावळीचे नाव आपोआपोच बदलले, आणि

होऊन बसले - लठ्ठ भारती !



क्रिकेट खेळताना दातार मास्तर ग्राउंडवर स्टंपांना नमस्कार

सांगून येत इतकेच. त्यांनी तेथून कधी भेपळा जरी आणला नाही तरी



पान नं. 24

वखार फुटल्याप्रमाणे धावा गोळा करत, सत्तर ऐशींचे बोजे देखील आणलं

नाहीत. माणसाला किती जागेची गरज आहे या प्रश्नाप्रमाणेच माणसाला

किती धावांची गरज आहे या प्रश्नाला त्यांचे उत्तर निश्चित असावे. नंतर

नंतर तर दातार खेळायला आले की खेळ जवळ जवळ संपलाच, असे

समजून वडाखाली हातरूमाल अंथरून थंड वारे घेत बसलेली पोरे उठू

लागत, व आपला घसा ओला करण्यासाठी शाळेच्या विहिरीकडे चालू

लागत. आमचा घसा तापण्याचे कारण कडक ऊन हे नव्हते. कारण

ग्राउंडच्या कडेने पुष्कळ झाडे होती, व त्यांतील एका कोपऱ्यात असलेल्या

अतिशय प्रशस्त अशा वडाखालीच आमचा मुक्काम असे. आमची कोणत्या

एका टीमशी अशी निष्ठा नव्हती. पण कुणीही खोळाडू औट झाला तरी

`पार्शिआलिटी अंपायर' म्हणून आमचे ओरडणे चालू असे, व त्यामुळे घसा

कोरडा होत असे. तीनही दांडया जरी तीन निरनिराळ्या दिशांना उडाल्या

तरी `पार्शिआलिटी अंपायर' हे आमचे मत मात्र कधीही बदलत नसे. इतकेच

नव्हे तर ग्राउंडवर कुणी तरी अंपायर असतो म्हणूनच खेळाडू औट होत

असतात, हे देखील आम्ही मान्य केले असते.



त्यानंतर मास्तरांची दृष्टी बिघडली, व चेंडू कोठून येतो हे देखील त्यांना

दिसेना. अनेकदा तर बोलरच्या हातून चेंडू निसटण्याच्या आधीच त्यांची

बॅट फिरवून झालेली असे, व ते मोठया आशेने बाउंडरी धुंडाळत असत.

मग त्यांनी क्रिकेट सोडूनच दिले, पण ते मुळमुळत नव्हे. तर अगदी

ठणकावून. Not with a whimper, in a burst of glory ! एकदा ते

बॅट फिरवत असता, कसा कुणास ठाऊक, चेंडू कडमडत तिच्या वाटेत

आला व उंच उडाला. चर्चकडील बाउंडरी वीस-पंचवीस फूट तरी कमी

होती. चेंडू वर उडाला व सरळ बाउंडरीपलीकडे जाऊन पडला. मास्तरांचा

त्यावर विश्वासच बसेना. त्यांनी बॅट काखेत मारली व ते बसायला

टाकलेल्या बाकाकडे चालू लागले. ""पार्शिआलिटी अंपायर"" असे आम्ही

ओरडलो नाही, असा तो एकच प्रसंग. सगळ्यांनी मास्तरांभोवती गर्दी केली

व थोडया थट्टेनेच त्यांचे अभिनंदन केले. मास्तर म्हणाले, ""आजपासून

क्रिकेट बंद. आयुष्यात मी ही एकच सिक्सर मारली. रिटायर व्हायला

यापेक्षा चांगला दिवस कधी येईल का ?"" त्या दिवसापासून खरोखरच

त्यांनी हातात बॅट धरली नाही. ते ग्राउंडवर येत. ते काही वेळा अंपायर होत,

व आमची कुचंबणा करत. कधी ते स्कोअरर होत. ते रविवारी हटकून



पान नं. 25

ग्राउंडवर दिसत, पण त्यांचा क्रिकेट रोमान्स संपला होता.



शेवटच्या तासाला जर आमच्या गनिमी काव्यात मास्तर सापडले, तर

आम्ही बेहद्द खूष होत असू. पण आज मात्र वाटते, मास्तर आम्हांलाच

बनवत असावेत. ते काही इतके भोळे नव्हते. त्यांना देखील कंटाळा आलेला

असे, व ते आपखुषीने आमच्या नाटकात सामील होत. आमच्यापेकी कुणी

काय विचारायचे, म्हणायचे हे आधी आधीच ठरवलेले असे. पण ऐन वेळी

जर आपला बेत साधला नाही,तर आणखी काही तरी पदरी असावे म्हणून

एक उपकथानक आम्ही तयार ठेवत असू, साधारणपणे नानू बापट मागच्या

रांगेत कोपऱ्यात बसत असे. या शेवटच्या तासाला आम्ही त्याला डिवचून

खेचून पुढील रांगेत मध्यभागी अगदी टेबलाजवळ बसवत असू. त्याने जर फारच

चिकाटी दाखवली तर निर्मळकर त्याला उचलून त्या जागेवर

बसवत असे. अभ्यासाविषयी निर्मळकराइतके शुध्द वेराग्य असलेला

मुलगा साऱ्या शाळेत मिळाला नसता. दर शनिवारी मुरांच्या बाजाराजवळ

जे लहान मेदान भरे. तेथे तो हटकून एखादी कुस्ती जिंकून रंगवलेल्या

मलमलीचा तुकडा, किंवा तीन नारळ असे बक्षीस मिळवत असे. अलजेब्रा,

जॉमोट्री,अक्षांश-रेखांश, भावे प्रयोग हे शब्द देखील त्याचे नाव ऐकताच

पटापट निपचित पडत असावेत !



नानू बापट मेणबत्तीतील वातीप्रमाणे असून त्याचे डोळे नेहमी ओलसर

असत. मास्तरांनी तपकीर सांडलेला सदरा झटकला की रिंगण सुरू होई.

दोनचार पोरे खोकल्याने बेजार होत व खिडकीपाशी जाऊन उभी राहत.

बापट मात्र काही केल्या रणछोड होत नसे, पण त्याचप्रमाणे त्याला

शिंका-खोकला दाबून ठेवता येत नसे. त्या प्रयत्नात त्याच्यातून जे

निरनिराळे बारीक आवाज बाहेर पडत ते ऐकून शेजारच्यांच्या अंगावर

कोसळल्याखेरीज आम्हांला हसू आवरत नसे. स्कॉटिश बँडमध्ये पिशवी

दाबत बॅगपाइप आवाज निघतात, त्याप्रमाणे नानू बापट हा कशाने तरी

दाबला जात आहे असे आम्हांला वाटे. पण काही झाले तरी हा उपाय

किरकोळ होता. तो फार तर दहापंधरा मिनिटे टिकत असे. नंतर तर हा

मार्ग देखील बंद झाला. नानूला स्वतःचे इतके डोके असेल असे आम्हांला

मधीच वाटले नव्हते. मास्तरांचा शेवटचा तास असला की तो आधीचा तास

चुकवून त्या तासाला दोनचार मिनिटे उशीरा येऊ लागला. त्याने ""May

I come in, Sir ?"" असे विचारले की मास्तर त्याच्याकडे डोळे वटारून



पान नं. 26

पाहत व म्हणत,""या या, नाना फडणीस. बापट, आज आपला चंद्रोदय

उशीरा झालेला दिसतो. या आणि त्या कोपऱ्यातील बाकावर आसनस्थ

व्हा. "" पोरे हसत. वर्गात कोपऱ्यात एक जादा बाक होते. तेथे नानू खाली

मान घालून बसे. व डोळे पुसत मधून मधून आमच्याकडे पाहत आवाज

करत हसे. मग आधी ठरल्याप्रमाणे तिसऱ्या रांगेत कुणी तरी कुणाला तरी

ढकलत मोठयाने ओरडू लागे. त्यावर दातार मास्तर करडया आवाजात

विचारत,""काय रे भोपळ्यांनो, काय गडबड आहे.?""



मग गोपाळ चोपडे उभा राहून साळसूदपणे म्हणे, ""सर, हा प्रभाकर म्हणतो,

नायडूने एका मॅचमध्ये सोळा सिक्सर्स मारले हे सारे झूट आहे. त्याचा

त्यावर विश्वास बसत नाही. ब्रम्हदेवाला देखील इतके सिक्सर्स कधी मारता

येणार नाहीत.""



मग जरी त्यांनी नुकतीच तपकीर भरलेली असली तरी मास्तर पुन्हा डबी

काढत व रागाने पुन्हा एक चिमूट नाकात भरत. अशा वेळी हात थरथरून

बरीच तपकीर सदऱ्यावर पडे. मग ते कोटाची बटणे काढत, प्लॅपॉर्मवरून

खाली उतरत व थेट प्रभाकरसमोर जाऊन उभे राहत. सीतेच्या

चारित्र्याविषयी संशय घेणारा परीटच समोर बसला असल्याप्रमाणे ते

त्याच्याकडे शंभर वॅट डोळ्यांनी पाहत. त्या अवस्थेत ते मिनिटभर थांबत,

व मग स्फोट होई,""म्हणे विश्वास बसत नाही !"" ते उसळून म्हणत, ""तुझा

विश्वास बसणे न बसणे ही गोष्ट इतकी महत्वाची आहे काय रे

भोपळ्या ?""



मास्तरांचा सर्वांत कडक शब्द म्हणजे ""भोपळ्या !"" आणि ते तो शब्द

डबल भोपळा निर्मळकरापासून शून्य भोपळा नानू बापटापर्यंत सर्रास

वापरत."" अरे, तुला क्रिकेट म्हणजे काय हे तरी माहीत आहे ? म्हणे विश्वास

बसत नाही ! आणि नायडूंची सिक्सर म्हणजे काही बाउंडरीपलीकडे फेकलेला

कचऱ्याचा गोळा नव्हता. आम्हांला वाटायचे की बॉल खाली उतरला की

त्याचा स्फोट होणार, आणि मुंबईचा समुद्र हातभर तरी मागे सरकणार !

टाक जा तुझा तो विश्वास भिकाऱ्याच्या झोळीत ! तुला अमरसिंगाचे नाव

तरी माहित आहे का ? अमरसिंग माणूस नव्हता. ती एक महाकाली तोफ

होती तोफ, माहीत आहे ? क्रिकेटच्या दुष्काळात जन्मलेली पाप्याची पितरे

तुम्ही, एकेक काडी गोळा करून रवंथ करणारे प्राणी तुम्ही-तुमचा काय

कपाळ विश्वास बसणार.

---------------------------------------------------------------

पान नं. 38



आता टेबलावरील पुस्तक तर त्यांच्या दृष्टीने मेलेच होते. पण घंटेला तर

अजून अवकाश होता. तातूला आणखी काही तरी म्हणायचे होते, पण

त्याला बोलू न देता मास्तरच म्हणाले,""आणखी एक सांगतो. त्याच्या

नाटकांत खरी पात्रे आहेत ती त्यांची भाषणेच. एका भाषणाला दुसरे सामोरे

जाते, संघर्ष घडतो, व काही वेळा तर लखलखाट होऊन डोळे दिपतात.

सुधाकर,वृंदावन, भूपाल, धुंडिराज ही नावे आपली आहेत सोयीसाठी

नायट्रिक अँसिड,तेजाब ही नावेही आहेत सोयीसाठीच. पण तेजाब म्हणजे

काय, हे त्याला हात लावून बघ म्हणजे समजेल. अरे, अंग पुसायला

राजापुरी पंचे आहेतच की दरिद्रयांनो; पण वरातीत पाहिजे ती पेठणच !

तरी सुध्दा घंटेला अवकाश होता. तातूने हात वर केला व म्हटले, ""सर,

मला बऱ्याच दिवसांपासून एक विचारायचे होते. ""



त्यावर आम्हांला एकदम उत्साह वाटला. अशारीतीने तातूने सुरूवात केली

की तो काही तरी भलतेच वेगळे बोलणार हे आम्हांला माहीत होते. तो

म्हणाला, ""सर. पासोडी म्हणजे काय ?""



मास्तर दचकून त्याच्याकडे पाहतच राहिले. ते म्हणाले,"" पासोडी म्हणजे

चादरीप्रमाणे जाड सुताडी पांघरूण. आता पासोडी का आठवली.?""



""सर, असल्या पासोडीवर कसल्या टाकाने, बोरूने लिहिता येते ? मी एकदा

तसे लिहून पाहण्याचा प्रयत्न केला, तर दोऱ्यात अडकून बोरू दोनदा

मोडला. मी दासोपंताच्या पासोडीविषयी कुठे तरी वाचले की त्यावर त्यांनी

आपल्या कविता लिहिल्या. मला वाटते, पासोडी या शब्दाचा अर्थ वेगळा

आहे.""



""असे तुम्हांला वाटते का ?"" कमरेवर हात ठेवून मास्तर म्हणाले, ""मग

पंडितराज, आपला अर्थ सांगून आम्हा सर्व पामरांना का धन्य करत

नाही ?""



तो शब्द पासोडी नसून पासोदी असा असावा. पासोदी म्हणजे पासोदाची

कविता. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, एकनाथांची भारूडे, भागवत त्याप्रमाणे.""



पान नं. 39

""पण ज्ञानभास्कर, पासोदा म्हणजे तरी काय ?""



""पासोदा हे कवीचे नाव, पण ते त्याने उलट लिहिले आहे. खरे नाव दासोपा,

दासप्पा किंवा दासोपा असे नाव असते, सर""



एकदम दडपण कमी झाल्याप्रमाणे मास्तर मोठ्याने हसू लागले. आमच्या

घरी पूर्वी ते, आजोबा करंदीकर, अप्पा काळे बोलत असता त्यांचे असले

मनमोकळे हसणे आम्हांला आत ऐकू येत असे. त्यांच्यातील ताण,राग सारे

आता ओसरून गेले होते. आम्हांला अगदी जवळचे वाटणारे मास्तर दिसू

लागले. ते म्हणाले, ""तातू, तुझ्या डोक्याला झाकण असते तर बरे झाले

असते बघ. म्हणजे कधी तरी ते काढून आत काय काय चालले आहे हे

पाहता आले असते. कमाल गंमत झाली असती."" तोच घंटा झाली. आम्ही

उठलो, पण जात असता मास्तरांच्या चेहऱ्यावर अजूनही हसणे होते.



मला एकदा तरी वर्गातून हाकलून घातल्याखेरीज कोणतेच वर्ष जाऊ नये

असे लिखितच होते की काय कुणास ठाऊक आणि या खेपेला एका दृष्टीने

कांदेविक्या जबाबदार होता, याचा मला विशेष राग आला. हा कांदेविक्या

अ तुकडीत होता. पण दहा मिनिटांच्या सुट्टीत तो कधी तरी आमच्याकडे

येई व नंतरचा तास आमच्यातच बसे. आडनावाच्या बाबतीत पोरांच्या

जिभा अगदी नाइलाज झाला तरच सरळ राहत. कांदेविक्या हे काही त्याचे

खरे नाव नव्हते. ते होते कानविंदे. आणखी एक नाकाडी म्हणून विद्यार्थी

होता. तो तर पहिल्याच दिवशी `नाकात काडी नाकाडी' होऊन बसला.

दड्डीकराचे धड्ड होणे, गोखल्यांचे खोकल्या, बोरकराचे बोऱ्या हे सारे

रीतसरच होते. प्रभाकरला देखील त्याचा `प्र' अगदी परवापरवाच परत

मिळाला होता. तोपर्यंत त्याला भाकरवरच समाधान मानावे लागत होते.

या मुद्रदानातून सुटायची ती तीनच नावे. कुलकर्णी, देशपांडे आणि जोशी.

या तीन नावांची पेदासच अशी भयानक होती, की निव्वळ संख्येच्या

आधारावरच टिकून राहणे फारसे अवघड नव्हते. पण त्यात जर

आद्याक्षरेच धोकेबाज असतील तर कपाळाला हात लावायचा, व गप्प

बसायचे. एक पी.जी.जोशी पाजी जोशी झाला; एक डी आर. कुलकर्णी

ढोर कुलकर्णी झालाच; आणि डी.एम.व टी. आर जोशी ढम्म जोशी आणि

टर्र जोशी झाले. !



कानविंदे इकडे यायचा म्हणजे तो काही आम्हांला प्रेमाने भेटायला यायचा



पान नं. 40

नाही. त्याचा एक वीतभर लेख कुठल्या तरी मुलांच्या मासिकात प्रसिध्द

झाला होता. तेव्हापासून तो कपाळावर दोन विचारी सुरकुत्या टाकून

इकडे-तिकडे भटकत विश्वाची चिंता करत असे. तो आमच्याकडे आला की

आम्ही ओळखत असू की, त्याने नवीन काही तरी लिहिले आहे. आम्ही

मुद्दामच वेगळे विषय काढून त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याला उतावीळ

करत होतो. त्याला पाहताच तातूने अफगाणिस्तानातील नद्यांची माहिती

द्यायला सुरूवात केली, तर प्रभाकरने चीनमध्ये माणसे झुरळांचे किती

प्रकार खातात याचे अत्यंत सविस्तर आणि काल्पनिक वर्णन द्यायला

सुरूवात केली. अखेर न राहवून कानविंदेच म्हणाला, ""काल मी एक कविता

केली आहे. तिचे नाव आहे `हा चांदोबा आहे सुदंर."" हे नाव ऐकताच तातू

अंगाला गाठ मारून मागे कोपऱ्यातसरकला. प्रभाकरने आपल्या

कपाळावर तर हात मारून घेतलाच, पण आम्हा दोघा-तिघांच्या कपाळावर

देखील हात मारला.



आभाळाचे निळे पाणी पोहायला

कोवळ्या तारका त्या खायाला

ढगांचा सावरी कापूस झोपायला

पण अमावास्येला असतोस कुठे रे ?

हसतो बिलंदर ! हा चांदोबा आहे सुंदर.



आणि त्याबरोबर हसण्याचा स्फोट झाला. प्रभाकर तर एक पाय वर करून

`हसतो बिलंदर, हसतो बिलंदर' म्हणत नाचू लागला. तोपर्यंत सुट्टी

संपल्याची घंटा झाली, आणि कणकेच्या गोळ्याप्रमाणे चेहरा झालेला

कानविंदे बाहेर पडायच्या आत दातार मास्तर वर्गात आले. तेव्हा तो खाली

मान घालून आमच्याच वर्गात बसला.



""सर, या कानविंदेने एक अप्रतिम कविता लिहिली आहे."" प्रभाकर म्हणाला.

""त्यात एक बिलंदर चंद्र आहे. तो सुंदर आहे म्हणून बिलंदर आहे की बिलंदर

आहे म्हणून सुंदर आहे, हे मात्र आम्हांला समजले नाही.""



""मला आणखी काही तसल्या ओळी माहीत आहेत,"" तातू म्हणाला, ""का न

खाशी गोमय ताजे ? एखाद्याला शेण खायला सांगताना सुध्दा त्यातल्या

त्यात त्याने ताजे शेण खावे हे सांगण्याइतके सौजन्य आजकाल दिसत नाही.""



पान नं. 41

""माती असशी, मातित मिळशी. पण लक्षात ठेवा, हे आत्म्याला लागू नसे.""

प्रभाकर म्हणाला, ""एखाद्या औषधाच्या बाटलीवर लिहितात तसे हे फक्त

बाहेरून लावायचे. पोटात घ्यायचे नाही. आत्म्याला हे लागू नसे."" तातूने

मळकट डायरीसारखी एक वही काढली होती, व तिच्यातून तो मधून मधून

वाचत होता -



उठा उठा रे बांधा कंबर

तुमच्यापुरती ही घी-शक्कर

टाकुनि रूढीशी द्या टक्कर !

खुबी ओळखा, क्या हे अंदर !



""असे होते कधी कधी."" मास्तर म्हणाले. पण आज एकंदरीने ते व्यग्र दिसत

होते, कारण त्यांनी खोटेच रागावून कुणालाच भोपळ्या म्हटले नाही.



""आज येताना मला एक प्रेत दिसले. ते एका मुलाचे होते; पण त्याची आई

मारूतीच्या देवळापुढे उभी राहून त्या मुलाला पूर्ण आयुष्य देऊन सुखी ठेव,

असे हात जोडून म्हणत मध्येच हसत होती. मला एकदम राजहंस कवितेची

आठवण झाली."" ते सांगत होते. वास्तविक आम्ही त्यांचे वेगळे स्वरूप पाहून

गप्प बसायला हवे होते. पण आम्ही आज फसफसून झिंगल्याप्रमाणे झालो

होतो की काय कुणास ठाऊक ! मी म्हटले, ""त्या कवितेत सुद्दा असल्या ओळी आहेतच -



ते ह्दय कसे आईचे

मी उगाच सांगत नाही.""



एवढ्यावर देखील थांबायला हरकत नव्हती. पण माझ्यात कसले तरी पिसे

चढले होते आणि शेजारच्या कांदेविक्याला पाहून तर तो जास्तच वाढले. मी

सूर काढला -



परांजपेच्या हॉटेलातिल पुरी-पातळभाजी-

मी उगाच सांगत नाही !""



मग प्रभाकर देखील चेकाळला. तो म्हणाला,



""तानिबाईची मिरची भजी

मी उगाच सांगत नाही !""



पान नं. 42

मग इतर काही पोरांना देखील त्यातील गंमत समजली, आणि ती ""मी

उगाच सांगत नाही "" ही ओळ एकत्र सामील झाली.



बादशाहिमधला खिमा ब्रेड-

मी उगाच सांगत नाही

ब्रम्हचारी सिनेमा बघा तरी-

मी उगाच सांगत नाही

डिलाइटमधले रवा-डोसे

मी उगाच सांगत नाही...



हा वाह्यातपणा पंधरा मिनिटे चालला, व आम्ही पोटाचे चक्र होईपर्यंत

खिदळलो. पण मध्येच काही तरी तुटल्यासारखे झाले, व सगळे जण

गप्पगार झाले. मास्तर माझ्यापुढे येऊन उभे राहिले होते, व माझ्याकडे

पाहत होते. त्यांचा चेहरा रक्त साकळल्यासारखा झाला होता, व उजवा हात

किंचित थरथरत होता.मग आम्ही पूर्वी कधी न ऐकलेल्या आवाजात ते मला

म्हणाले,""तुम्ही आपली पुस्तके गोळा करा, आणि वर्गातून चालते व्हा आणि

मला विचारल्याखेरीज माझ्या तासाला येऊ नका.""



हा आवाज,`तुम्ही' या शब्दाचा वापर हे सारे मास्तरांचेच, यावर माझा

विश्वास बसेना. पण त्यामुळे मला एकदम मुस्कुटात मारल्याप्रमाणे झाले.

मी खाली मान घालून पुस्तके गोळा केली व बाहेर पडून घरी आलो. घरी

कंरदीकर आजोबा येऊन बसले होते. मला पाहताच ""काय म्हणतो आमचा

किट्टू मास्तर,"" असे विचारणार हे मला माहीत होते. मी तसाच

घरासमोरून पुढे गेलो, व बराच वेळ पिंपळकट्टयावर बसून बऱ्याच उशीरा

घरी परतलो.



त्यानंतर दोन दिवसांनी मास्तरांचा तास होता. आधीचा तास बायबलचा

होता. त्या वेळी मला बऱ्याच नव्या गोष्टी ऐकायला मिळत. शिवाय चांदेकर

मास्तर गाणे देखील सुरेख म्हणत असत. आज आई आजारी म्हणून तातू

आला नव्हता. मी घाईघाईने पुस्तके गोळा केली, व त्याच्या घरी जावे म्हणून

निघालो, तर दारातच दातार मास्तर उभे.



""काय रे. कुठे निघालास ?"" त्यांनी विचारले.



""घरी. वर्गात बसू नको असे तुम्ही सांगितलेत.""



पान नं. 43

""जा, फार शहाणा झालास. बाकावर जाऊन बस."" आत येत ते म्हणाले व

थोडे हसले""



पण नंतर साऱ्या तासभर त्यांनी नजर देखील माझ्याकडे वळवली नाही.

पण त्यांचे बरेचसे बोलणे माझ्यासाठीच होते.



ते म्हणाले, ""कित्येकदा फार मोठया कवींच्या केसांत देखील नट्टा-पट्टा

उमटतो. मग निर्जीव ओळी लिहिल्या जातात, आणि त्या वाचताना मन

विरजते. शेक्सपियरच्या नाटकात देखील ओळीच्या ओळी रिकाम्या

गाडग्यारप्रमाणे येतात. पण हिमालयाची थोरवी त्याच्या शिखरावरून

ठरवावी त्यातील खोल दऱ्याभेगांवरून नव्हे. गंगेला देखील पाणउतार

असतो, आणि सरस्वतीला देखील थकून जांभई येते. म्हणून

राजहंससारख्या कवितेतही `मी उगाच सांगत नाही.' असल्या ओळी येतात.



माझा ताण तटकन तुटला, व मी रागाने ओठ आवळले. जाताना देखील

मास्तरांनी माझ्याकडे पाहिले नाही. त्यानंतरचा तास चुकवून मी घरी

आलो. तेव्हा करंदीकर आजोबा नुकतेच पगडी टेबलावर ठेवत होते. मला

पाहताच ते म्हणाले, ""काय बच्चमजी, कसा आहे आमचा किट्टू मास्तर ?""



मी उसळत्या रागात त्यांना हकीकत सांगितली व म्हटले, ""तुमचे किट्टू

मास्तर भयकंर पार्शिआलिटी अंपायर आहेत. मी तसे म्हटले तर त्यांनी

मला वर्गातून हाकलून दिले. पण आज मात्र त्यांनी स्वतःच त्या ओळीवर

टीका केली. म्हणून मी नंतरचा तास चुकवून घरी आलो.""



त्यावर करंदीकर आजोबा इतके हसले की त्यांना खोकला आवरायला पाच

मिनिटे लागली. तोपर्यंत अप्पा काळे देखील आले. त्यांनी पायरीवरूनच

सिगारेट गटारात टाकली, व ते आत आले.



""मोठा खोकला उकरून काढायचे तुमचे वय संपले, भीष्माचार्य,"" ते

म्हणाले. खरे म्हणजे आजोबा अप्पा काळ्यांपेक्षा आठदहा वर्षांनी मोठे

असतील. पण ते अप्पांना नेहमी भीष्माचार्य, द्रोणाचार्य असल्या

महाभारतातील नावांनीच हाक मारत. करंदीकरांनी अप्पांना सारी हकीकत

सांगितली. तेवढ्यात आमचे दादा घरी आले, आणि माझे सगळेच बिंग बाहेर

पडले. मग करंदीकर मला म्हणाले,""हे बघ बच्चमजी, तू काही तरी वागह्यात

बोलणे, आणि किट्टूने काही म्हणणे दोन्ही सारखेच होय रे ? त्याच्यासारखे





पान नं. 44

गडकऱ्यांवर प्रेम कर, आणि मग तसे बोल. तू तुकाराम आहेस का? तुझी

भक्ती असेल तर विठोबाल देखील विठ्या,काळ्या म्हण की ! आणखी

एक गोष्ट सांगून ठेवतो. आमचा किट्टू म्हणजे एक अरभाट माणूस आहे

अरभाट !""



अरभाट हा एक अतिशय गुणी कानडी शब्द आहे. अरभाट म्हणजे

खानदानी, भव्य, मोठया थाटामाटाचा. मठातील जेवण कसे होते ? अरभाट.

मन्सूरांचे गाणे कसे झाले ? तर अरभाट. ऋषिकेशला गंगा कशी आहे, तर

अरभाट. देवळासमोर झालेल्या नाटकातील हिरण्यकश्यपूच्या मिशा कशा

होत्या, तर अरभाट. म्हणजे अगदी क्लास ! ""तुला सांगून ठेवतो. तू एक

गोष्ट कर. किट्टूच्या बाबतीत तू नायडू आणि गडकरी यांच्या भानगडीत

पडू नकोस."" माझ्या पाठीवर थाप मारत करंदीकर म्हणाले.



मग अप्पा काळे किंचित पुढे सरकले. आवाज नेहमीचाच ठेवून पण एखादे

गुपित सांगण्याचा आविर्भाव आणत ते डोळे वात्रट करत म्हणाले, ""त्याच्या

जोडीला देविकारणी व गायत्रीदेवी यांच्याविषयी देखील एक शब्द काढू

नको. काय समजले ?"" आणि त्यावर काळे व करंदीकर दोघेही हसले.

देविकाराणी कोण, हे त्या काळी मला काहीच माहीत नव्हते. देविकाराणी

आणि जयपूरच्या गायत्रीदेवी या दोन खानदानी नावांचे जे सुगंधी निळे

चांदणे आयुष्यात पसरले ते फार नंतरच्या काळात. आणि त्या वयात

पसरलेल्या चांदण्याचे गंध कधी ओसरत नाहीत, की त्यांना कधी

कृष्णपक्षाची बाधा होत नाही. मास्तरांचे रागावणे, त्यांनी हाकलून लावणे,

त्यांनी केलेली निबंधाची, हस्ताक्षरांची स्तुती, हे सारे आयुष्याच्या

वेडवाऱ्यात अस्ताव्यस्त उडून गेले. पण त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेने एक

कोनाडा गाभाऱ्यासारखा होतो, तो अनुभव वेगळाच होता.



त्यांनी `चिमुकलीच कविता' शिकवायला घेतली ती या वर्षांतील शेवटचीच

कविता होती. नव्हे, ती शाळेतीलच शेवटची कविता होती.



""यात एक ओळ फार झगझगीत आहे."" तातू हळूच म्हणाला. तो शेजारी

बसला होता खरा, पण मनाने तो दूर कुठे तरी निघून गेला होता.



कविता संथपणे चालली होती. गोंडस नाजुक चिमणी बाला हळूहळू स्पष्ट

होत चालली. केस सरळच, पण काही मात्र कुरळे, कच्च्या पोवळ्यांच्या



पान नं. 45

चकत्या करून लावल्याप्रमाणे वर्खी नखे. (नखे लाखिया,दात मोतिया,

आणि स्तनाकार पेले, यांची जपानी रमलाची रात्र चिमुकलीच कविता

मोठी झाल्यानंतरची.) विशेष प्रतिकार न करता, पण फारसे न झंकारता

आम्ही त्या संथ ओळी ऐकत होतो. मग कसलीच चाहूल न दाखवता ती

ओळ आली व सारे अंग थरारून गेले. तिच्या हनुवटीवरील तीळ म्हणजे

तिच्या पुण्याईचे गणित करत असता विधीने दिलेले दशांश चिन्ह.

कमळाच्या परागतंतूंतील एक विजेच्या झळाळीने उजळ झाल्याप्रमाणे मी

अगदी बावरून गेलो व सारेच विसरलो.



नंतर बऱ्याच वर्षांचीगोष्ट आहे. खऱ्या काव्याचे लक्षण कसे ओळखावे हे

आपल्यापुरते सांगताना ए.ई हाउसमनने म्हटले आहे : एखादी ओळ

आठवताच सारे अंग थरथरून येते. जर त्या वेळी मी दाढी करत असेन

तर चेहऱ्यावरील केस एकदम ताठरतात. ही खूण त्याला पुरेशी आहे. Elfs

and fairies shall dance no more ... Brightness falls from

the air, Queens have died young and fair...



एमिली डिकिन्सला जाणवणारे लक्षण निराळे आहे : ""खरी कविता

वाचताना खोल कुठे तरी असा गारठा जाणवतो की विश्वातील सारी उष्णता

जरी त्या क्षणी आपल्यात भरली, तरी तो नाहीसा होणार नाही असे वाटू

लागते.""



तसल्या जातीचा एक लहान अनुभव मला आला, मास्तरांनी ती ओळ

वाचली तेव्हा. गणितातील निर्जीव टिंबाला एका दशवर्षेच्या जीवनात

निर्णायक रूप प्राप्त झाले. मास्तरांनी ती कविता अनेकदा शिकवली असेल,

पण ते या ओळीवर थांबले. पुस्तकात बोट ठेवून ते खिडकीपाशी गेले, व

तेथे किंचित रेंगाळून ते परतले. ""या माणसाची भूकच वेगळी होती. त्याला

एखादा पक्षी पाळायचा असता तर त्याला गरूड देखील निर्जीव वाटला असता.



त्यानंतर मास्तर पुष्कळ बोलत राहिले. पण आता माझेच मन थाऱ्यावर

नव्हते. दररोजच दिसणारा, खिडकीतून आलेले उन्हाचा पट्टा आज

जास्तच का झळझळत आहे हे मला समजेना. पलीकडील ख्चिश्चन



पान नं. 46

स्मशानभूमीतील झाडे स्तब्ध उभी होती खरी, पण त्यांचे सारे लक्ष

माझ्याकडेच होते. कपाळाला एक लहान सुरकुती देऊन, मान किंचित

वाकडी करून ब्रम्हदेव हे दशांश चिन्ह देऊन त्या मुलीचे भवितव्य

ठरवण्याच्या विचारात आहे, आणि त्याच्या आज्ञेची वाट पाहत एक तेजस्वी

टिंब त्याच्यासमोर तरंगत आहे, असे चित्र समोर अस्पष्ट दिसू लागले.



नंतर बऱ्याच काळाने माझ्या ध्यानात आले की, ते टिंब म्हणजे तिच्या

हनुवटीवरील तीळ नव्हता, तर ती एक गोंदण्याची खूण होती. म्हणजे ते टिंब

कुठे द्यायचे, हे जरी ब्रम्हदेवाने ठरवले होते, तरी त्याने अर्जुनाप्रमाणे

एका गोंदणकाराला नाममात्र केले होते !



""आणखी एक ओळ जाता जाता तसेच चेटुक करून जाणारी आहे,"" जागा

झाल्याप्रमाणे तातू म्हणाला, ""कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले

नाही.""



ही किमया होती ती मुख्यत्वेकरून कवीची, पण मला ती दातार

मास्तरांकडून मिळाली म्हणून मला त्यांच्याविषयी कृतज्ञता होती.



दातार मास्तर मराठीप्रमाणे गणित देखील शिकवत. खरे म्हणजे शास्त्र

आणि भूगोल सोडून सगळेच विषय त्यांनी केव्हा ना केव्हा तरी शिकवले

होते. निरनिराळ्या रंगांच्या खडूंनी भरलेले पेटी उघडून भूमितीच्या

तासाला ते हात चोळत फळ्यासमोर उभे राहिले की, आता येऊ दे समोर

कोणतेही प्रमेय असा आवेश त्यांच्यात असे ! कधी तरी ते एक अजस्त्र

लाकडी कंपास वर्गात आणत, व त्यात एका टोकात खडू अडकवून तो

बाजूला ठेवून देत. इतक्या वर्षांत त्यांनी तो वापरलेला मात्र आम्ही कधी

पाहिला नाही. उलट हातात खडू धरून हात सेलपणे गोल फिरवून आपण

सुरेख वर्तुळ काढू शकतो, असे ते आम्हांला अभिमानाने सांगत. इतर

सिध्दांत-प्रमेये सांगताना ते अनेकदा पायथागोरासच्या सिध्दांताचा

उल्लेख करत. पण अनेक दिवस पायथागोरासची पाळी येईना. तो सिध्दांत

बराच मोठा असल्यामुळे त्यासाठी दोन तास तरी सलग हवे असत. आमची

उत्सुकता वाढतच गेली. पायथागोरास हा एक ग्रीक तत्वज्ञ होता, व त्याचा

पुनर्जन्मावर विश्वास होता. कदाचित तो भारतात देखील येऊन गेला

असेल. पृथ्वी एका स्थिर बिंदूभोवती फिरते, असा त्याचा विश्वास होता.

त्याची देखील एक शाळा होती. पण एखादा विद्यार्थी मध्येच त्याचे शिकवणे



पान नं. 47

सोडून गेला, तर त्याने दिलेली फी समारंभपूर्वक त्याला परत केली जात

असे. तो गेल्यानंतर मात्र त्याच्या बसण्याच्या जागेवर थडग्यावर ठेवतात

त्याप्रमाणे त्याचे नाव असलेला एक दगड ठेवला जात असे.



अशा पुष्कळशा गोष्टी मास्तरांनी सांगितल्या होत्या. त्याच्या नावावर

असलेला सिद्धांत प्राचीन ईजिप्तमध्ये आधीच माहीत आसावा. पण प्राचीन

इतिहासात काही वेळा कुणाचे तरी श्रेय कुणाला तरीच दिले जाते. ज्याला

आपण अरबी आकडे म्हणतो, ते खरे म्हणजे हिंदू आहेत. प्लेटो नावाच्या

तत्वज्ञाने तर ज्यांना भूमितीची आवड नाही त्यांना आपल्या शाळेत प्रवेश

नाही, असे जाहीरच केले होते. आमच्यापेकी बहुतेकांना प्लेटोने आपल्या

शाळेची पायरी देखील चढू दिली नसती. कारण गणित म्हणजे आकडेमोड

भूमिती म्हणजे रेघामोड, व सगळे मिळून एक असह्य मानमोड एवढीच

आमची कल्पना होती.



अखेर वेळापत्रकात मास्तरांनी थोडा बदल करून घेतला, व दोन तास

सलग मिळवले. त्यांनी लग्नातील नवरदेवाप्रमाणे झगझगीत पिवळ्या

रंगाचा एक काटकोन त्रिकोन बोर्डावर काढला. त्याच्या कर्णावर जांभळ्या

रंगाचा चौरस उभा राहिला. बाजूच्या दोन रेषांवरील चौकोन अद्याप कच्चे

असल्यामुळे हिरवट रंगाचे होते. मग पांढऱ्या खडूने रचना तयार झाली.

संथ आत्मविश्वासाने एकेक पायरी दाखवत मास्तरांनी असे दाखवले की

दोन हिरव्या चौरसांची बेरीज जांभळ्या चौरसाइतकी आहे.



यापूर्वी मास्तरांनी अनेक सिद्दांत शिकविले होते. जे सिध्द करायचे होते, ते

स्वच्छपणे पटवून दिले होते. त्या QED मध्ये एक काम पार पाडल्याचे

व्यवहारी समाधान होते. पावलापुढे पाऊल टाकून रस्ता निभावला होता

इतकेच. पण पावलांना कधी पंख फुटून खालचा रस्ता खालीच राहिला

नव्हता. Where Kingfishers Catch Fire... खंड्या पक्ष्याच्या

पंखावर सूर्यप्रकाश पडून निळी वीज झळळली नव्हती. कधी लोलकांतून

पाहिल्याप्रमाणे कसल्याच रंगरेषा उमटल्या नव्हत्या. मास्तरांनी खडूचे

हात झाडले व खुर्चीत बसून त्यांनी तपकिरीची डबी उघडली.



मी बोर्डाकडे पाहत होतो. त्या क्षणी काय झाले कुणास ठाऊक,

हादरल्यासारखे होऊन सगळा वर्गच वितळल्यासारखा झाला. समोर एक

भव्य काळा पडदा, त्यावर जांभळा व हिरवा असे दोन चौरस हळदी



पान नं. 48

त्रिकोणाभोवती झळाळत उजळले. दोन लहान चौरस भिरभिरत जांभळ्या

चौरसात मिळून गेले. मग मोठा जांभळा चौरस थरथरत चंद्रज्योतीप्रमाणे

फुटला. आणि त्याचे दोन नवे लहान लहान चौरस झाले. ते आता रोखठोक

स्वतःच्या स्वतंत्र सत्याने प्रकट झाले होते. म्हणजे म्हटले तर एक, किंवा

दोन आणि खरे म्हणजे दोन एकच व एकच दोन. हे सारे एकेक पायरी

समजावून घेत, सारे स्वच्छपणे समाजावून घेण्यापेक्षा सर्वस्वी निराळे होते.

हा एक अणुसाक्षात्कार होता.



झेन बुध्दवादातील Satori, साक्षात्कार याअर्थी वापरली जाणारी

Epiphany ही कल्पना, एका देवदत्त क्षणी मी व इतर जग यांतील दुरावा

जळून जाऊन मी आणि माझे जग, I and it जाऊन I and thou, हे

सारे नंतर खूप वर्षांनी वाचनात आले. तसला अनुभव घेण्याचे मला भाग्य

कधीच लाभले नाही. पावले धुळीतच रखडत ठेचाळत राहिली. राजहंस

कधीच खाली उतरले नाहीत. पण त्यांचे एक झरझर प्रतिबिंब मात्र

मानसजलावर क्षणभर सरकून गेले. त्या क्षणी अशा तऱ्हेचा अत्यंत दुर्मिळ

मूल्यवान व अगदी कणरूप अनुभव मला स्पर्श करून गेला हे मात्र खरे.

घंटा झाली व मी भानावर आलो. मास्तर निघाले, पण जाता जाता ते

म्हणाले, ""काय भोपळेबुवा, डुलकी लागली होती वाटतं ? मी दोन प्रश्न

विचारले तुला.""



एरवी मला थोडी शरम वाटली असती, पण त्या क्षणी मात्र मी अगदी

निर्विकार, अलिप्त होतो. पुढचा तास आपटे मास्तरांचा होता. मी पुस्तके

घेऊन ख्चिश्चन स्मशानभूमीत आलो. तेथे कोपऱ्याच जी दोन थडगी होती

त्यांच्यावर सपाट गुळगुळीत अशी मोठी फरशी होती. तेथे स्टीफन माळी

काही तरी करत होता. आता माझी त्याच्याशी चांगलीच ओळख झाली होती.

तो हसला व झाडणीने फरशीवर पडलेली वाळलेली पाने बाजूला करून

तो दुसरीकडे गेला.



मी फरशीवर पसरलो. कसली बोच नाही, हाव नाही. हातमोजा उलटा

केल्याप्रमाणे सगळेच वेगळे, उलटे झाले होते. त्या क्षणी देखील मनातील

ती उत्कट नीरवता मला प्रकट करता आली नसती. इतक्या वर्षानंतर उरली

आहे ती फक्त स्वतःलाच जाणवणारी आठवण.



अशा अनुभवाचा भव्यतेशी किंवा स्वतःच्या मोठेपणाशी काडीचाही संबंध

नसतो.



पान नं. 49

तसला अनुभव पॅसिफिक महासागर प्रथमच पाहिलेल्या कोर्टेझला

(खरे म्हणजे बाल्बोआला) आला. असेल. अणुबबचा पहिला चाचणी स्फोट

पाहिल्यावर दशकोटी सूर्यांची ओपेनहीमरला आठवण झाली व तो हरवून

गेला. तर जेफरीसारख्या साध्या पत्रकाराला असला अनुभव तो एका

टेकडीवरील उतरणीवर गवतात पसरला असता आला होता. नंतर फार

वर्षांनंतरची गोष्ट आहे. एका महान साधकाची कॉलेजला भेट होती.

स्टाफरूमसमोर गाडी थांबली. तेथेच एक रानझुडूप वाढले होते आणि

जगण्याची ईर्षा दुर्दम्य असल्यामुळे त्याला कोवळी, लालसर पाने फुटली

होती. जवळून जाताना साधक एकदम थांबले. त्यांचे हातपाय थरथरू

लागले व त्यांनी उपरणे तोंडावरून ओढून घेतले. ते समाधीत गेले होते.

आम्ही त्यांच्या अशक्त देहाला उचलून देहाला उचलून पुन्हा गाडीत ठेवले, व गाडी थेट

टोकापर्यंत नेली. थोडया वेळाने ते परतले,तेव्हा पुन्हा ते झुडुपाजवळ आले.

पण या वेळी त्यांनी त्याच्याकडे पाहिले देखील नाही. आता त्याची

काही

गरज उरली नव्हती. एका क्षणी ओळख पटून गेली होती.



त्यानंतर मी पायथागोरासचा सिध्दांत दोन-चार मित्रांना समजावून

सांगितला. माझ्याजवळ योग्य ते शब्दच नसावेत. त्यांनी माना डोलावल्या.

पोस्ट ऑफिस पाच वाजता बंद होते, पूना मेल सहा वीसला येते, असलीच

माहिती मी देत असल्याप्रमाणे ते निर्विकार राहिले. दोघांनी तर तो सिध्दांत

आपल्याला समजला आहे असे सांगितले. पण समजणे निराळे, जाणणे

निराळे. एक लाल पान खुडून कपाळावर चिकटवणे निराळे, आतून काही

तरी उसळून सर्वांगला लाल लाल पाने फुटल्याप्रमाणे वाटणे निराळे.

कदाचित माझ्यातच हा उणेपणा असावा. खुद्द मास्तरांना देखील हाच

अनुभव पुन्हा हुकूमेहुकूम देता येणार नाही, कारण असला क्षण म्हणजे

स्थळ, काळ आणि देवी इशारा यांचा एक अगम्य स्फोट असतो. त्यानंतर

काय ? त्यानंतर काय ? काय ? तर काही नाही, केवळ निःशब्दता,मूकता.

विटगेनन्स्टीनने हे बरोबर ओळखले. त्याबद्दल तो स्तब्ध राहिला. तेथे

शब्दांची मिजास संपते, तत्वचर्चेचा दिमाख बेगडी ठरतो, आणि

वटवटणारी जीभ निरर्थक चुकचुकणाऱ्या पालीप्रमाणे वाटते.



असले काही तरी क्षणिक, किरकोळ प्रथमच मला अनुभवाला आले होते.

योगायोगाची गोष्ट म्हणजे पहिले धूसर चित्र आणि हा क्षण यांत

गणिताचाच स्पर्श होता. हनुवटीवरील दशांश चिन्ह भाग्य ठरविणारे होते,



पान नं. 50

तर पायथागोरासच्या चौरसांनी एक नवीनच खिडकी किंचितकाल

उघडली होती.



मग मॅट्रिकची परीक्षा संपली. परीक्षेपुरती गोळा केलेली माधुकरी तिच्याच

झोळीत टाकली. आता देणे-घेणे काहीच उरले नाही. जाताना शाळेने

आम्हांला निरोप दिला नाही. जाताना आम्ही देखील फारसे कुचंबलो नाही.

शेवटी पदरी राहिले काय?



तर सायमनचे कुर्रेबाज काव्यमय इंग्रजी, सेंटचा मंद वास, त्यांनी

शिकवलेली ग्रेची कविता, दातार मास्तरांनी दिलेले दशांश चिन्ह

पायथागोरासचा सिध्दांत, थडग्यावरील फरशीवर पडून अंगावरून जाऊ

दिलेली आत्मरत सुखाची झुळूख; शेवटच्या दिवशी स्टीफन माळ्याने

दिलेली Scented Giranium -ची फांदी व एक पान चुरगळून

नाकाजवळ आणलेला त्याचा सुगंध. बस्स एवढेच.



कॉलेजमध्ये तर सगळाच आनंद होता. कृष्णस्वामींनी ग्रीक शोकन्तिकेचे

दर्शन घडविले तेवढेच काही पदरात पडले. एका प्राध्यापकांनी कॉवरॅड,

हार्डी यांच्यासारखे अवजड लेखक परीक्षेला लावण्याऐवजी पी.जी.

वुडहाऊस, जेरोम के जेरोम असे लेखक लावायला हवे असे सांगितले.

आणखी एकाने कीट््सच्या कवितांचे सारांश देऊन वर्ष रेटले. आणखी एक

बहुधा पिऊन लालबुंद होऊन additional English शिकवायला येत,

आणि Through literature To L ife हे टेक्स्टबुक, damned silly

book म्हणून तास संपवत. जुन्या मित्रांपेकी कुणीच या कॉलेजमध्ये

बरोबर आले नाही. प्रभाकर सायन्ससाठी आपल्या काकांकडे गेला. पाच

वर्षे तातू सामंत माझ्या शेजारी बसत होता. आता बोक्यासारखे दिसणारे

एक धनिक बाळ बसू लागले. हा दर तासानंतर खिशातून कंगवा काढून

केस विंचरत बसे. तो दररोज एका नव्याच मुलीच्या प्रेमात पडे. एखादा नवा

राजकीय पक्ष अस्तित्वात आला की तो त्यात सामील होई व पंधरा दिवस

त्यात राही. एकदा सुभाषचंद्र बोस भाषणाकरिता आले असता त्याने

त्यांच्या स्वाक्षरीसाठी मोठया लाडिकपणे एक छोटी वही पुढे केली, तेव्हा

ती त्यांनी दूर फेकून दिली. हळूहळू कॉलेजात विद्यार्थी-खेळाडूंऐवजी

युवकच येऊ लागले आणि चार वर्षे संपली, त्या वेळी सुटका झाली असेच वाटले



पान नं. 51

त्या वेळी बराच विरंगुळा मिळायचा तो संध्याकाळी करंदीकर आजोबा

आणि अप्पा काळे घरी आले म्हणजे. करंदीकर आजोबा नियमितपणे घरी

येत. दादांना पुष्कळदा घरी यायला वेळ लागे, पण ते आल्याखेरीज नि

त्यांना भेटल्याखेरीज करंदीकर जात नसत. काही वेळा ते अधीरपणे

विचारत, ""काय रे, चित्रगुप्ताला आज इतका उशीर का ?"" दादा

वकिलाकडे काम करत. त्यांनी पाचसहा वकिलांकडे काम केले होते.

त्यांपेकी एकावर करंदीकरांचा फार राग होता व ते त्याला यम म्हणत.

यमाचा कारकून म्हणून दादा चित्रगुप्त. खरे म्हणजे दादा त्या ठिकाणी सहा

महिने टिकले नव्हते व त्यात देखील दोन महिन्यांचा पगार बुडाला होता.

पण करंदीकरांना मात्र ते कायमच चित्रगुप्त राहिले.



दोनचार दिवसांनी अप्पा काळे येत व मग बोलताना दोघांचीही घड्याळे

मरत. आजोबांना घेऊन जाण्यासाठी आलेला पिशव्या विठोबा समोरच्या

कट्ट्यावर बसून कंटाळे, व पेंगू लागे. मग त्याला मागच्यादाराने आत

बोलावून आई त्याच्यापुढे ताट ठेवत असे. मी चौथीत जाईपर्यंत कित्येकदा

दातार मास्तर देखील येत असत. मग तर रात्री आठ काय, नऊ काय,

वाजून जात. स्वयंपाकघरात आई व आजी पाय लांब करून जमिनीवरच

बसून बोलत बसत. पण जेवणाची हाक येईपर्यंत काय करावे, हा प्रश्न

माझ्या एकटयापुढेच असे. दादा फारसे बोलत नसत, पण बाकीच्यांच्या

बोलण्याला खूप हसत व मधून मधून आत जाऊन चहा, सुपारी, लवंगा

आणत. इतक्या आनंदाने दुसऱ्यांना चहा देणारा दुसरा माणूस मी

आजपर्यंत देखील पाहिला नाही.



करंदीकरांच्या पायात बूट असल्याने ते सोप्याचा उंबरा ओलांडून आत येत

नसत. अप्पा काळे तर स्पष्टच सांगत की आपण खुर्चीत बसलो की फक्त

जायच्या वेळीच उठणार, त्या आधी नाही ! मास्तरांना चहा-सुपारी काहीच

नको असे. काळे यांच्या शब्दांत ""त्यांची गन-पावडरची डबी जवळ असली

की त्यांना मोगल साम्राज्य तुच्छ वाटे."" मग मी चौथीत गेलो, व दातार

मास्तरांचे आमच्या घरी येणे बंद झाले. आता मी त्यांचा विद्यार्थी होतो,

आणि एखाद्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मनमोकळेपणाने वाटेल ते बोलावे,

हे त्यांच्या वागणुकीत बसत नव्हते. अनेकदा दाद त्याबद्दल हळहळत.





पान नं. 52

बालगंधर्व-केशवराव भोसले यांच्या संयुक्त प्रयोगाप्रमाणे ही तीन माणसे

बोलत राहतात, असे ते म्हणत.



अप्पा काळे चार ते सहा क्लबमध्ये असत, व कुठला तरी एक गावठी रमीचा

डाव खेळत. त्यात दररोज पाच-सात आण्यांचा फार तर व्यवहार होत असे.

ते आपल्याला मिळालेला पेसा कधी घेत नसत, पण गेलेल्या पेशाची उधारी

ठेवत नसत. काही आणे गेलेल्या दिवशी क्लबपासून आमच्या घरापर्यंतचा

रस्ता त्यांच्या आरडाओरड्याने लालभडक होत असावा. त्यांना स्वतःचे

असे घर नव्हतेच. स्वतःच्या दोन खोल्या आणि शेजारच्या छोटया दुकानाचे

भाडे एवढेच त्यांचे ऐहिक वेभव होते. त्यांना एकुलती एक बहीण होती, व

ती सोलापूच्या शाळेत काम करत असे. अप्पा काळे दोनच गोष्टी निष्ठेने

करत. ते पत्ते खेळत व सिगरेट ओढत. सिगरेटमुळे त्यांच्या मधल्या बोटाचे

एक पेर काळसर-तपकिरी झाले होते. मी एकदा जादापणा दाखवून

विचारले, ""तुम्ही सिगरेट फार ओढता का ?""



का कुणास ठाऊक, ते मला नेहमी `अहो-जाहो' म्हणत. ते म्हणाले, ""अहो,

सिगरेट नसती तर मी केव्हाच खलास झालो असतो. बोट असे काळे का

होते, हे नंतर कधी तरी तुम्हांला समजेल. पण सिगरेट ओढण्याची सुरूवात

मात्र कधी करू नका, महाराज.""



त्यांची ही गोष्ट नंतर मी कधी ऐकली नाही. वेतागाच्या, दुःखाच्या

वेळी मी आयुष्यभर सिगारेटचा आश्रय घेतला. सिगरेटइतक्या

सहनशीलतेने आपले कुणी कधीच ऐकून घेत नाही. तिला स्वतःचा असा

आवाज नाही, मत नाही, उपदेश नाही. तिच्यात पत्नीची घरगुती सततची

बडबड नाही, की आपल्याला सतत बोटावर नाचवण्याचा प्रेयसीचा आचरट

प्रयत्न नाही. त्यामुळे सिगरेट सोबत नाही. एकादे अरभाट पुस्तक

किंवा शास्त्रीय संगीताची कुलीन मेफल सोडल्यास !



पण त्यांची एक गंमत होती. आमच्या घरात त्यांनी कधी सिगरेट ओढली

नाही. पायरीवर पाऊल पडले की सिगरेट गटारात पडलीच. दहा मिनिटे

सिगरेटशिवाय न राहणारे काळे तीन-तीन तास तिला स्पर्श न करता गप्पा

मारत बसत.



एकदा करंदीकर आजोबांनी शाहू नगरवासी कंपनीचा उल्लेख केला.



पान नं. 53

गणपतराव जोशांचे नाव घेतले आणि कौतुकाने मान हलवली. अप्पांनी

खुर्ची खस्सदिशी पुढे ओढली. कोणताही महत्वाचा मुद्दा मांडायचा असला

की अप्पा तसे करत. त्यावर घाबरल्यासारखे करून करंदीकर म्हणाले,

""ऐकलेत का भीष्माचार्य, तुम्ही मारे ज्यांचा धोशा लावता ते

गणपतराव जोशी, बालगंधर्व, कोल्हटकर, केशवराव भोसले, नाना फाटक

ही सारीच मंडळी अगदी कुचकामी आहेत. अभिनय म्हणजे काय हे

कुणालाच साऱ्या जन्मात कधी समजले नाही. अहो, त्यांच्यापेक्षा एक गोटा

नारळ जास्त चांगला नट ! सगळा कंजार-कचका, आरडाओरड नुसती.

`माझं नाव घनश्याम' एवढी साधी गोष्ट सांगताना एवढा खणखणीत आवाज

लावण्याची काय गरज आहे ? आम्ही देखील इतके बुद््दू की त्या वेळी

आमच्या अंगावर झरकन काटा उठायचा !""



""पण काळोबा, नाटकात थोडा नाटकीपणा यायचा नाही तर तो यायचा

केव्हा, मंत्रपुष्पाच्या वेळी ?"" टेबलावर मूठ आपटत करंदीकर म्हणाले.



""द्रोणाचार्य, आयुष्यभर तुम्ही पगडी वापरलीत, पण फिरवायची कशी हे

मात्र शिकून घेतले नाही. आजचे नाटक कसे असते माहीत आहे ?एक

मिशाळ नट स्टेजवर बाजूला जातो, आणि प्रेक्षकांकडे पाठ करून बसतो,

आणि उगाच होय की नाही असा एक निःश्वास सोडतो. तो पुन्हा प्रेक्षकांकडे

येतो, त्या वेळी त्याच्या मिशा थोड्या विसकटलेल्या असतात. त्यावरूनच

अत्यंत दारूण अशा संकटामुळे त्याचे जीवन उद््ध्वस्त झाले आहे असे

आम्ही मुकाटयाने समजावयाचे. आणि ती प्रसिध्द नायिका कोण ती मसणी !

ती नाकपुड्या काय सुरेख थरथरवते म्हणता ! त्या थरथरू लागल्या की

तिला आवेग आनावर झाला आहे, असे आपण मानायचे, व आता ती आपले

व्यक्तिमत्व शोधण्यासाठी चौथ्या पुरूषाबोरबर सिंगापूरला जाणार हे

आपण ओळखायचे. तिची सूट-केस नेहमीच तयार असते. आजच्या नाटक

कंपनीत एखादा पडदा कमी असेल, फर्निचर नसेल, पण एक सूट-केस

तयार नाही असे मात्र कधी घडणार नाही.""



पान नं. 54

""काळोबा, हा काय आचरटपणा आहे ?"" करंदीकर म्हणाले, ""स्टेजवर

प्रेक्षकांकडे पाठ करून बसलेल्याचा मिशाळ निःश्वास आम्ही कसा

ऐकणार ? आणि ती कोण पूतनामावशी, तिच्या थरथरणाऱ्या नाकपुडया

मागल्या रांगेतील प्रेक्षक काय दुर्बीण लावून पाहणार ? आणि तसे पाहून

घायाळ होणार ? अहो, म्यानात नवी युरोपियन झाडणी ठेवणारे धेर्यधर !

ग्रीक नाटकांत नट मुखवटे वापरत असत. उंची वाढवण्यासाठी पायाखाली

ते लाकडी ठोकळे बांधत. आणि केवळ शब्दांच्या फेकीने, गीत-गायनाने ते

दहा-पंधरा हजार प्रेक्षकांना उघडया थिएटरमध्ये तासन्् तास खिळवून

ठेवत असत, माहीत आहे ? अहो गलपोजी, तुमचे ते नेपथ्या, ती

प्रकाशयोजना सारे घाला खड््डयात ! नाटक जगते ते भाषणावर,

संवादावर ! असा एक धाडसी प्रयोग कधी कुणी केला नाही, पण करून

पाहायला हरकत नाही. समोर एक मोठा पडदा लावायचा आणि त्यामागून

केवळ भाषणे ऐकवायची. पात्रांची थोबाडे समोर नकोत. बघा राजसंन्यास

रंगते की नाही !



""अगदी तुळशी देखील पडद्यामागेच का ?"" अप्पांनी खवचटपणे

विचारले.""



""तुळशी देखील नव्हे, राजश्री,विशेषतः तुळशी. अरे संभाजीसारख्या

उमद्या वीराने सारे आयुष्य जिच्यावरून ओवाळले ती तुळशी तुम्ही प्रत्यक्ष

दाखवणार तरी कशी ? ती जलसुंदरीप्रमाणे वर आली, आणि गडकऱ्यांच्या

कल्पनेत जगली. तशीच ती प्रत्येकाच्या कल्पनेत तेजाळत राहू दे."" काळे

मोठ्याने हसले व त्यांनी टाळी वाजवून खुर्ची आणखी पुढे सरकवताच

करंदीकर मागे सरकले.



""राजसंन्यास म्हणातच एक आठवण झाली,"" अप्पा काळे म्हणाले, ""तीन

वर्षांपूर्वी राजसंन्यास नाटकाच्या जाहिराती लागल्या होत्या, आठवते का

व्यासमुनी ? आणि तुळशीचे काम कोण करणार होते माहीत आहे ?तर

चाळशी घातलेल्या मेंढीप्रमाणे दिसणारी ती प्रसिध्द नटी ! बोला, आला की

नाही प्रळयकाळ ? महाराज, माझ्यावर विश्वास ठेवा. अगदी शपथ घेऊन

सांगतो, मी अंगारा लावला नाही. पण त्या दिवशी मात्र आम्ही धापा टाकत,

धावत चार मेलांवरच्या स्वयंभू माळ मारूतीकडे गेलो, आणि त्याच्या समोर

अंग टाकले.



पान नं. 55

त्याला नवस केला, त्याला साकडे घातले. कधी नाही ती त्याने

आमची याचना ऐकली. ऐन वेळी प्रयोग रद्द झाला. तेव्हा कुठे आम्ही शुध्दीवर

आलो, आणि नारळ फोडून सगळ्यांना खोबरे वाटले.""



""आम्ही ?म्हणजे आणखी कोण होते तुझ्याबरोबर ?"" थोडया आश्चर्याने

करंदीकरांनी विचारले.



त्या प्रश्नाची जणू वाटच पाहत असल्याप्रमाणे अप्पा हसले व त्यांनी

टेबलावरची पगडी गर्रकन फिरवली. ते म्हणाले,"" आम्ही म्हणजे मी आणि

गडकरी !""



अप्पा काळेंनी आपल्यासाठी काम करावे यासाठी चित्रपटनिर्मात्यांनी काही

त्यांच्यामागे फारशी गर्दी केली नसती. साधारणपणे बोटभर दाढी वाढवलेली,

व अंगात खादीचा लांब सदरा. मुळातच खादी हे कापड पूर्ण स्वच्छ असले

तरी मवाळ मळकट दिसते. एकदा एका माणसाने आपणाला तहान लागली

आहे असे म्हटल्यावर एका सज्जनाने त्याला पेलाभर पाणी दिले तेव्हा तो

उसळून म्हणाला, I said, I am thirsty, not dirty !"" अप्पा काळे

आग पाणी घेत नसत, पण त्यांना पाण्याविषयी दुःस्वास तेवढाच होता.

अप्पा अशा स्वरूपात आले की अनेकदा करंदीकर विचारत, ""काय एखाद्या

ज्वलंत प्रश्नावरील नाटकात काम करणार की काय ? त्यातील

नायकासारखे दिसता !""



""ते जाऊ द्या हो कृपाचार्य. तुमचा चहा वगेरे मी येण्यापूर्वीच संपन्न झालेला

दिसतोय.""



""संपन्न ?हे काय नवीन काढले आहेस ?""



""महर्षी, मराठी भाषा टिकवण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे, गोड मानून

घ्यावा.""खुर्चीत जास्तच रूतत काळे म्हणाले,""आजकाल मराठीत समारंभ

साजरे होत नाहीत, तर संपन्न होतात. उद्योगधंद्यात कामगार नसतात, तर

असतात कर्मचारी. पोलिस उपाययोजना करत नाहीत, तर करतात

कारवाई.""



एखाद्याचे ज्ञान कितीही असो असे म्हणायचे नाही, तर त्याचे ज्ञान भले

कितीही असो, असे म्हणायचे. होय का ? असे विचारणे म्हणजे तर



पान नं. 56

बावळवटपणाची कमाल आहे. तर `अच्छा अच्छा' असे राष्ट्रीय एकात्मतेने

म्हणायचे. याच माणसांना एकादा इग्रंजी शब्द आला तर मात्र एका

स्वयंचलितेपुढे आडवे व्हावेसे वाटते ! सरकारी-नव्हे चुकलो-शासकीय

मराठी तर अमरच आहे. तिला आमचे कोटी कोटी वंदन ! अलीकडे मुलगी

पाहण्याचा कार्यक्रम कमी होत चालला आहे. पण असलाच तर मुलीला

शासकीय मराठीतील एका उताऱ्याचा अर्थ सांगता येईल का, असं

विचारावे. ती जर `होय' म्हणाली तर हे वधूइच्छुका, तेथून तत्काळ पलायन

कर. एवढी असामान्य प्रतिभावंत स्त्री तुला बिलकुल पेलायची नाही.



करंदीकर हसत म्हणाले,"" मला अर्थ माहीत नाही, तुम्हीच तो घरगुती

मराठीत सांगा, असे ती म्हणाली तर पंचाईतच व्हायची !""



""पंचाईत कसली ? ती संतोषाचीच गोष्ट होईल. त्याबाबत आपला तर पूर्ण

बोऱ्या उडाला आहे हे स्पष्ट सांगावे. बरे का, समान बौध्दिक पातळीवरचे

हे लग्न सुखाचेच होण्याची शक्यता आहे.पण एक गोष्ट मात्र मान्य केली

पाहिजे. सरकारला शासन म्हणणेच जास्त योग्य आहे, हे मात्र पदोपदी

जाणवते ! हो, आणखी एक नवीन ऐकले का तुम्ही मुनिवर्य ? आता `एकच

प्याला' हे नाटक साध्या कपड्यांत होणार आहे ""



दादांनी आणखी एक चहा आणून ठेवल्यावर काळे खूष झाले. एका लहान

कपावरच करंदीकरांचे चहाचे अवसान संपत असे. करंदीकर म्हणाले,

""म्हणजे सुधाकर फेडेड जीन्स घालणार, सिंधू स्लीव्हलेस घालून गोल

पातळात हुंदके देत `कशि या त्यजू पदाला' असे म्हणणार की काय ? आणि

जुनेरे नेसून दळण दळणाऱ्या सिंधूचे काय मग ?""



खोटया वेतागाने अप्पांनी मान हलवली. ते म्हणाले, ""आजोबा, आता

तुमच्या पगडीसह तुम्हांला जुन्या बाजारात ठेवले पाहिजे. आता नव्या

नाटकात सिंधू एक पाय जात्याभोवती सोडून दळण जळणारच नाही,

समजले ? त्या सीनमध्ये खरोखरच एक मोलकरीण पाच मिनिटे दळत

बसेल व सिंधू स्टेजवर या कडेपासून त्या कडेपर्यंत केवळ येरझाऱ्या घालत

राहील, आणि छोट्या हातरूमालाने कपाळ टिपत राहील. अहो, गाण्याला

जसा प्लेबॅक असतो ना, तसा अभिनयाला देखील असा प्लेबॅक द्यायचा;

समजले ?""
------------------------------------------------------------------
पान नं. 57

""अरे, पण मग ती स्लीव्हलेस गुळव्वा पाहिजे कशाला ?""



""अहो द्वेपायन, आता तुमच्यापुढे करू तरी काय ? जर ती बया नसेल तर

रंगभूमीवर मेरूमांदार गदगदा हलवून सोडणारी क्रांती कोण घडवणार?

मी फार वर्षांपूर्वी `द्रौपदी वस्त्रहरण' नाटक पाहिले होते. द्रौपदीचे काम

करणारा नट म्हणे अत्यंत तलम अशी सात पातळे नेसत असे व मग

दुःशासन त्यातील एकेक ओढत असे. त्या वेळी आम्हांला फार भीती

वाटायची, एखाद्या दिवशी पातळे मोजताना चूक झाली तर काय होईल ?

तसे घडले असतो तर मराठी नाटक बऱ्याच आधी एकदम वयात येऊन

बसले असते ! ही आपत्ती टाळण्यासाठी मी एक प्रतीकात्मक पण

क्रांतिकारक उपाय सुचविला होता. तो त्यांनी स्वीकारला नाही ही गोष्ट

निराळी. त्यामुळे नाटकाचा पहिला क्रांतिकारक म्हणून मला मिळायचे श्रेय

हरपले. द्रौपदीने एकच पातळ नेसायचे., पण एक-दोन आकडे असलेले

वाटेल तितके हातरूमाल कमरेला खोचायचे. दुःशासनाने एक हातरूमाल

ओढून बाजूला टाकला की एक वस्त्र गेले. हा प्रकार दुःशासन अक्षरशः

दमेपर्यंत अथवा कंटाळेपर्यंत चालू ठेवता येतो.""



""असलाया नाटकाला कवडी तिकीच तरी प्रेक्षक ढंकून बघणार नाहीत.

मग एका हातरूमालावर प्रेक्षक असे लिहून तो समोर खुर्चीवर ठेवावा

लागेल."" हात झाडत करंदीकर म्हणाले.



त्यांच्या गप्पा चालूच राहिल्या व कुणाला जेवणाची आठवण होईना. घरी

तर इतरांची संकष्टी होती. आणि चंद्रोदय सव्वादहानंतर असल्याने

स्वयंपाकघरात सारे शांत होते. माझ्या डोळ्यांपुढे मात्र भुकेमुळे चांदण्याच

काय, चंद्र प्रकाशू लागले होते. मला एकदम कांदेविक्याच्या

कवितेची आठवण झाली. त्याने बहुधा आपली कविता संकष्टीच्याच एखाद्या

अनुभवाने लिहिली असावी. कारण उपाशी पोरांच्या तोंडाकडे पाहत

संथपणे उगवत स्वतःशी हसणारा चंद्र बिलंदरच असला पाहिजे. एखादा

झटका आल्याप्रमाणे अप्पा काळे मध्येच खाडकन उभे राहिले व

घड्याळाकडे पाहत म्हणाले, "" बाप रे, नऊ वाजायला आले की !""



""आता जेवून जा, किंवा आज इथेच राहा."" दादा म्हणाले. ""मात्र जेवायला

दहा वाजून जातील""





पान नं. 58

""इतर वेळी राहिलो असतो, चित्रगुप्त! पण संध्याकाळपासून काय झाले

आहे कुणास ठाऊक, पोटात वारूळ उठल्याप्रमाणे झाले आहे. आतड्याला

गाठ बसल्याप्रमाणे होत आहे. ते विसरावे म्हणून येथे येऊन वात्रट बोलत

बसलो झाले. आता मात्र खोलीकडे गेलेच पाहिजे. असा आकांत वाटत

आहे. पण हे बघ, मी कधी तरी मुद्दाम येणार आहे- अगदी

इच्छाभोजनासाठी. तीळ लावलेली बाजरीची गरम भाकरी, भरल्या

मसाल्याची वांग्याची भाजी, खूपसे दही आणि पांढऱ्या कांद्याची कोशिंबीर,

बस्स, मग चित्रगुप्त, तुला एक महिना भरपगारी रजा द्यायला सांगेन तुझ्या

मालकाला.""



पण त्या वेळी अप्पांकडे पाहून कुणालाही हसावेसे वाटले नाही. सगळा

जगाने त्यांना बाहेर काढले आहे, व ते त्याच्याकडे रोखून पाहत आहेत.

असे एकटे, बावरलेले दिसत होते.



अप्पा निघालेले पाहून करंदीकर देखील उठले. त्यांनी दारातूनच `विठोबा

म्हणून हाक मारली. विठ्ठलने समोरच्या कट्ट्यावर आरामात पाय पसरले

होते. हाक ऐकून तो धडपडत उठला, व आजोबांबरोबर निघाला. हा विठ्ठल

अगदी अनाथ होता. तसे पाहिले तर त्याला जवळचे कुणीच नव्हते. पण

करंदीकरांनी अतिशय दूरचे असे कुठले तरी नाते काढले होते, व त्याला

एका खासगी अनाथाश्रमातून आणून घरी ठेवले होते. आश्रिताचे त्याचे

आयुष्य, त्याला घरात एखाद्या जुन्या झाडणीपेक्षा जास्त किंमत नव्हती.

पाहावे त्या वेळी तो हातात पिशव्या घेऊन बाजाराकडे तरी जात असे किंवा

तेथून परतत तरी असे. त्यामुळे आम्ही त्याला `पिशव्या विठोबा ,म्हणत

असू. तो नेहमी चिरडलेला, घामट असा दिसे. तो माझ्यापेक्षा एखाद-दुसऱ्या

वर्षांनेच मोठा असेल. तो पूर्ण मोफत असलेल्या एका जुनाट,

नायटयासारख्या दिसणाऱ्या शाळेत जात असे. पण तो कधी आमच्यात

येऊन बसला नाही. थट्टा-मस्करी केली तरी तो कधी चिडला नाही. तो

घरावरून जाताना दिसला की त्याला हाक मारून आई त्याला काही तरी

खायला देत असे. पण त्या वेळी देखील त्याला पिशव्या घरी लौकर

पोहोचवण्याचा घोर लागलेला असे. तो निघाला की घाईघाईने जाऊन

त्याच्या दंडाला चिमटा काढणे ही माझी `गुड नाइट' म्हणण्याची पध्दत

होती, व विठ्ठलने त्याला कधी हरकत घेतली नाही.





पान नं. 59

काळे उठले व पायरीवर आले, पण मध्येच थांबून दादांना म्हणाले,

""ताबडतोब गेले पाहिजे, असे दावे ओढले जात आहे. पण जाऊ नये असेही

वाटते."" मग ते खाली उतरले व पहिले पाऊल रस्त्यावर पडताच त्यांनी

सिगरेट पेटवली. मी लगबगीने विठ्ठलजवळ गेलो, आजोबा जवळ असता

तो ओरडणे शक्य नव्हते. मी चिमटा काढण्यासाठी बोटे पुढे केली, व थोडे

हसत तो बाजूला वळला. तेव्हा माझ्या बोटात चिमूटभर कापड राहून चिमटा

चुकला. सदरा फाटला. त्याच्या चेहऱ्यावरील हसू पुसले गेले व तो म्हणाला,

""आता उद्या शाळेला काय रे ?"" तोच आजोबांनी त्याला पुन्हा हाक मारली,

व तो लगबगीने त्यांच्याबरोबर चालू लागला.



नंतर चार-सहा दिवस अप्पा काळे आलेच नाहीत. करंदीकरांचे बोलण्यात

लक्ष लागेना. एक लहान कप चहा घेतल्यावर दोन-चार मिनिटे बोलून ते

निघून जाऊ लागले. आणखी दोन-तीन दिवस गेल्यावर दादा बोलून देखील

अस्वस्थ झाले. ""बाहेर कुठे जायचे असेल तर आम्हांला तसे

सांगितल्याखेरीज जाणार नाही, काळोबा, "" असे ते दोन-चारदा म्हणाले.

क्लबमध्ये देखील अप्पांचा पत्ता नव्हता. त्यांनी खोलीकडे जाऊन पाहिले.

तर खोलीला कुलूप. शेजारच्या दुकानदाराने सांगितले की त्यांची बहीण

फार आजारी आहे, म्हणून तार आली होती. ती त्यांने घेतली व अप्पा

आल्याबरोबर त्यांना दिली. ती वाचल्यानंतर खोलीचे कुलूप देखील न

उघडता अप्पा स्टेशनकडे गेले व रात्रीच्या गाडीने निघून गेले.

दादांनी आपल्या एका मित्राला सोलापूरला पोस्टकार्ड पाठवले व चौकशी

करून कळवायला सांगितले. तिकडून आलेले पत्र हातात पडले, तेव्हा दादा

जेवायला बसणार होते. पण त्यांनी ताट बाजूला सारले व ते बाहेर खुर्चीत

जाऊन गप्प बसले. काही विचारले तर एक नाही की दोन नाही. पण त्यांच्या

डोळ्यांत पाणी दिसत होते. ""अप्पांच्या बहिणीचे काही बरे-वाईट झाले

का ?"" आईने दोन-तीनदा विचारले, तेव्हा दादांनी तिला पत्रच वाचायला

दिले.



बहीण फार आजारी म्हणून अप्पा तिकडे गेले. तिची अवस्था अतिशय

कठीण आहे असे डॉक्टरांनी सांगितले, तेव्हा घरी परतल्यावर अप्पांनी

झोपेच्या गोळ्या घेतल्या व उठलेच नाहीत. ""ती माझी एकुलती बहीण,

आम्ही एकत्र उपास काढले आहेत. आता माझ्या डोळ्यांसमोर तिचे काही

झालेले मला झेपणार नाही."" अशी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.



पान नं. 60

अशाच दोन चिठठया करंदीकर व दादा यांच्या नावाने होत्या. दादांच्या

चिठ्ठीत एक वाक्य जादा होते, ""माझे इच्छाभोजन राहूनच गेले.""

करंदीकरांच्या चिठ्ठीतले जादा वाक्य होते,""आपली मेफल संपली.""



दादांच्या मित्राने चिठ्ठयांतील मजकूर मुद्दाम लिहून पाठवला होता. त्यानंतर

सारे विपरीतच घडले. त्या आजारातून बहीण सावरली. नंतर चार वर्षांनी

जिना उतरत असता पाय घसरून पडली व तिच्या मांडीचे हाड मोडले.

नंतर काय गुंतागुंत झाली कुणास ठाऊक, ती भ्रमिष्टच झाली. ती

कागदाच्या चिठोऱ्यांवर सतत रेघोट्या खरडायची व सांगायची,""एकदा

तरी इकडे येऊन जा म्हणून भावाला पत्र लिहीत आहे.""नंतर तिला त्यातच

कोमा झाला व ती शांतपणे झोपली.



विठ्ठल काही झाले तरी एक आश्रित, एक अर्धपोटी हरकाम्या होता.

करंदीकर आजोबा होते म्हणून निदान घास तरी त्याला मिळत होते.

आजोबा वारल्यानंतर मात्र त्याने तेथून जायचे ठरवले. तो मला भेटायला

आला, त्या वेळी भडाभडा बोलून गेला. तो म्हणाला,""मी जाताना

उंबऱ्यापर्यंत पोहोचवायला देखील कुणी आले नाही बघ. दारात बांधलेले

कुत्रे, ते माझ्या इतक्या ओळखीचे. त्याचे खाणे-पिणे पाहणे हे तर माझे एक

कामच होते. मी त्याला अगदी छातीशी उचलून धरून दोनदा डॉक्टरकडे

नेऊन आणले होते. पण मी जात असता ते वस्सकन्् अंगावर आले आणि

त्याने माझी पँट दातात धरून टरकावली. त्यानेच मला सगळ्यांना निरोप

सांगितला,`आता तुझे इथे काही नाही. तू परका आहेस, तू चालता हो, तू

चालता हो.' पण त्या वेळी तुझ्या दादांचा मला केवढा आधार मिळाला हे

तुला माहीत नसेल.

सध्या तरी दादांचा विषय मला नको होता. अजून आमची जखम ताजी

होती. जाताना त्यांना अतिशय वेदना झाल्या. आईने आपले मन दगडाचे

केले, म्हणूनच ती शेवटपर्यंत त्यांच्याजवळ बसून राहिली. मी हॉस्पिटलकडे

गेलो की ते माझ्याकडे नुसते पाहत राहायचे. पण त्यांच्याकडून एक शब्द

यायचा नाही. आमच्यासाठी त्यांच्याकडे कसल्याच चिठ्ठ्या उरल्या

नव्हत्या.""

""आजोबा गेल्यानंतर दादांनी एक दिवस मला बोलावले आणि एक पाकीट

माझ्या हातात ठेवले. ते म्हणाले, करंदीकर आजोबांनी तुला देण्यासाठी



पान नं. 61

माझ्याजवळ नऊशे रूपये ठेवले होते. कदाचित आता आपण फार दिवस

उरणार नाही, हे त्यांना समजले असावे. एकंदर परिस्थितीत यापेक्षा ते

काही जास्त करूच शकले नाहीत. एक पत्र देखील आहे बघ आत !मला

कसलीच काही कल्पना नव्हती. माझे हात थरथरू लागले. आत आजोबांची

एक चिठ्ठी मात्र होती : `माझी शेवटची भेट नऊशे रूपये.' मी नोटा मोजून

पाहिल्या, तर त्या एक हजाराच्या होत्या. दादा म्हणाले, `होय, शंभर रूपये

माझी एक भेट. कुणास ठाऊक, आपण आता केव्हा भेटू ते. धीराने वाग

आणि आयुष्यात स्वच्छ पावले टाकत जग.' मी त्यांच्या पायांवर डोके ठेवले

व झटकन निघून गेलो, माझ्या तोंडून एक शब्द येईना - शपथ ! मग मात्र

मारूतीच्या देवळात जाऊन अर्धा तास रडलो, मन मोकळे केले. ""
------------------------------------------------------------

Saturday, October 11, 2008

एक होता कार्व्हर

><सौ. वीणा गवाणकर>

<एक होता कार्व्हर><दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन><पुणे>



आवृत्ती :- आवृत्ती पाचवी

एकूण पाने :- 18

FROM 1 TO 118

---------------------------------------------------------



+

पान नं.1



""ए ! चल, उठतोस की येऊ मीच तिकडे ?"" मोझेस बाबांची

दमबाज हाक ऐकून ते काळं, बारकं पोर दचकून उठलं. अजून पुरतं

उजाडलंही नव्हतं. पण मोझेसबाबाला कुठला तेवढा धीर ?



""तुझ्याएवढी पोरं बघ कशी धारा काढतात,गुरं राखतात. कोंबडया-

डुकरांची देखभाल करतात. पण तुझे असले हे काडयामुड्याचे

हातपाय आणि हे असलं मुकं तोंड ? काय होणार तुझं ते देवास

ठाऊक !""



""नका हो असं करवादू!"" सुसानबाई आपल्या नवऱ्याला -

मोझेसला-चुचकारत म्हणाली,""केवढंसं पोर ते. काल दिवसभर

काम करून थकलंय.""



""पण मला आता शेतात कोण मदत करील ? खिशात ना पेसा ना

अडका. लागवडही नीट झालेली नाही. अशा आळसानं उभ्या पिकाची

नासाडी व्हायची."" मोझेसबाबा कुरकरले.



""काही काळजी करू नका. ईश्वरकृपेने सारं ठीक होईल. अहो ! हा

दुबळा पोरसुध्दा बघा. काही दिवसांनी कसा ठणठणीत होईल तो !""

""हो ! होईल !एक घोडा होता तोही या पोरापायी गमावला.""



झालं होतं. काय-अमेरिकेतील मिसोरी राज्यातील, डायमंड ग्रोव्ह

(Diamond Grove) पाडयावर मोझेस कार्व्हर नावाचा एक जर्मन

शेतकरी आपली पत्नी सुसान हिच्यासह राहात असे. त्याच्या घरी

""मेरी"" नावाची गुलाम निग्रो स्त्री होती. ज. ग्रॅटकडून त्याने ती

700 डॉलर्सना विकत घेतली होती. वास्तविक मोझेस कार्व्हरला



पान नं. 2

गुलामगिरी पसंत नव्हती. माणसं विकत घेणं अमानुषपणाचं वाटे. पण

शेतीवाडी बघताना आपल्या एकाकी पत्नीच्या मदतीसाठी अन्

सोबतीसाठी कोणी असावं, म्हणून त्यानं ""मेरी"" विकत घेतली होती.

तिला आपल्या घराजवळच्या गोठयाशेजारी एक लाकडी

खोपटही बांधून दिलं होतं. तिचा नवरा दुसऱ्या एका मळेवाल्याकडे

लाकडे कापण्याच्या कामावर मजुरी करायचा. मधून मधून तो आपल्या

बायकोला-मेरीला-भेटायला येई. एके दिवशी तिला बातमी मिळाली

की, दोन महिन्यांपूर्वीच तिचा नवरा अपघातात मेला. गुलामीचं जिणं !

बिचारीला बातमी दिली गेली हेच खूप म्हणायचं



दुःखाचे कढ सुकतात तोच एका रात्री मेरीच्या किंकाळ्यांनी

""डायमंड ग्रोव्ह"" दचकून उठलं. 1860 -62 च्या सुमाराची ही

घटना. गुलामांना पळवून,विकायचं हा मोठा तेजीचा धंदा झाला होता.

मेरीवर अशाच एका टोळीची नजर पडली. रातोरात तिला पळवून

नेण्यासाठी धाड पडली होती. मेरीच्या किंकाळ्यांनी जाग आल्यावर

काय घडतंय याची कल्पना क्षणार्धात मोझेसबाबांनी आली. ते आपली

बंदूक सरसावून मेरीच्या खोपटाकडे धावले. पण उशीर झाला होता.

दूरवर जाणारा घोडयांच्या टापांचा आवाज ऐकत ते हताश होऊन

नुसतेच उभे राहिले.



सुसानबाई घराबाहेर आल्या. मेरीच्या खोपटापाशी जाण्याचं त्यांच्यात

त्राण नव्हतं. मोझेसबाबांचा आधार घेऊन त्या कशाबशा खोपटाकडे

गेल्या. मेरीच्या मोठया मुलीला या धाडीत जिव्हारी मार बसला होता.

ती शेवटचे आचके देत होती. मधला मुलगा ""जिम"" अजूनही थरथर

कापत, अंधाऱ्या कोपऱ्यात लपून होता. धाकटा दोन महिन्यांचा पोर

आणि मेरी यांना पळवून नेण्यात आलं. होतं. त्या रात्री त्या खेडयातले

बरेच निग्रो गुलाम पळवले गेले. कार्व्हर शेतकऱ्याने गावकऱ्यांच्या

मदतीने मेरीची व तिच्या बाळाची सुटका करण्याचा प्रयत्न केला.

त्यासाठी त्याने आपल्या शेताचा तुकडा देऊ केला,उमदा घोडा देऊ

केला. त्याच्या त्या उमद्या घोडयाच्या मोबदल्यात तो परत काय



पान नं. 3

मिळवू शकला ? तर मेरीचा दोन महिन्यांचा मरणोन्मुख मुलगा. मेरी

नाही !



साऱ्यांनीच त्या मुलाची आशा सेडली होती. जेमतेम श्वासोच्छ्वास

करणारं ते काळं मुटकुळं, कोणत्या घटकेला आचका देईल सांगता येत

नव्हतं. पण सुसानबाईनी आशा सोडली नाही. त्यांच्या शुश्रूषेला फळ

आलं. तो मरणोन्मुख जीव पुन्हा तग धरू लागला. त्याचा तो छाती

फोडून बाहेर पडणारा खोकला आणि घुसमटणारा दुबळा श्वास पाहून

कोणाला वाटलंही नसतं की हे पोर जगेल ! फक्त सुसानबाई मात्र

जिवापाड काळजी घेऊन मेरीचं पोर जगवीत होत्या. त्यांच्या दीर्घ

परिश्रमांना यश आलं. त्या पोरानं जीव धरला. तो हळूहळू चालू

लागला. खाऊ लागला. पण वारंवर उसळणाऱ्या भयानक खोकल्याच्या

उबळीनं त्याचं स्वरयंत्र साफ बिघडलं होतं. त्याला बोलता येत नव्हतं.

मेरीचं पुढं काय झालं हे कधीच कोणाला कळलं नाही. त्या उत्तम,

उमद्या घोडयाच्या बदल्यात परत मिळवलेला मेरीचा दमेकरी,दुबळा,

मुका पोर मात्र कार्व्हरच्या घरात वाढत होता. त्याच प्रसंगाची

मोझेसबाबांना आठवण झाली. सुसानबाईंच्या त्या शुश्रूषेत,देखभालीत

त्यांचाही वाटा होता. `मेरी' ला त्यांनी गुलाम म्हणून कधीच वागवलं

नव्हतं. मेरीच्या या पोराबद्दल त्यांना ममता होती. ही ममता सुसानबाई

जाणून होत्या.



अमेरिकेतील राज्याराज्यांतील यादवी संपली होती. गुलामगिरी

कायद्यानं नष्ट करण्यात आली. यादवीपायी विस्कळीत झालेले जीवन

पुन्हा सुरळीतपणे सुरू झाले होते. शेतीवाडी करायला उसंत मिळू

लागली होती. युद्धाचा रखरखाट संपून सगळीकडे जीवन बहरत होतं.

डायमंड ग्रोव्ह आणि आजूबाजाच्या ""ओझार्क"" टेकडया फळाफुलांनी

बहरू लागल्या होत्या. बहरलेल्या निसर्गात कार्व्हरचा तो अनाथ

पोर सुखावत होता. आता तो दहा-एक वर्षाचा झाला होता. मोझेस-



पान नं. 4

बाबांनी गुरांची,बागेची परसूची देखभाल करण्याचं काम त्याच्यावर

सोपवलं होतं. तोही ती कामं मोठया हौसेने करी. शिवाय जवळच्या

झाडीत जायचं, वेगवेगळ्या झाडांची रोपं आणून मोझेबाबांच्या

परसूत लावायची, बागेत निरनिराळे ताटवे सजवायचे, वाफे तयार

करायचे आणि दृष्ट लागण्यासारखी बाग फुलवायची हा त्याचा खास

आवडीचा छंद. त्यातच त्याचा फावला वेळ जायचा.



नव्यानंच शेजाराला आलेल्या सौ. म्युलरबाई एकदा गप्पागोष्टी

करायला सुसानबाईकडे आल्या होत्या. चहापाणी झाल्यावर

सुसानबाईंनी आपली छोटी, सुरेखशी बाग त्यांना दाखवली. पण त्या

छोटयाशा बागेतील अनेक फुलझाडे सौ. म्युलरना ओळखता येईनात.

सौ. म्युलर खोदून खोदून विचारू लागल्या, तेव्हा सुसानबाईनी

आपल्या `माळ्याला' हाक मारली. छोटा माळीदादा गुणगुणत समोर

येऊन उभा राहिला.



""काय हो ! तुम्ही तर म्हणत होता की, याला बोलता येत नाही

आणि हा तर चक्क गुणगुणतोय !""



""खरोखरच तो मुका आहे. दोनचार शब्दांपलीकडे त्याला बोलता

येत नाही.पण फुलं,फळं,झाडं,कोवळे कोंब यांच्या सहवासात मात्र

तो नेहमी असंच गुणगुणतो. त्याची आईसुध्दा काम करताना अशीच

गुणगुणत असायची. याचं गुणगुणणं तिची आठवण करून देतं.""

छोटा माळी आणि त्याची ती अद्भूत छोटी फुलबाग पाहून सौ.

म्युलरना आपले आश्चर्य लपविता आले नाही. त्यांनी त्या मुलाची

पाठ थोपटली. पण तो छोटा मुलगा मात्र विचारात पडला. ""खरंच

का या लोकांना झाडातलं काही कळतं ? की नुसतं हे कौतुकापुरतं

असतं ? झाडाकडे ""लक्ष"" द्यायला यांना जमतं का ?""

मोझेबाबांनाही या मुक्या मुलाच्या जगावेगळ्या छंदाचा प्रत्यय

अनेक वेळा आला होता. त्याच्या सूक्ष्म अवलोकाचा,निरीक्षणशक्तीचा

त्यांना अंदाज येऊन चुकला होता. झाडावरची अगदी बारीकशी कीडही



पान नं. 5

त्याच्या नजरेतून सुटत नसे. घराभोवतीची झाडं त्याच्यामुळे कशी

सुरक्षित असत. त्यामुळे मोझेसबाबा त्याच्यावर खूष असत.



या एकाकी,अबोल मुलाचा मित्रपरिवार -मुलखावेगळाच होता.

रानावनातील झाडं-झुडपं,पक्षांची पिल्लं,डबक्यातले छोटे मासे हाच

त्याचा गोतावळा. वेळप्रसंगी मोझेसबाबांच्या चापटया खाऊनही या

""मित्रांची"" संगत तो चुकवीत नसे. एकदा त्याने पालापाचोळा,गवत

दोरा,सूत गोळा करून इतकं सुरेख अन् हुबेहूब घरटं बनवलं की,

सुसानबाईंना शपथेवर लोकांना सांगावे लागे ""हे आमच्या मुक्या

पोरानेच बनवलंय !""



तो झाडा-प्राण्यांच्या संगतीत रमे. मनसोक्त गुणगुणत राही. अगदी

भान विसरून ! पोटावर पालथं पडून तासन् तास एखाद्या अंकुराचं

किंवा वाळवीचं निरीक्षण करीत राही. त्याच्या या दोस्तांच्या सह-

वासातून त्याला अनेक गोष्टी समजत. त्यांची दुखणी-खुपणी, आजारपणं

कळत. त्यांच्या सहवासात झाडांना जणू जिव्हा फुटत, कान येत.

आपल्या भाषेत त्यांची बोलणी चालत. तोही एक मग चालतं-बोलतं

झाड बने. त्यांच्या सहवासात तन्मय होई. ""झाडांची देखभाल कशी

करावी, त्यांच्या आवडीनिवडी कशा ओळखाव्यात, हे सारं त्याच्या-

कडून शिकावं,"" मोझेसबाबा कौतुकानं म्हणतं.



आजूबाजूचे परिचित त्याला छोटा माळी म्हणत. या छोटया माळ्याला

आपल्या बागेतल्या झाडांचे दवापाणी करायला अनेक ठिकाणाहून

बोलावणे येई. मग हा इकडची झाडे तिकडे लाव. याला झाडीत नेऊन

ठराविक ठिकाणी लावून ये, त्याची आळी भुसभुशीत कर,

पलीकडल्याच्या फांद्या काप-असं काहाबाही करून, बाग दुरूस्त करी.

चारआठ दिवसांनी झाडीत नेऊन लावलेलं रोपटं अलगद काढून आणी

आणि त्या बागेत ठरवून ठेवलेल्या ठिकाणी पुन्हा लावी. त्या बागेचं

रूपच पालटून जाई. त्याच्याही अनुभवात भर पडे. ज्ञानात भर पडे.



सौ. बेनयामबाईंचे गुलाब - "" यांना गुलाबच म्हणायचं का ?"" अशा



पान नं. 6

अवस्थेला आले होते. आपली बाग पाहून ती खंतावत होती. एका

दुपारी ती सुसानबाईकडे गेली. छोट्या माळ्याला घेऊन घरी आली.

त्याला बागेत सोडून घरात गेली. त्याने गुलाब तपासले. घराभोवती

चक्कर टाकली. आपलं काम केलं. काय केलं ते सांगायला घरात शिरला

अन् दिवाणखान्यातच थबकला. काय सुरेख रंगीत चित्रं होती ती.

जन्मात प्रथमच पहात होता तो. किती तरी वेळ तो त्या

चित्रातील रंग न् रेषा न्याहाळत होता. कधीपासून बेनयामबाई

आपल्यासाठी उभी आहे, हे त्याला कळलंच नाही.



""बाळा, तुला चित्रं रंगवायला आवडतं का रे ?""



""मी मी मला"" नेहमीप्रमाणे तोतरेपणा आड आला.



""तू तर माझे गुलाब पाहायला आला होतास नं.?""



""ऊन पाहिजे न् जागा बदलली."" अक्षराला अक्षर अन् शब्दाला शब्द

जुळवत कसंबसं तो बोलला. साफ मुकेपणा जाऊन अलीकडे तो तोतरं

का होईना पण चार-दोन शब्दांचं वाक्य करू लागला होता.

बेनयामबाईला नीट न उमजल्याने तिने बाहेर जाऊन पाहिले.

गुलाबांची जागा बदलली होती. दिवसभर स्वच्छ ऊन मिळेल अशा

ठिकाणी झाडं लावली गेली होती.



""छान माझं काम छान केलंस हं. हे घे तुला "" असे म्हणून त्यांनी

त्याच्या हाती नाणे ठेवले. ते घटट मुठीत धरून तो निघाला. आता

त्याच्या डोक्यात गुलाब नव्हते की नाणं नव्हतं. ती रंगीत चित्रे

डोळ्यासमोर नाचत होती.



घरी आल्यावर त्यानं आपल्या तोतऱ्या भाषेत सुसानबाईंना नाना

प्रश्न विचारले. त्यांना दिवाणखान्यातील रंगीत चित्रांच्या तसबिरी-

समोर उभे करून परत परत विचारू लागला. त्याचं हे तसं बोलणं

समजून घेत सुसानबाईंनी त्याच्या प्रश्नांना उत्तरे दिली. रंग अन् रेषा

समजावून दिल्या. झालं ! नवा छंद सुरू.



पान नं. 7

झाडीतल्या एकांतात हा माळीदादा रंगीबेंरगी फुले, फळे, पाने

कुटून कुस्करून रंग बनवी. पक्ष्यांच्या पिसांचे कुंचले बनवी. मग लाकडी

फळकुटावर,काचेच्या फुटक्या तावदानावर, अगदीच काही नाही, तर

स्वच्छ कातळावर चित्रे काढून रंगवणं सुरू होई.



त्याचा थोरला भाऊ तब्येतीनं धट्टाकट्टा असल्याने मोझेसबाबांबरोबर

शेतात कष्टाची कामे करी. पण हा दुबळा अन् नाजूक असल्याने

नेहमी सुसानबाईभोवतीच घोटाळत असे. त्याची चौकस नजर, त्यांच्या

हाताचं कसब टिपत असे. त्यांचं ते चुली लिंपणं,लोकर पिंजणं,

कातडी कमावणं,मेणबत्त्या बनवणं. मसाले तयार करणं. झालंच तर

पाव,बिस्किटे,पुडिंग तयार करणं, सुयांवर विणणं इत्यादी साऱ्या

गोष्टी तो पाही आणि आपल्या परीने तशा करत राही. सुसानबाईही,

""हा कसल्याच कामाचा नाही तर निदान हे तरी शिकू दे."" म्हणून

त्याला बारीक-सारीक गोष्टी दाखवी. साखर अन् कॉफीखेरीज अन्य

काही त्या विकत घेत नसत. त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्या हाताने

करीत. हाही पुष्कळशा गोष्टी शिकला. तरबेजही झाला. कार्व्हर कुटुंब

खाऊनपिऊन सुखी होतं. पण होतं शिस्तीचं. बेफिकिर,उधळमाधळ

खपत नसे. सगळं कसं टुकीनं चाले. हा ते सारं उघडया डोळ्यांनी

पाहात होता. त्याच्यावर या गोष्टींचे संस्कार खोलवर उमटत होते.

तसं कार्व्हर कुटुंबाने या दोघा भावांना-जिमला अन् या मुक्याला-

निग्रो गुलाम म्हणून कधी वागवलंच नव्हतं. उलट ही भावडं कुठेही

जाण्यास मुक्त होती. हे अनाथ,निराश्रित,पोरके जीव जाणार तरी

कुठे ? मोझेस कार्व्हरच्या आश्रयानेच ते जगत होते.



जिम थोडा मोठा झाल्यावर आपलं नशीब काढायला डायमंड ग्रोव्ह

सोडून गेला. पण छोटा मात्र तिथेच राहिला. छोटयाच्या अंगची

प्रामाणिक अन् विनम्र वृत्ती पाहून कार्व्हर कुटुंबानं त्याचं नामकरण

केलं- ""जॉर्ज"" जॉर्ज वॉशिंग्टन या थोर नेत्याचं नाव ते ! त्याला

आता सारे मुका, छोटा माळीदादा वगेरे न म्हणता जॉर्ज म्हणू

लागले. जॉर्जच्या दुबळ्या, नाजूक प्रकृतीमुळे सुसानबाई त्याला



पान नं. 8

नजरेआड दूर कुठे पाठवायला तयार नसत. त्यांचं ""मेरीचं पोर""

होतं ते. जॉर्जही दूर कुठे जायला तयार नव्हता. आपल्या आईच्या

मृत्यूबद्दल निश्चित काही बातमी नसल्याने त्याला वाटे,"" न जाणो !

आपली आई पटकन् केव्हातरी येईल."" तिच्या स्वागतासाठी तो आपलं

लाकडी खोपटं झाडून-झटकून स्वच्छ ठेवी.



कधी तरी तो आपल्या आईविषयी सुसानबाईंना विचारी. तिच्या

आठवणीनं त्यांचा गळा दाटून येई. त्या म्हणायच्या ""तुझी आई फार

गुणी होती. अगदी तुझ्यासारखी. तुझ्यासारखंच काम करताना काही

तरी गोड, पण उदास गुणगुणायची. कामात फार चलाख. चटपटीत.

तिला लिहावाचायला येत नव्हतं. पण तिची आठवण फार दांडगी

होती बघ.""



""हा पोरगा भारी भंडावतोय ग !"" मोझेसबाबा आपल्या पत्नीकडे

तक्रार करत होते. म्हणे गवत हिरवंच का ? टोळ उडया कशामुळे मारू

शकतो ?सकाळची कोवळी किरण दुपारी कुठे जातात ? इंद्र-

धनुष्य तयार करायला किती वर्ष लागतात ? हे काय प्रश्न झाले ?

वेताग नुसता !""



सुसानबाईंना हसू आलं.""हो !म्हणूनच ना मला `मदत करायला

त्याला माझ्याकडे पाठवता ? कळलं हो ! पण माझी काही तक्रार

नाही. उलट तो हाताशी असला की घरकाम बरीक झटकन् उरकतं !""

""हं नाही तरी शेतीपेक्षा स्वयंपाकघराच्याच लायकीचा आहे तो !""

मोझेसबाबा फिस्कारले.""त्याची वाढच नीट होत नाही त्याला कोण

काय करणार ? खरंतर आता तो चांगला नऊ-दहा वर्षाचा झालाय.

त्याच्या शाळेची सोय पाहायला हवी नाही का ?""



""आहे कुठे जवळपास या निग्रो मुलांसाठी शाळा ? आणि शिकून

तरी काय करणार आहे हा ?"" मोझेसबाबा थोडया उद्वेगानेच

म्हणाले.



""पण आता त्याला आपण स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलंच



पान नं. 9

पाहिजे.त्याचं हे निसर्गप्रेम,रानावनातलं हिंडणं- त्याच्या पुढच्या

धकाधकीच्या जीवनात त्याला निरूपयोगी ठरवील."" मग विषय

बदलीत त्या पुढं म्हणाल्या-""पण काय हो ! त्याच्याच जोरावर तुम्ही

यावर्षी द्राक्षाची लागवड करणार आहात ना ? उद्.या जायचंच म्हटलं

त्या स्विस् शेतीतज्ज्ञानकडे. चला, कामं आवरती घ्या.""



स्विस् शेतीतज्ञ श्री. हरमन यायगर (Hermann Jaegar ) मिसोरी

राज्यात द्राक्षांची लागवड कितपत यशस्वी होईल याचा अंदाज

घेण्याच्या कामगिरीवर आले होते. मिसोरीतील जमीन व हवा

द्राक्षाच्या लागवडीसाठी योग्य आहे हे सिध्द झाले होते. जॉर्जला

हाताशी घेऊन मोझेस कार्व्हरनेही आपल्या शेताच्या तुकडयावर

चाचणी घेतली होती. यायगरसाहेब छोटया जॉर्जच्या हुशारीवर खूष

होते. त्यांनी दिलेल्या बारीकसारीक सूचना जॉर्जने तंतोतंत पाळल्या

होत्या. द्राक्षवेलींची उत्तम निगा राखली होती. मांडवांकडे ध्यान दिलं

होतं. वाळवी, किडीपासून वेलीचं रक्षण केलं होतं. डोळ्यात तेल

घालून सारी कामगिरी बजावली होती. त्याच्या या चोख कारभारावर

यायगर खूष झाले. चाचणी यशस्वी झाली होती. मोझेसबाबांनी आता

जॉर्जच्या मदतीने मोठया प्रमाणावर द्राक्षांची लागवड करावयाचे

ठरविले. जॉर्जही शेतीकामात यानिमित्ताने काही नवीन शिकून घेईल

अशी त्यांना उमेद होती.



""जॉर्ज,उद्या सकाळी आपल्याला त्या द्राक्षवाल्या यायगरकडे जायचंय

बरं का ! "" मोझेसबाबांनी त्याला आठवण दिली.



""हां- हां तो द्राक्षवाला ना ! पण बाबा, द्राक्षांचा रंग जांभळा का

असतो हो ?"" - जॉर्ज.



""मलाही माहीत नाही. सगळीच द्राक्षं काही जांभळी नसतात. काही

काही हिरवी पण असतात. पण ""का"" ते मला नाही नाहीत.""

मोझेसबाबा उत्तरले



""देवाला माहीत असेल ?""



पान नं. 10

""नक्कीच ! देवाला माहीत नाही असं या जगात काहीच नाही.""



""मग देवालाच मी गाठतो आणि विचारतो !"" टुणकन् उडी मारून

पळता-पळता जॉर्ज म्हणला. मोझेसबाबांचे तोंड रागाने लाल झाले. तेव्हा सुसानबाई

त्यांना अडवीत समजुतीच्या सुरात म्हणाल्या-



""जाऊ द्या त्याला.""



""अग पण हा उद्धटपणा बरा नाही. चुकतोय तो. त्यानं असं बोलणं

बरोबर नाही. जणू काही याला भेटायासाठी परसदारी देव खोळंबलाय.""



""तसंही असेल कदाचित्- !""



""सुसा न ! अगं, तू तरी -?"" मोझेसबाबा विचारात पडले. थोडया

वेळानं ते म्हणाले,तुझं बरोबर आहे. त्याला आता वाचायला

शिकवलंच पाहिजे. आपल्यासारख्यांच्या धार्मिक घरात असला पाखंडी

तयार होता कामा नये. त्याला बायबल वाचायला,देवाधर्माबद्दल

विचार करायला,आदर बाळगायला शिकवलं पाहिजे.""



""शेजारच्या म्युलरबाईंनी त्याला एक जुनी अंकलिपी दिलीय. त्यांची

बाग शिंपायला जातो तेव्हा ती बरोबर घेऊन जातो. त्या म्हणत

होत्या,""जॉर्जची सारी अंकलिपी पाठ झालीय.""



""ते काहीही असो. तो बायबल वाचायला,देवाविषयी आदराने

बोलायला शिकलाच पाहिजे."" - मोझेसबाबा ठासून पुन्हा एकवार

म्हणाले.



दुसऱ्या दिवशी पहाटेच मोझेसबाबा जॉर्जसह जायला निघाले. जॉर्ज

खाटऱ्याच्या मागच्या बाजूला आपले अनवाणी पाय खाली सोडून

मजेत बसला होता. बाकी त्यानं काय कपडे घातले होते तो कसा

दिसत होता यात दखल घेण्याजोगं काही नव्हतंच. ""कार्व्हरकडचा

पोर"" एवढीच त्याची बाहेरच्या जगाने घेतलेली ओळख. त्याने



पान नं. 11

घातलेत तेच कपडे म्हणायचे. मग ते गबाळे आहेत आणि त्यामुळे तो

आणखी बाळवट,वेडाविद्रा दिसतो याचा इतरांनाच काय पण त्याला

स्वतःलाही विचार करण्याचं कारण नव्हतं. किंबहुना असा काही

विचार करावयाचा असतो, याची त्याला जाणीवच नव्हती, हो अगदी

मोठेपणीसुद्धा ! !



भरदुपारी एका झाडाखाली त्यांनी आपला खटारा उभा केला. एका

झाडाच्या सावलीत बसून सुसानबाईनी बांधून दिलेली शिदोरी त्यांनी

संपवली. एक ""गोरा"" एका ""काळ्याला शेजारी बसवून खातोय हे

पाहून रस्त्याने येणारे-जाणारे खेडूत थबकत.""गुलामगिरी"" अजूनही

लोकांच्या मनातून पार पुसली गेली नव्हतीच म्हणायची !

मोझेसबाबा बुंध्याला टेकून तिथंच धटकाभर पहुडले. हे त्यांचं पहुडणं

जॉर्जच्या पथ्यावरच पडत असे. नाहीतरी मोठी माणसं त्याच्याशी

बोलत असत हे बहुधा त्याच्या निरीक्षणाच्या कामात व्यत्यय आणणारे

हुकूमच असत. त्यापेक्षा त्यांनी असं शांतपणे पडून राहणं जॉर्जला

भारी आवडे.



तासभर विश्रांती घेऊन ते पुढच्या प्रवासाला लागले. यायगरसाहेबांच्या

बागेच्या दर्शनाने जॉर्ज एकदम खूश झाला. यायगर आणि मोझेस

कार्व्हर एकमेकांशी बातचीत करीत होते. ती संधी साधून जॉर्ज तिथून

सटकला आणि सारी बाग मजेत फिरू लागला. त्या बागेत हिरवा

ताजेपणा,आखीव-रेखीव ठेवण पाहून त्याला वाटलं, ""स्वर्ग,नंदनवन

म्हणतात ते हेच तर नव्हे !"" बिचाऱ्याच्या स्वप्नातही आले नसले

की, पुढे भविष्यात आपले हेच काटकुळे हात ओसाड जमिनीवरही

असेच नंदनवन फुलवणार आहेत !



तो एका कुंडीपाशी थबकला. खाली बसून हळूवारपणे त्या कुंडीतल्या

वनस्पतीवरून हात फिरवू लागला. तिच्या कोंबांना कुरवाळू लागला.

गोंजारू लागला. कोवळ्या पानांशी तोड नेऊन गुणगुणू लागला.



पान नं. 12

यायगरचं लक्ष त्याच्या त्या गुणगुणण्याकडे वेधले गेले. ते मोझेस

कार्व्हरला म्हणाले,""या बेटयाला माझी झाडं आवडलेली दिसतात.

पाहा त्यांना कसं मायेनं गोंजारतोय् !"" त्यांनी जॉर्जला जवळ

बोलावले आणि विचारले.-



""बाळा तुला झाडं मनापासून आवडताता का रे ?"" जॉर्जने मान वर

करून पाहिलं. दोघांनी एकमेकांच्या नजरेत क्षणभर रोखून पाहिलं.

कुठं तरी अंतरीची खूण पटली. आपल्याला झाडा-झुडुपातलं काय नि

किती कळतं हे जॉर्जला त्यांना समाजावून सांगता आलं नसतं. पण

तरीही त्याची खात्री झाली की, तो स्वतः जे काही करत होता त्याची

जाण असलेला ""जाणकार"" त्याच्या पुढयात उभा होता.



""हो- हो ! या झाडाझुडपांच्या अगदी सगळ्या गोष्टी आवडतात

मला !"" आपले दोन्ही हात उडवीत जॉर्ज उत्कटतेने म्हणाला. त्याचे

हात आपल्या हाती घेऊन त्याची ती विशेष लांबसडक बोटे कुरवाळीत

यायगर म्हणाले, ""हे आहेत एका जातिवंत माळ्याचे हात. नुसत्या

स्पर्शाने संजीवनी देणारे !"" त्याचे हात हलकेच सोडीत, यायगर

कार्व्हरना म्हणाले, "" तुमच्या द्राक्षाच्या मळ्याची देखभाल यानं केली

म्हणता, पण हा तर अगदीच पिटुकला माळीदादा आहे !""



मोझेसबाबांनी खालच्या आवाजात जॉर्जची सारी हकीकत यायगरना

सांगितली आणि म्हणाले,""हा कधीच मजबूत गडी होणार नाही.

निग्रो फक्त कष्टावरच जगू शकतो. ह्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलंय.

पण हा स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी मला सोडून जाऊच

शकत नाही. अशी परिस्थिती आहे.



यायगर पुन्हा जॉर्जकडे वळले. जॉर्ज आपल्या कुंडयांची तपासणी

करण्यात गुंग होता. त्यांनी त्याला द्राक्ष-वेलीचे कलम कसे करतात ते

दाखवले. कलम करण्याने द्राक्षांची प्रत कशी सुधारते ते समजावून

दिले."" मी द्राक्षाची उत्तम जात बनविण्याच्या प्रयत्नात आहे. देवाच्या

मार्गदर्शनाखाली माझे प्रयोग आहेत. ही सारी धरणी, त्या एका



पान नं. 13



विधात्याची आहे. तो विधाता- तोच परमेश्वर तुझा पिता आहे. ""

""माझा पिता ?"" जॉर्ज बोलता बोलता अडखळला.



""हो ! हो ! तुलाही त्यानेच निर्माण केलंय. रानावनातल्या वनस्पतीं-

प्रमाणे तूही एकाकी आहेस. पण त्या दयाघन प्रभूने तुला निर्मितीक्षम

हात दिले आहेत. तू त्यांचा उपयोग कर. माझ्यासारखा तूही देवाचा

आदेश घे. त्याच्या कार्यात सहभागी हो.""



जॉर्जला मोझेसबाबांच्या तोंडून ऐकलेलं बायबलमधील वचन आठवलं-

""ही भूमी देवाची आहे !""



परत निघते वेळी श्री. यायगर यांनी जॉर्जसाठी एक छानसं पुस्तक दिलं

आणि म्हणाले, -""हे घे तू. तू उघडया डोळ्यांनी लक्ष देतोस म्हणून

बऱ्याच जणांना न समजणाऱ्या गोष्टी तुला समजल्या आहेत. तू लिहा-

वाचायला शिकशील तेव्हा हे पुस्तक तू वाच. आणखीही खूप खूप

वाच. मग तुझा ""पिता"" तुला आणखीन गोष्टी दाखवील ! तुझं ज्ञान

वाढवील.""



संध्याकळ झाली तेव्हा मोझेसबाबा आणि जॉर्ज परतीच्या प्रवासाला

लागले. यायगरनी जॉर्जच्या मनात चांदणं शिंपडलं होतं. बऱ्याच नवीन

गोष्टींच ज्ञान त्याला झालं होतं. एका नव्या जगाचं दर्शन त्याला झालं

होतं. मोझेसबाबाही यायगरसाहेबांच्या बरोबर झालेल्या

विचारविनिमयाची उजळणी करीत होते. त्यांनाही शेतीसंबंधी अनेक

नव्या गोष्टी समजल्या होत्या. उत्तम मार्गदर्शन मिळालं होतं. पण या

साऱ्याला किती उशीर झाला होता. ! मोझेसबाबा आता उतरणीला

लागले होते.थकले होते. त्यांना मूलबाळही नव्हतं. त्यांना वाटे,

""हाच जॉर्ज जरा खंबीर असता तर त्यानेच नसती ता सारी

जबाबदारी पेलली ! भले त्याला साऱ्या वनस्पतींची माहिती असेल

पण तो साधी नांगरटही करू शकत नाही त्याचं काय ?""



""घरी आल्यावर त्यांनी जॉर्जला यायगरकडून मिळालेली सारी माहिती



पान नं. 14

नीट समजावून सांगितली. त्या यायगर साहेबांच्या गावात - `नेओशो त

निग्रोच्या शाळेची सोय होती. त्यांनी जॉर्जला विचारले,""आज

आपण गेलो होतो त्या.""नेओशो"" गावात निग्रोंची शाळा आहे. तू

जाणार का तिच्यात ?"" जॉर्जने उत्तर दिले नाही. आपली पंसती

शब्दांनी व्यक्त करण्याची त्याला गरजच नव्हती. त्याच वेळी तो

समजून चुकला, कार्व्हर कुटुंबापासून आपल्याला दूर जावं लागणार

आहे. उघडया जगात वावरावं लागणार आहे.""



""सारी धरणी माझी आहे. माझ्या पित्याच्या कामात हातभार

लावायला मला तयार झालं पाहिजे.""



एका आठवड्यानंतर जॉर्ज पुन्हा एकदा ""नेओशो"" च्या रस्त्याला

लागला. मात्र या वेळी तो एकटाच, पायी निघाला होता. मोझेसाबाबा

त्याची सोय लावून द्यायला बरोबर येणार होते. पण त्यांच्या

गोठायातलं एक वासरू एकाएकी आजारी पडलं. त्यामुळे जॉर्जला

एकटयालाच निघावं लागलं.



शाळेच्या गणवेषाचा वगेरे काही पत्त नव्हताच. पण सुसानबाई व

म्युरलबाईंनी मिळून त्याची सोय केली होती. एक जुनी शाल,

मोझेसबाबांची कापून तोकडी केलेली पॅन्ट,अंकलिपी,यायगरने दिलेले

पुस्तक, फांद्या छाटायचा आपला छोटा चाकू आणि दोन मोठी

सफरचंद. हो ! एक साधारणसा बुटांचा जोडही मिळाला होता. पण

धुळीच्या रसत्याने चालताना तो खराब होऊ नये म्हणून, बुटांचे बंद

एकमेकांना बांधून, तो खांद्यावर टाकला होता त्यानं. शिवाय

म्युलरबाईनी दिलेला आख्खा डॉलर, त्याच्या हाती आलेली ही

पहिलीच रोख रक्कम- त्याने एका फडक्यात बांधून घेतली होती.



त्याची ती तयारी चाललेली असतानाच त्याचा एकुलता एक भाऊ-

जिम- त्याला भेटायला "" डायमंड ग्रोव्ह"" ला आला होता. ती ""तयारी""



पान नं. 15

""पाहून जिम जॉर्जला म्हणाला, ""सुखाचा घास टाकून कुठं वणवण

करायला निघालास ? अंकलिपिवरून अक्षर-ओळख झाली.

तेवढी बस झाली.""



""नुसती अक्षर ओळख झाली म्हणजे शिक्षण संपलं का ? अरे

जिमदादा, मी इतके शब्द, इतके शब्द शिकणार आहे की, मला अख्खं

पुस्तक लिहिता आलं पाहिजे."" जॉर्जच हे भयंकर उत्तर ऐकून जिम

बापडा गप्प बसला.



जॉर्जमध्ये वावगा असा कोणताच गुण नव्हता. त्याच्या सद्गुणांची

पारख असलेल्या सुसानबाईं त्याला निरोप देतेवेळी सांगितलं होतं.

एखादं मोठठसं घर हुडकून काढ आणि त्यांना तुला काय काय घरकाम

येतं ते सांग. मदत मिळणं काठीण असतं रे बाळा ! पण तू तुझा मार्ग

शोधशीलच अशी माझी खात्री आहे.



मोझेसबाबा म्हणाले,

""आपला जीव सांभाळून राहा आणि हे बघ ! आता किनई तू गुलाम

नाहीस, ""स्वतंत्र"" आहेस- हे कधीच विसरू नकोस. लोक तुला

फुकटात राबवू पाहतील, तर त्यांच्या धाकाला बळी पडू नकोस हो !

त्यांच्या नादी लागू नकोस.""



""जॉर्जला निरोप देतेवेळी कार्व्हर दांपत्याचा ऊर भरून आला. तो

वळणावर गेला आणि थबकून त्यानं एकदा मागे वळून पाहिलं. दहा

वर्षाचा तो अनाथ पोरका जीव, ज्ञात असलेले सुरक्षित जग सोडून

अज्ञाताकडे झेप घेत होता. भीतीची एक लहर त्याच्या शरीरात पसरून

गेली. त्याने आता पाऊल पुढे टाकले. निघाला. तो निघाला-ज्ञान-

यात्रेला !



पान नं. 117



गंगा आली रे अंगणी



`टस्कगी' त संगीत होतं. अगदी मधुर संगीत होतं. प्रा. कार्व्हरनी पूर्वी

कधी ऐकलं नव्हतं असं -! दर रविवारी सायंकाळी टस्कणी शाळेचे

विद्यार्थी प्रार्थना मंदिरात जमत. आपल्या गोड, मधुर आवाजाने सारा

परिसर भारून टाकीत. डॉ. वॉशिग्टनची ख्याती ऐकून दूरदूरहून, अगदी

परदेशातूनही लोक त्यांचा `उद्यमशील हात' बनविण्याचा उपक्रम

जाणून घेण्यासाठी येत. गुलाम आईबापांच्या पोटी जन्म घेतलेल्या या

मुलांच्या कंठातील संगीत ऐकून पाहुणे भारवून जात. एका आगळ्या

वेगळ्या वातावरणाची स्मृती त्यांच्या अंतःकरणात दीर्घकाळ रेंगाळे.



डॉ. कार्व्हर ही रविवारची संध्याकाळ कधीच चुकवीत नसत. ते

संगीत त्यांना भूतकाळात नेई. त्यांच्या आईच्या गुणगुणण्याची त्यांना

आठवण देई. ते गाणे त्यांच्या एकाकी आयुष्याला उभारी आणी.



अशाच एक रविवारी संध्याकाळी प्रार्थना मंदिरातून परतत असताना

त्यांची नजर वसतिगृहातील पिओनोवर गेली. किती वर्षांत त्यांनी या

वाद्याला स्पर्श केला नव्हता ! ते त्या पिआनोपाशी गेले,

स्वरपट्टयांवर त्यांची बोटे फिरू लागली. त्यांना एकेक रचना

आठवू लागली. सौ. मिलहॉलडंकडे शिकून घेतलेल्या निरनिराळ्या

रचना आठवू लागल्या. त्यांच्या त्या लांबसडक बोटातून `आठवणी'

स्त्रवत होत्या.



अंधार पडला. प्रा. कार्व्हरांना स्थलकालाचं मुळी भानच उरलं नव्हतं.

`सिंप्सन' वाल्यांनी भाकीत केल्याप्रमाणे ते चित्रकार वा संगीतकार

झाले नव्हते. ते झाले होते एक `दक्षिणी शेतकरी' एका छोटया पण

धडपडणाऱ्या शाळेचे शिक्षक, मुळ्यांचे डॉक्टर ! आणि रंगारीही ! !

हे त्यांचे अपयश म्हणायचं का ? एका उजाड ओसाड माळाला त्यांनी



पान नं. 118

नवजीवन दिलं होतं, फुलवलं होतं. लोकांच्या डोळ्यावरच्या डॉलर्सच्या

पटटया काढून त्यांना `बघायला' शिकवलं होतं. आणि ते लोकही

आता डॉक्टर कार्व्हरप्रमाणे चिखलात,मुळ्यात, पाना-फुलात `देव'

शोधायला शिकले होते. निसर्गाच्या रहस्यांचा मागोवा घेऊ लागले

होते. उजाड,वेराण माळ दिसामासांनी फळत-फुलत होता. याला

अपयश म्हणायचं का ?.... तरीही त्यांना वाटत होतं, ही तर नुसती

सुरूवात आहे. अजून खूप मजल मारायची आहे.



त्यांची बोटं पिआनोच्या स्वरपट्टयावर फिरूनफिरून थकली. ते थांबले

चाहूल लागली म्हणून मागे वळून पाहिले. दिवा लावला गेला होता.

दरवाज्यात बरेच विद्यार्थी दाटीवाटीने उभे होते. वादन थांबताच

ते पुढे आले.



""सर ! किती सुंदर वाजवता तुम्ही ! !""

प्रा. कार्व्हर विलक्षण संकोचले. जागेवरून उठू लागले.

""नाही सर, उठू नका. आणखी थोडं वाजवा ना !""

""आम्ही इतकं शास्त्रशुध्द आणि सुरेलसंगीत पूर्वी कधी ऐकलंच

नव्हतं !""



""मुलांनो मी काही वादक नाही.""

""सर, तुम्ही तर नेहमी उपदेश करता की, आपल्याकडे आहे ते देत

राहावं !""



तेवढयात वसतिगृहाची घंटा घणघणली. दिवे मालवून झोपी जाण्याची

नेहमीची सूचना होती ती ! नाइलाजाने सारेजण आपापल्या

खोलीत परतले. प्रा.कार्व्हरही परतले `उद्या पहाटे आपल्या

`देवाच्या'सानिध्यात त्याचा कौल घ्यायलाच हवा.. !'



गेले काही दिवस त्यांच्या कृषी विभागाचा व्याप झपाटयाने वाढत होता.
पान नं. 119



त्यांच्या विभागासाठी जास्तीत जास्त जमीन लागवडीसाठी देण्यात

आली होती. पण पेशाअभावी बेत तडीस जात नव्हते. डॉ वॉशिंग्टन

आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर संस्थेसाठी फंड गोळा करीत. ही

अलोकिक देणगी प्रा. कार्व्हर यांच्यापाशी नव्हती. पण कालच्या

पिआनोवादनाने आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रशंसेने, काही नवेच

विचार त्यांच्या मनात घोळू लागले होते.



थोडयाशा संकोचानेच त्यांनी शाळेचे कोषाधिकारी श्री. वॉरन लोगन

यांच्यापुढे एक प्रस्ताव मांडला- वाद्यवृंद तयार करून त्यांच्या

कार्यक्रमाद्वारे पेसे उभे करण्याचा ! श्री. लोगन डॉ. कार्व्हरना पूर्णपणे

ओळखून होते. उत्तरेकडचा हा अबोल, विनम्र संशोधक किती

कर्तृत्ववान आहे, हे जाणून होते. आजवर डॉ. कार्व्हरनी जे जे कार्य

हाती घेतलं होतं, त्याला अपेक्षेहून कितीतरी अधिक पटीने यशाला

घातलं होतं. मातीचं सोनं करणाऱ्या प्रा. कार्व्हर यांनी मांडलेल्या

नुसत्या प्रस्तावावरच निर्भर होऊन. श्री. लोगननी साऱ्या दौऱ्याची

आखणी करायला सुरूवात केली.



डॉ. कार्व्हर फावल्या वेळात पिआनोवर रियाज करू लागले.

विद्यार्थ्यानाही आता इतक्या दिवसांच्या अनुभवाने,सरांच्या कोणत्याही

कृतीबद्दल नवल वाटेनासं झालं होतं. नवल तरी कशाकशाचं करावं !

आणि तेही रोज रोज ! !



दौरा यशस्वी झाला. आपल्या वाद्यवृन्दाच्या कार्यक्रमातून ते आवश्यक

तो निधी जमवू शकले. याहीपेक्षा एक अधिक फायदा या दौऱ्यामुळे

झाला. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी `खरी दक्षिण अमेरिका' पाहिली.

तिथले आपले दलित निग्रो बांधव, त्यांचं दारिद्रय. त्यांचं अज्ञान, त्यांची

होत असलेली उपेक्षा आणि आबाळ- सारं काही उघडया डोळ्यांनी

पाहिलं.



अजूनही दक्षिणेत गुलामगिरी ही नेसर्गिक अवस्था समजली जात होती.

निग्रोला दुय्यम मानव म्हटलं जात होतं. मुक्ततेनंतरही निग्रोंच्या



पान नं. 120

सामाजिक स्थानात फरक पडला नव्हता. अजूनही त्याला सार्वजनिक

ठिकाणी, सार्वजनिक वाहनात, एवढेच काय, सार्वजनिक बागेतही

मज्जाव होता. रस्त्यावरून जाणाऱ्या गोऱ्याला ओलांडणे किंवा आडवे

जाणे या निग्रोच्या गुन्ह्याला चाबकाची शिक्षा मिळत होती. सामोऱ्या

येणाऱ्या गोऱ्यासाठी त्याला रस्ता सोडून बाजूला व्हावं लागत होतं.

स्वतःच्या हिंमतीवर शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या, व्यवसाय

करणाऱ्या निग्रोचा होणारा उपमर्द ही तर नित्याचीच गोष्ट. कोणी

अस्मिता दाखवू धजले की पाठीवर आसूड बसलाच. अजूनही निग्रोला

`श्रीयुत' किंवा `श्रीमती' आपल्या नावामागे लावता येत नव्हते.

लावल्यास शिक्षा ठरलेली. चामडी सुटेपर्यंत चाबकाचे फटके. पुन्हा

न्याय मागायची सोय नाही. मग चेहऱ्यावर उदास,लाचार हसू कवचासारखं

बाळगून, जीव जगवण्याची केविलवाणी धडपड ! दाक्षिणात्य म्हणत,

""आमच्या निग्रोंच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असते. कोण म्हणतं

गुलामगिरीत ते सुखी नाहीत ? तीच नेसर्गिक अवस्था त्यांना मानवते.""



बहुजन समाज शेतकरीच. मोडकळीला आलेली. लाकडी खोपटं त्यात

राहणारे ते निग्रो -बांधव . आपले अस्तित्व तगवण्यासाठी जिवापाड

कष्टत असलेले. त्या लाकडी खोपटात माणसं तरी किती ! डझनाच्यावर

लहानमोठे सारे एकत्र राहायचे. एकत्र खायचे, हातावरतीच घेऊन

चालता चालता किंवा भिंतीला पाठ लावून उकिडवं बसून. एकत्रच

निजायचे. बिछाना वगेरे भानगड नाहीच. खिडक्या,तावदाने,पडदे

यांची माहितीच नाही. बहुतेक खोपटांतून शौचकूप हा प्रकार नव्हता.

होता तिथे तरट,फळकूटयांच्या आधारे कसाबसा उभारलेला. खायचे

जिन्नस लांबवरच्या बाजांरातून विकत आणलेले . तेही ठारविक. मांस,

पीठ आणि काकवी. दारात काही पिकवून खाता येतं. कोंबडया,बदकं

डुकरं, एखादं दुभतं जनावर आपली पोटाची गरज भागवू शकतं याचं

ज्ञानच नाही. जीवनसत्त्वांच्या अभावामुळे `पेलाग्रा', `स्कर्व्ही' अशा

रोगांनी पछाडलेलं.



पान नं. 121

पिण्याचं पाणी कोसा-दोन कोसांवरून आणलेलं, त्यामुळे पाणी पिण्यात

काटकसर इतर वापर तर फार दूर राहिले. परिणाम व्हायचा तोच

होत होता. कातडी भेगाळत होती.



जमीनही अशीच भेगाळली, पागोळ्याच्या पाण्याने जमीन धुपून चांगली

(पंचवीस) फुटाची घळ पडली. तरी दखल नाही. सारं मानवी जीवन

कसं कोणत्याही क्षणी गडप होऊन जाईल अशा टोकावर आलेलं.



दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांचं मन एका वेगळ्याच दिशेने विचार करू

लागलं. `समाज प्रबोधना' चा एक आगळा, अभूतपर्व उपक्रम

डोक्यात शिजू लागला. `या आपल्या बांधवांना जागृत करायला हवं

ती माझी नेतिक जाबाबदारी आहे'



डॉ. वॉशिंग्टनपुढे त्यांनी आपले विचार मांडले. `त्यांना उत्पादन कसे

करावे,कशाचे करावे आणि या उत्पादनाचे पुढे नेमके काय करावे,

हेही शिकवणं आवश्यक आहे... घरं बांधून त्यात राहायला,

दूध-दुभत्यांची सोय करायला शिकविले पाहिजे. टस्कगीनं त्यांच्या

दारात जायला हवं.' डॉ. वॉशिंग्टन या उपक्रमाला मान्यता न देते

तरच नवल !



1899 साली पहिल्या `फिरत्या कृषि विद्यालया ' ने जन्म घेतला

आपल्या कार्यक्रमाची व्यवस्थित आखणी करून एका छोटयाशा

खटाऱ्यावर सारे सामान व्यवस्थित जमवून,निवडक विद्यार्थ्यासह प्रा.

कार्व्हर मोहिमेवर निघाले. टस्कगी शाळा शेतकऱ्यांच्या अंगणात

जायला निघाली.



खेड्यापाड्यातून घरोघरी हिंडताना आपले म्हणणे सप्रयोग समजावून

देण्यासाठी तेथील माती, पाणी तपासणीसाठी काही (साधी का

होईनात) उपकरणे त्यांना बरोबर न्यावी लागत. ही उपकरणं

मांडण्यासाठी, आपली प्रयोग शाळा फिरतीवर नेण्यासाठी म्हणून त्यांनी

स्वतः आराखडा काढून त्याप्रमाणे एक खटारा-गाडी तयार करून



पान नं. 122

या दौऱ्यात प्रा. कार्व्हर आपल्या गरीब बांधवांच्या खोपटांतून राहात.

आपल्या मृदू बोलांनी,विनयशील स्वभावाने,अकृत्रिम स्नेहाने त्यांना

आपलेसे करीत. पुरेसा मोकळेपणा निर्माण झाला की, प्रा. कार्व्हर

त्यांना जमिनीची मशागत कशी करावी.ती खोलवरच का करावी,

बियाणं कसं निवडावं,कसं तयार करावं या सर्व बाबतीत सोप्या भाषेत

माहिती देत.



परसातला एखादा वाफा हिरव्या पालेभाजीसाठी राखायला ते सांगत

स्वस्तातल्या बियाण्याची लागवड करून घेतलेला भाजीपाला त्या

शेतकऱ्यांची पूर्वापार तीन `म' कारापासून सुटका करू शकत होता-

मीट (मांस),मील (पीठ), मोलॅसेस )काकवी) . चौरस आहाराच्या

अभावी त्या शेतकी समाजाला पेलाग्रा व स्कर्व्ही रोगानं पछाडलं होतं.

त्यांना हिरवी भाजी व टोमॅटोसारखी फळं खायला त्यांनी शिकविली.

टौमॅटो हे `विषारी फळ' मानलं गेलेलं. ते तसं नाही, हे सिध्द

करण्यासाठी त्यांना ते ठिकठिकाणी खाऊन दाखवावं लागे. तसेच ते

डाळवर्गातील धान्य पेरायला सांगत. कारण निकस जमिनीचा कस

वाढविण्यासाठी या लागवडीची आवश्यकता होती. आपल्या शाळेतील

वीस एकर निकृष्ट जमिनीतून कसं भरगच्च आणि रसरशीत पीक येते

हे दाखविण्यासाठी ते त्यांना आपल्या संशोधन केंद्रावरील बटाटे, कोबी

कांदे,कलिंगड इत्यादी दाखवत. शेतकऱ्यांना आपल्याकडील बियाणे

देत. हे बियाणे त्यांना सेक्रटरी श्री. जेम्स विल्यम्स् यांनी पुरविले होते.

त्याचा ते या प्रसंगी वापर करत.



पिकांच्या फेरपालटाविषयी समजवताना ते म्हणत- ""तुमच्या

लहानपणी कपास कशी भरगच्च बोंडाची असायची. आता ती का

रोडावली ? तुम्ही जमिनीला विश्रांतीच दिली नाही. दिवसभर श्रम

केल्यानंतर आपल्यालाही विश्रांती हवी असते ना !""



""खरंय बाबा ! पण जमिनीला अशी विश्रांती देत बसलो, तर



पान नं. 123



आमच्या कच्च्याबच्च्यांनी काय खावं ? माती !""



""माती कशाला ? मी हे रताळ्याचं बियाणं देतो. दहा एकराला पुरेल

ते. एवढयात पीक घेतलंत तर वर्षभर खाऊन सरायचं नाही. झालंच

तर रताळ्याची पानं देठ खाऊन तुमची डुकरं पोसली जातील. वर्षातून

दोनदा हे पीक घेऊ शकाल आणि गंमत म्हणजे तरीही जमिनीचं काही

नुकसान होणार नाही. याच दहा एकरांवर तीन वर्षांनी कपाशीचं पीक

घ्याल तेव्हा आता उभ्या शेतात घेत आहात तेवढं पीक या एवढयाशा

तुकडयावर मिळेल.""



एवढं समजावून देऊनही एखादा खट म्हातारा म्हणायचा- ""पोरा,

तू काय मला शिकवतोस ? शेतीतलं तुला माझ्याइतकं कळतं काय ?

उमरभर शेती करतोय. तीन शेताची वाट लावलीय मी आतापर्यंत

बोल !""



ही मर्दुमकी !



एखाद्याच्या अंगणातल्या कोंबडया रोगट दिसल्या की, प्रा. कार्व्हर त्यांचे

खुराडे तपासत.



""तुझ्या कोंबडया रोगट का ते माहीत आहे ? त्यांच्या खुराडयात

सूर्यप्रकाश पोहोचतच नाही. म्हणून खुराडं दमट राहातं आणि त्या

आजारी होतात.""



""तसं नाही कार्व्हर, ती अंडी पौर्णिमेला उबवली होती ना म्हणून त्या

कोंबडया अशा ! "" हा जंतर-मंतरचा प्रभाव !!



असं सारं असूनही प्रा. कार्व्हर माघार घ्यायला तायर नव्हते. त्यांना

समजावत होते. घरांघरांतून,खेडोपाडी फिरतच होते. कोणी समजूतदार

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतीत बदल करी. त्याचा झालेला फायदा

शेजारचा शेतकरी पाही. तोही मग प्रा. कार्व्हरांचं ऐके. त्यांचे ऐकल्याने

नुकसान तर कधीच होत नाही, उलट पूर्वी कधी नव्हे एवढा फायदा



पान नं. 124

होतो याची खातरजमा होत गेली. प्रा. कार्व्हरांची मशागत चालूच

होती. न थकता. न खचता.



प्रत्येक सुटीच्या दिवशी आपला खटारा घेऊन ते मॅकॉन काऊंटीत

फिरायचे. जत्रेच्या ठिकाणी जायचे. बाजाराचे ठिकाण गाठायचे.

रस्त्याच्या कोपऱ्यावर खटारा थाटून लोकांना आपले म्हणणे समजावून

द्यायचे. लोक नीट शांतपणे ऐकायचे, तर एखादा गोरा अहंमन्य

`मोठा आलाय काळ्या आम्हाला शिकवायला,' म्हणून तोंडावर

अवहेलनाही करायचा.पण असले उद्गार ते कानाआड करायचे.



सुरूवाती-सुरूवातीला त्या अडाणी शेतकऱ्यांना वाटायचं की, हे

प्राध्यापक महाशय शिकलेले. काही तरी अवघड- न कळेलसं बोलणार. खूप

काय काय न समजेलसं सांगत बसणार. पण एकदा का त्यांनी प्रा.

कार्व्हरांचे बोलणे ऐकले की, त्यांच्या मनातली अढी जाई.



आपला खटारा उभा करायला प्रा. कार्व्हरांनी आणखी एक ठिकाण

शोधलं होतं. एकगठ्ठा लोक हुकुमी भेटण्याचे ठिकाण- चर्च ! आपल्या

साथीदारांसह चर्चच्या दारात ते तयार असत. चर्च सुटले की, आतलं

प्रवचन ऐकून बाहेर पडलेले लोक त्यांचं प्रबोधन ऐकायला गोळा होत

सामाजिक आणि आर्थिक समस्यांचे गांभीर्य न जाणणारे महाभाग-

विशेषतः धर्मगुरू- या प्रबोधनावर उखडत. प्रभूच्या विश्रांतीच्या दिवशी

असले थेर त्यांना पसंत नसत. काही गोरे तर त्यांच्या या अशा सभा

उधळायला टपलेले असत. `आमच्या दयेवर जगलेले हे निग्गर इथे तरी

नकोत' म्हणत. म्हणजे काय तर आमच्यापेक्षा अधिक धान्य पिकवायला

पाहणारे काळे नकोत. वास्तविक दक्षिणेत गरीब गोरा शेतकरी आणि

निग्रो शेतकरी यांच्यात आर्थिकदृष्ट्या तफावत नव्हती. पण तरीही

गुलामी नष्ट होण्यापूर्वी गुलाम म्हणून त्यांना खालच्या पातळीवर

ठेवता येत होते. आता मुक्ततेनंतर त्यांना बरोबरीने हक्क होते. त्यात

आता या शेती सुधारणेने ते वरचढ होणार हे त्यांना कसं सहन व्हावं !



पान नं. 125

पण सारेच गोरे असे खडूस नसत. काही समजूतदार गोरे शेतकरी,

धर्मगुरू या फित्या शाळेचा लाभ घेत. प्रात्यक्षिके पाहात. प्रा. कार्व्हर

अशांशी दुजाभाव ठेवून कधीच वागले नाहीत. दक्षिणेत साऱ्यांच्याच

समस्या सारख्याच होत्या. खाईतून साऱ्यांनाच वर काढायचं होतं.

`आहात तिथून पुढे चला.' हा प्रा. कार्व्हरांचा सांगावा उभ्या

दक्षिणेसाठीच होता.



हळूहळू त्यांनी दक्षिणेतील लोकांच्या आहाराच्या सवयी बदलत्या.

अडचणीच्या काळात वापरण्यासाठी मांस कसे टिकवावे, भाजीपाला

उन्हात वाळून, सुकवून, त्याची बेगमी कशी करावी याची प्रात्यक्षिके

दिली. वेद्यकशास्त्राने जाहीरपणे सांगण्यापूर्वी कितीतरी आधीच त्यांनी

लोकांना उपलब्ध कच्ची फळे खाऊन आहारातील अन्न -घटकांची त्रुटी

भरून काढण्यास शिकविले. उत्तम बी-बियाणाचा पुरवठा केला.

उपजलेल्या धान्यापासून पदार्थ बनविण्याच्या कृती शिकविल्या. लोणची,

मुरांबे घालण्याच्या क्रिया त्यांच्या देनिक जीवनात समाविष्ट केल्या.

पिकलेल्या फळांच्या रसाच्या पोळ्या उन्हात वाळवून `साठं' करायला

शिकविले.



अनेक वर्षाच्या परंपरेने लोकांच्या आहारविषयक सवयी ठरून

गेलेल्या असतात. त्यात बदल घडवून आणायचा असेल तर, त्यांच्या

जेवणात नवीन पदार्थ समाविष्ट करायचे असतील, तर ते नवीन

पदार्थ आकर्षक व चवदार असले पाहिजेत. त्यादृष्टीने नवीन पाककृती

बनवून पाहायच्या, आहारदृष्ट्या त्यांची उपयुक्तता तपासायची, हा

प्रा. कार्व्हरांचा नवा उदोयग होऊन बसला होता. युरोपीय पदार्थाच्या

चवी घ्यायची संधी त्यांना कोण देणार ! ते मात्र स्वतःच्या परीने



पान नं. 126

नवनव्या पाककृती बनवून दक्षिणेच्या जेवणात विविधता आणत होते.



त्यांचे `प्रबोधन' एवढयावरच थांबलं नाही. कपडे कसे धुवावेत,

शारीरिक स्वच्छता कशी राखावी,पडदे कसे शिवावेत, बालसंवर्धन,

पशु-संगोपन,कुक्कुट -पालन इ. विषयही या प्रबोधन मालिकेतून

सुटले नाहीत. तसेच, खोपटाच्या दाराला लाकडी ओंडक्याची एकच

पायरी असण्यापेक्षा तीन पायऱ्या बसविणे सोयीचे कसे, शौचकूप कसे

असावे, वनस्पतींच्या तंतूपासून घोंगड्या कशा विणाव्यात, मातीपासून

रंग बनवून घरे कशी रंगवावीत. इ. अनेक कलाही खेडयांतून रूजविल्या.



त्या अडाणी शेतकऱ्यांना उमजेल अशासोप्या, सरळ भाषेत त्यांनी

पत्रकं काढली. शाळेच्या शेतकी-विभागाकडून खेडोपाडी पोहोचवली.

पत्रकांचे विषय विविध असायचे. उदा. शेंगदाण्याची लागवड कशी

करावी-त्यापासून तयार होऊ शकणारे 105 खाद्य पदार्थ, टोमॅटोची

लागवड कशी करावी- त्यापासून तयार होऊ शकणारे 115 खाद्यपदार्थ,

शेतकरी त्यांची रताळी कशी वाचवू शकतील, वराह-पालन,

अलाबामास पशुपालन कसे फायदेशीर ठरेल, उन्हाळयात मांस खारवून

कसे टिकवाल, आपल्या जमिनीचा कस वाढवून कसा टिकवाल इत्यादी.



एवढेच नव्हे तर दररोज पाच सेंट्स वाचविले, तर जमलेल्या पुंजीतून

वर्षाअखेरीस तीन एकर जमीन विकत घेता येते, हेही त्यांनी आपल्या

बांधवांना दाखवून दिले. मग त्या गरीब शेतकऱ्यांची गाडगी,मडकी

रोज पाच सेंटस््ची सुटी नाणी पोटात साठवू लागली. वर्षाअखेरीस

जमीनखरेदीचे व्यवहार होऊ लागले.



`जमिनीवरची मालकी' ही भावना गरीब शेतकऱ्यांना सुखवू लागली.

आत्मसन्मान वाढला. जमीनदारीचं जोखड सेल करण्याचा हा मार्ग

शेतकऱ्यांना पटला. आर्थिक स्थेर्याची शाश्वती नजरेच्या टप्प्यात येऊ

लागली.



प्रा. कार्व्हर ओळखून चुकले होते की, जोपर्यंत दक्षिणेचा शेतकरी



पान नं. 127

`समुद्धीच्या पातळीवर पोहोचत नाही, तोपर्यंत दक्षिणेचा संस्कृतीला

भवितव्य नाही. शेतकऱ्यांचं समृद्ध जीवन राष्ट्रविकास घडवत असतं.

म्हणून शेतकऱ्यांचा सर्वागीण विकास झाला पाहिजे. सर्वसामान्य

शेतकऱ्याने आत्मविकसनाचा प्रयत्न केला तर, प्रत्येकाने `सुधारणा'

आत्मसात केल्या तर, त्यांना स्वतःची अशी `संस्कृती' निर्माण करता

येईल. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, समाजाच्या तळागाळाच्या या

घटकाच्या गरजा ओळखून आपल्या सशोधनाला प्रा. कार्व्हरनी एक

विशिष्ट दिशा दिली. आपल्या कार्याचा वेग वाढता ठेवला.



प्रा. कार्व्हरांच्या मोहक साधेपणानं,घरगुती वागण्याने दक्षिणेच्या

शेतकऱ्याला ते आता परके वाटत नसत. शेतकरी-वर्ग त्यांचा चाहता

बनला. एवढया मोठया प्राध्यापकाचे,कृषितज्ज्ञाचे बोलणे, वागणे

किती साधे नि सहज असते याचेच साऱ्यांना अप्रूप वाटे.



हे फिरते प्रदर्शन गावोगाव जाई. बेलगाडीवर वस्तू मांडणे,पुन्हा

खोक्यात भरणे इ. सारी कामे ते जातीने करीत. कोणी खोडसाळपणे

एखादी वस्तू पळवू नये वा तिचा गेरवापर करू नये म्हणून ते

जागरूक असत.



शिवाय या खबरदारीमागे आणखीही एक कारण होते. ते स्वतः

`टस्कगी ' संस्थेचे प्रतिनिधी म्हणून वावरत. त्यामुळे प्रदर्शनावर

वेयक्तिक मालकी न दाखवता `संस्थेचे' कार्य म्हणून ते प्रदर्शनाची

देखभाल करीत. ज्यांना त्यांच्या कृषिउत्पादनाविषयी उत्सुकता असे ते

आपला जुना रिवाज मोडून प्रा. कार्व्हरना आमंत्रीत. याचा परिणाम

म्हणजे निग्रोंच्या सावलीलाही मज्जाव असणाऱ्या ठिकाणी त्यांचा

शिरकाव झाला.



या फिरत्या शाळेच्या धकाधकीत हातभार लावणारा एक चांगला



पान नं. 128

विद्यार्थी त्यांच्या हाताखाली तयार झाला. थॉमस कॅम्पबेल म्हणजेच

पुढे पहिला निग्रो फिल्ड एजंट म्हणून नावाजला गेलेला. टी.एम्,

कॅम्पबेल. हा प्रा. कार्व्हरांच्या हाती कसा लागला, त्याची कथा वेगळीच

आहे.



थॉमस कॅम्पबेलचा थोरला भाऊ विली हा आधीपासून टस्कगी

शाळेत होता. त्याच्या बरोबरीने शिकण्यासाठी तॉमस जॉर्जियांतील

अथेन्स गावाहून 200 मेलांहून आईबाप सोडून पळून आला. आपल्या

भावाचं न ऐकता. विलीनं त्याला कळवलं होतं.`टस्कगीत फिरकू नकोस,

इथं देवीची साथ आहे' पण असल्या छोटया साथीला (small pox)

काय भ्यायचं, म्हणून थॉमस आलाच. तो आला तेव्हा देवीनं

पछाडलेला विली शेवटच्या घटका मोजत होता. शेवटची तरी भेट

झाली. विली म्हणाला- `माझे इथेच दफन कर. तू आता इथेच राहा

आणि जे काही करायचं तू ठरवशील, त्यात दुसरा कोणी वरचढ

होऊ शकणार नाही इतकं यश मिळव.'



भावाच्या मृत्यूनं हळवा, व्यथित झालेला थॉमस सुकाणू नसल्यागत

भटकताना प्रा. कार्व्हरांच्या नजरेस पडला. त्यांनी हळुवारपणे त्याची

हकीकत समजून घेतली. विचारलं- `तुला शेती करायला आवडेल का ?'



""अं हं !""



शेतीच तर यापूर्वी कसली. त्याचा भाऊ विली इथं शिकत होता तसं

काही केशकर्तन किंवा लोहारकाम,सुतारकाम असं काही तरी शिकावं,

असं त्याच्या मनानं घेतलं होतं. प्रथमदर्शनीच हा गंभीर अन् दणदणीत

तब्येतीचा मुलगा प्रा. कार्व्हरांच्या मनात भरला होता. त्यांनी फिरून

विचारलं- ""बरं ! तर मग तुला कृषिविद्या शिकायला आवडेल ?""

बापरे, बरीच अवघड विद्या दिसते. नाव पण चट्कन उच्चारता येत

नाही. कसली का असेना, शेती करण्यापेक्षा बरी. थॉमसने विचार केला

अन् म्हणाला,- ""हो, मला असंच काही वेगळं शिकायचंय.

कृषिविद्या !"" आणि त्याला या होकाराचा पुढे कधीच प्श्चात्ताप वाटला



पान नं. 129

नाही. प्रा. कार्व्हरांच्या हाताखाली शेती शिकणं हे नेहमीच्या शेतावरच्या

हमालीपेक्षा खूपच वेगळं. होतं. `कसे' आणि `काय' याबरोबरच `का'

विचारणारा हा विद्यार्थी फिरत्या शाळेच्या कार्यात प्रा. कार्व्हरांना

खूप उपयोगी पडला. सडसडीत बांध्याचे कार्व्हर आणि दणकट थॉमस

या जोडीला न ओळखणारा त्या परिसरात सापडणं कठीण होतं. कारण

जिथे खटारासुद्धा जाऊ शकत नसे अशा आडगावातही आपलं सामान

खेचरावर लादून,डोंगर -टेकडया ओलांडून हे दोघं पोहोचत. प्रा.

कार्व्हरांच्या भगीरथ प्रयत्नाने दक्षिणी शेतकऱ्याच्या अंगणात गंगा

अवतरली. ज्ञानाची गंगा, समृद्धीची गंगा.



त्यांच्या या दौऱ्याने अमेरिकेच्या दक्षिण प्रदेशाचा संपूर्ण कायापालट

झाला ! त्याचे जीवनामान उंचावले. प्रा. कार्व्हर यांच्या `फिरत्या

कृषिविद्यालयाने' दक्षिणेच्या जीवनात अभूतपूर्व क्रांती केली.

दक्षिणेची मान उंचावली.



डॉ. वॉशिंग्टनची आपल्या सहकाऱ्याच्या कामगिरीचे अभिनंदन केले.

इतर देशांतही त्याच्या या कार्यक्रमाचे पडसाद उमटले. रशिया,पोलंड

चीन, जपान, हिंदुस्थान, आफ्रिका या देशांतून लोक त्यांच्या फिरत्या

कृषि-विद्ययलयाची माहिती घेण्याकरिता येऊ लागले. स्वतःच्या देशाच्या

संदर्भात या उपक्रमाचा उहापोह करू लागले. ठिकठिकाणाहून त्यांना

व्याख्यानासाठी बोलावणी येऊ लागली. त्यांच्या बुद्धीवेभावाने आणि

मूलगामी संशोधनाने सारे जग स्तिमित झाले.



टस्कगीला तिच्या कष्टाचं फळ मिळालं. शाळेची भरभराट होऊ लागली.

शाळेबरोबर गावही बाळसं धरू लागलं. आयात-निर्यात, माणसांची

आणि सामानाची, वाढू लागली. टस्कगी स्टेशनवर उतरवलेला माल

टस्कगी शाळेपर्यंत पोहोचविण्याची यातायात टाळण्यासाठी जवळच्या

`चेहॉ ' स्टेशनपासून टस्कगी शाळेपर्यंत नवा लोहमार्ग टाकण्यात

आला !



आपली स्वप्नं प्रत्यक्षात उतरविणाऱ्या या कर्तव्यरत सहाय्यकाला डॉ.



पान नं. 130

वॉशिंग्टननी पगारवाढ देऊ केली. पण निःस्पृह प्रा. कार्व्हरनी ती

नाकारली. `जास्त पेसे घेऊन मी काय करू ?'



तेही खरंच ! सारी धरणीच ज्याची, चार भिंतीबाहेरच ज्याचा संसार

त्याला काय हवं असणार !



डॉ. वॉशिंग्टन आपल्या ठिकठिकाणच्या व्याख्यानातून आपल्या या

निःस्वार्थी, निगर्वी सहकाऱ्याच्या गौरवपूर्ण उल्लेख करीत असत.



`या देशाने जन्माला घातलेल्या काही पुरूषोत्तमांपेकी श्री. कार्व्हर हे

एक आहेत. आम्हाला आणखी असे अर्धा डझन कार्व्हर लाभले.

तर...!'



`फिरत्या कृषि-विद्यालयाची' सुरूवात करून `समाज प्रबोधना' चा

नवा पायंडा पाडण्यात आपण यशस्वी झालो, याबदद्ल प्रा. कार्व्हरना

नेहमी कृतार्थ वाटे. `माझ्या आयुष्यातील महत्वाची कामगिरी'

असा ते आपल्या फिरत्या शाळेचा उल्लेख करीत. त्यांच्या हरितक्रांतीने

दक्षिणेकडच्या दरिद्री शेतकऱ्यांचे जीवन उजळून निघाले; त्यांच्या

आयुष्याला नवा अर्थ लाभला.



या फिरत्या कृषि-विद्यालयाचा विस्तार पुढे खूप वाढला. 1918 मध्ये

अलाबामा सरकारनं या कामासाठी एक मोठा ट्रक दिला. या `फिरत्या

शाळे'चं महत्त्व शेतकऱ्यांना एवढं जाणवलं होतं की, कालांतराने जेव्हा

हा ट्रक अतिवापराने निरूपयोगी झाला तेव्हा त्यांनी वर्गणी काढून

5000 डॉलर्स उभे केले आणि शाळेला नवा अधिक मोठा ट्रक विकत

घेऊन दिला.



अमेरिकेचा हा आग्नेयेकडचा प्रदेश एकेकाळी खनिजसंपत्ती,मनुष्यबळ व

नवसंपत्ती या बाबतीत नशीबवान होता. आता तो आपल्या कर्तबगारीने

दरिद्री झाला होता. त्यात वंश-वर्ण-भेदांच्या झगडयांची भर. लोकांनी



पान नं. 131

या समुद्ध प्रदेशाच्या नेसर्गिक सुपीकतेची उपेक्षा केली. सुजलाम्

भूमीला वंधत्व आणले. अशा वेळी केवळ आपल्या बांधवांपुरतंच

आपलं काम मर्यादित न ठेवता साऱ्या दक्षिणेच्या अडचणी लक्षात

घेऊन प्रा. कार्व्हरनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दक्षिणेला

`स्वयंपूर्ण' बनविण्याच्या दृष्टीने संशोधन करीत राहिले. आपली

प्रयोगशाळा शेतकऱ्यांच्या शेतात, घरात नेली.



प्रा. कार्व्हरांची समाजसेवा स्थलकालाच्या बंधनांपासून मुक्त होती.

त्यांना खाजगी आयुष्य असं उरलंच नव्हतं आणि तसं ते उरू नये.

आपल्या अखंड समाजसेवेत बाधा येऊ नये, म्हणून ते अविवाहित

राहिले होते.



त्यांच्या बांधवांना त्यांची गरज होती ती मौजमजेसाठी नव्हे ! आपलं

जीवनमान सावरण्यासाठी !! आपल्या या कर्तव्यात प्रा. कार्व्हरनी

कधीच कसूर केली नाही.



अमेरिकेतील यादवी युद्दाच्या वेळी निग्रोतील साक्षरता प्रमाण 3% होते.

1910 साली ते 70 % झाले. या प्रगतीवर डॉ. वॉशिंग्टन आणि

कार्व्हर समाधानी नव्हते. शिक्षणाबाबतीत नवनवे प्रयोग चालूच होते.



आपला अभ्यासक्रम संपवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉ. वॉशिंग्टन

नेहमी उपदेश करीत असत,`तुम्ही जेथून आलात तिथेच परत जा.

पेसे मिळविण्यासाठी नोकरीचा शोध घेण्यात वेळ दवडू नका. पेसा न

मिळाला तरी बिनावेतन काम करा, पण कामाची संधी सोडू नका.'



आपल्या प्राचार्याचा बा उपदेश प्रा. कार्व्हरही शिरोधार्य मानीत.

सुट्टीचा उपयोग `शेती सुधार' योजनेचा वेग वाढविण्यासाठी करीत.

अशाच एका सुट्टीत त्यांनी `अलाबामातील अळंबी' वर लेख लिहून,

कृषिखात्यातर्फे भरविल्या गेलेल्या राष्ट्रीय प्रदर्शनात आंबळीचे शंभर



पान नं. 132

नमुने पाठविले. औषधी वनस्पतीवरील संशोधन प्रसिद्ध केले.

रोगनिवारक वनौषधींची जंत्री प्रसिध्द केली.



दुसऱ्या सुट्टीत `पॅन अमेहिकन मेडिकल कॉग्रेस' चे कोलॅबोरेटर म्हणून

ते वॉशिंग्टनला दाखल झाले. तेथे अमेरिकेतील औषधी वनस्पतींची

(Medica; flora) सूची तयार करण्याचे काम चालू होते. या सूचीसाठी

प्रा. कार्व्हरांनी दिलेली काही नावे तेथील तज्ञांना संपूर्णतः अपरिचित

होती. नावेही माहीत नव्हती. तर गुण कुठून माहीत असायला !





सुखिया जाला



पान नं. 204



जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांनी काळाच्या उदरात खोलवर मशागत

कली होती. उत्तम बी पेरलं होतं. त्याच्यावाढीची निगा राखली

होती. आता आत्यांतिक निकडीच्या वेळी त्यांच्या कार्याचं भरघोस फळ

मिळत होतं.



सारे जग दुसऱ्या (1940च्या ) महायुध्दात गुंतलं होतं. विघातक

शक्तीनी मानवतेला हादरवून टाकलं होतं. साराच तोल ढासळला

होता अशा वेळी आपल्या ज्ञानाने,संशोधनाने हा तोल साधण्याचे

कार्य डॉ कार्व्हर पार पाडीत होते.



डॉ. कार्व्हर लोकांना आपल्या भूमीवर प्रेम करायला शिकवीत होते !

तिच्याशी जवळीक साधायला शिकवीत होते !



अलबामातील त्यांच्या बांधवांजवळ काहीच नव्हते. काही मिळवायचं

म्हटलं तर लागणारी आवश्यक ती साधने उपलब्ध नव्हती. त्यांच्या-

जवळ होत्या भरपूर `गरजा' जी काही तुटपुंजी साधने जवळ होती

त्यांचाच उपयोग करून, त्या गरजांचा मागोवा घेत, डॉ. कार्व्हरनी

किमया केली. कपडयालत्त्याची सुबत्ता ! हे सारं कुठून मिळवलं ?

फक्त कापूस पिकवणं माहीत असलेल्या त्या रखरखीत जमिनीतून

कापूस साम्राज्याला शह दिला होता. भुईमूगा आणि रताळी यांनी !



अमेरिका रंगाच्या बाबतीत जर्मनीवर अवलंबून होती. महायुद्धाच्या

तणातणीत परस्पर संबंध बिघडले. जर्मनीकडून रंग मिळणे बंद झाले.

अमेरिकेतील उद्योगधंद्यावर संकट कोसळले. अशा वेळी डॉ. कार्व्हरनी

`वनस्पतीजन्य ' रंग तयार करून अमेरिकेला बहुमोल देणगी दिली.



पान नं. 205

29 पकारच्या वनस्पतींच्या पाने,फळे,खोडे,मूळ भागांपासून

पाचशे प्रकारचे रंग तयार करण्याचा भीम-पराक्रम त्यांनी केला. हे रंग

(Dyes) कापूस, लोकर, रेशीम,लिनन,चामडे यांवर वापरण्यासाठी

होते. उत्तम प्रकारचे आणि टिकाऊही !!



रंग बनविणाऱ्या एका मोठया कारखानदाराने त्यांचा हा भीमपराक्रम

पाहून, आपल्या उद्योगसमूहात येऊन काम स्वीकारण्याची विनंती

केली. सुसज्ज प्रयोग शाळा बांधून देण्याचं आश्वासन दिलं व सोबत

एक `कोरा' चेक ! पूर्वी अनेक वेळा घडले तेच याही वेळी ! चेक

साभार परत गेला. सोबत रंगाच्या पाचशे सत्तावीस कृती विनाशुल्क !



रंगाचे एवढे प्रकार शोधले जाऊनही दक्षिणेतल्या ग्रामीण भागाला ते

परवडण्यासारखे नव्हतेच. ओबड-धोबड, सच्छिद्र, जंगली लाकडाची

त्यांची घरे खूप रंग शोषून घेत. त्यामुळे टिकाऊपणा येत नव्हता. डॉ.

कार्व्हरांनी याची दखल घेतलीच.



मातीतून अनेक रंगद्रव्ये त्यांनी पूर्वीच शोधली होती. आळशीचे तेल

(Linseed Oil) त्यासाठी वाहक म्हणून वापरले जाई. परंतु हे तेल

गरिबांना न परवडणारे. यावर उपाय म्हणून त्यांनी टाकाऊ मोटार-

ऑईलचा वापर केला. त्याची परीक्षा घेतली. चाचणी म्हणून एका

विद्यार्थ्यीनीचे सहा कोसावरचे घरही रंगवून पाहिले, निश्चित खात्री

झाली. गरिबांना अत्यल्प किंमतीत सुरेख रंग मिळाले.



प्रकरण इथेच थांबले नाही. या रंगाचा वापर TVA आणि FSA

प्रकल्पातील स्वस्त घरयोजनेच्या कामी केला गेला. त्यासाठी टस्कगी

संस्थेला अनुदान देण्यात आले. `टस्कगी' त तयार झालेल्या रंगाने

14 TVA सुशोभित झाले. अल्पखर्चात `सौंदर्य साधनाचा 'धडा

टस्कगीने घालून दिला.



पान नं. 206

डॉ. कार्व्हर यांच्या सल्लाची फी एरवीसुद्धा पोस्टकार्डाला लागणाऱ्या

तीन सेंटस्च्या स्टॅम्प एवढीच असे. म्हणजे काय, तर पत्र पाठवून सल्ला

विचारण्यासाठी लागणारे टपाल-हशील !1940-42 च्या काळात

त्यांनी वृत्तपत्रातून `प्रा. कार्व्हर यांचा सल्ला' या सदरातून

वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. दुसऱ्या महायुध्दाच्या वेळी `टस्कगी

प्रायोगिक केंद्रा' तर्फे- `Nature's garden ford victory and peace'

या शीर्षकाखाली पत्रकं प्रसिद्ध केली. या पत्रकांतून अमेरिकेत जनतेला

अनेक रानफुले,रानगवत यांची ओळख करून दिली. त्यापासून पाककृती

कशा कराव्यात, त्यांची पौष्टिक आहारदृष्टया गुणवत्ता काय याची

जाणीव करून दिली.



फार पूर्वीपासून त्यांनी अमेरिकेतील रानगवतांचा अभ्यास सुरू केला

होता. `रानगवत म्हणजे चुकीच्या ठिकाणी उगवलेला भाजीपाला'

असे ते त्याचे वर्णन करीत. रानगवताच्या अडीचशे जाती शोधून त्यांची

वर्गवारीही त्यांनी केली होती. आता अधिक जोमाने त्यावर संशोधन

सुरू केले.



काळजीपूर्वक लागवडीच्या लाडाने नाजूक बनलेल्या पिकांपेक्षाही

स्वतःच्या ताकदीवर टिकून राहणाऱ्या रानगवताता अधिक जीवनसत्त्वे

असतात. त्यांना अधिक रूची असते. कुंपणाच्या संरक्षणात भीत भीत

वाढणाऱ्या वनस्पतीपेक्षाही कुंपणाबाहेर मोकळ्यावर वाढणाऱ्या

वनस्पतीत अधिक जोम असतो. त्यांची वाढही झपाटयाने होत असते.

त्यांना आयुष्यही भरपूर असते. त्यांच्याभोवती पिंगा घालीत, किडा-

मुंगीपासून संरक्षण देत त्यांची काळजी वाहावी लागत नाही. रोजच्या

अन्नपदार्थाच्या जागा या रानगवतापासून तयार होणारे पदार्थ घेऊ

शकतात.



टस्कगी शाळेच्या स्वयंपाकगृहात डॉ. कार्व्हरांच्या मार्गदर्शनाखाली

वरच्या वर्गातील मुली रानवनस्पतीची पाकसिद्धी करीत. मग ते

रूचकर आणि चवदार पदार्ख कोणकोणत्या वनस्पती पासून बनवले गेले



पान नं. 207

होते हे जाहीर करीत.



`जोपर्यंत अमेरिकेच्या धरणीवर रानगवत आणि रानवनस्पती उगवत

आहेत, तोपर्यंत अमेरिकेला उपासमारीचे संकट संभवत नाही. केवळ

अन्नाचीच नव्हे, तर औषधांची गरजही या वन्स्पती पुरवू शकतात.'



आजुबाजूला उपलब्ध असणाऱ्या वनौषधींचा उपयोग न करता, लोक

त्याच वनस्पतींपासून बनवलेली बाजारी औषधे बाहेरून का मागवतात

हे त्यांना न उलगडलेला कोडे होते.



`टस्कगी' संस्थेतील एक शिक्षक आपल्या वृध्द मातेच्या इच्छेखातर

डॉ. कार्व्हरांच्या भेटासाठी तिला घेऊन आले. त्या वेळी डॉक्टर

प्रयोगशाळेत वनौषधींवर संशोधन करीत होते. ती वृद्ध माता त्यांना

भेटायला प्रयोगशाळेत गेली. तेथे टेबलावर मांडून ठेवलेल्या अनेक

वनौषधींची घरगुती नावे व त्यांचे गण ती सहजगत्या त्यांना सांगू

लागली. शिक्षक बिचारे संकोचले.



डॉ. कार्व्हरनी आपल्या हातातलं काम बाजूला ठेवलं. वृद्ध मातेला

एका खुर्चीत बसवलं. शिक्षकाला खोळंबून न ठेवता वर्गावर पाठवलं.

मग गुलामीत अर्धे आयुष्य घालवलेल्या त्या वृद्ध मातेशी त्यांची

`वनौषधी व घरगुती उपाय' यावर बातचीत सुरू झाली. आजी-

बाईंनी आपलं `बटव्याचं' ज्ञान त्यांच्यासमोर उपडं केलं !



डॉ. कार्व्हरना समाधान वाटलं- `गेल्या काही वर्षात बऱ्याच जणांशी

चर्चा करण्याचा योग आला. पण या आजीबाईइतकं वनौषधी विषयीचं

ज्ञान त्यापेकी एकालाही नव्हतं.'



आजीबाईही खूष - `दक्षिण अमेरिकेवर जादूची कांडी फिरवणाऱ्या

या जादूगाराच्या नजरेतून `जडीबुटी' सुटली नाही बरं का ?'

पेसा अपुरा पडत होता. त्यांनी केलेले प्रयोग फायदेशीर ठरल्याने

पान नं. 208

नवीन आलेले पशुवेद्य डॉ. कार्व्हरांच्या कडे सल्ला मागायला जाण्यात

कमीपणा मानत. डॉ. कार्व्हर पशुवेद्य थोडेच होते. !पण एका वर्षी

कडक उन्हाच्या तडाख्यानं सहा जनावरे एकाच दिवशी मेली. मृत

जनावरांची शरीरे फाडून आजाराचे कारण शोधण्याचा प्रयत्न झाला.

गवत गोळा करून तपासण्यात आले. काहीच कळेना. शेवटी पशुवेद्य

डॉ. कार्व्हरांकडे गेले. जावंच लागलं. ""हं पूर्वी एकदा असंच घडलं

होतं. असाच दुष्काळ अन् असाच प्रदीर्घ उन्हाळा...""



""आम्ही उन्हाळ्याविषयी नाही, गायीविंषयी विचारत आहोत.""



""अर्थात..."" डॉ. कार्व्हर आपली पोतडी उचलून चालू पडले. पशु-

वेद्यांना उलगडा होईना. प्रखर उन्हाळ्यानं म्हाताऱ्याचं डोकं फिरलेलं

दिसतं, अशी वल्गना करीत ते गोठ्याकडे परतले.



गायरान तुडवून आल्याने वृद्ध कार्व्हर दमले होते. आपली पोतडी उपड

करत म्हणाले-

""हे तुमचं संकट !""

पशुवेद्यांना समजेना. या हिरव्या रानगवताचा संबंध लागेना.

""हे काय ?""



""रॅटल बॉक्स ! शास्त्रीय नाव Crotalaria कुंपणाभोवती हे

वाढतं. हिरव्या गवतात ते अलग ओळखता येत नाही. पण जेव्हा वनस्पती

आणि इतर गवत कोळपून जातात तेव्हा गाय हेच हिरवं रॅटल बॉक्स

खाते. ते चवीला रसदार आणि रूचक, पण विषारी !""



""मग आता काय करायचं ?""



""आणखी गाय मरायला नको असतील तर तुम्ही आणि तुमचे

विद्यार्थी बाहेर पडा, रॅटलबॉक्स वेचून काढा अन् नष्ट करा.""



आभाराचे शब्द ऐकण्यासही न थांबता डॉ. कार्व्हर निघून चालते झाले.



पान नं. 209

आणि आपल्या खोलीत जाऊन बुलेटिन लिहू लागले- रॅटल बॉक्स या

विषारी रानगवतावर !



प्रत्येक ऋतूत ते शाळेच्या परिसराची तपासणी करीत. आपल्या

हातांनी लावलेल्या झाडांची वाढ तपासत. झाडे खूप उंच झाली होती.

विस्तारली होती. आता या उतारवयात त्यांना झाडावर चढता येत

नसे. जवळून जाणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला ते हाक मारीत. हातात

करवत देऊन एखादी फांदी कापून टाकायला सांगत. बहुधा त्या फांदी-

वरची पाने वाळलेली असत. मुलेही अशी कामे मोठया आत्मीयतेने

करीत. डॉ. कार्व्हरांनी सांगितलेले काम हे ज्ञानात भर टाकणारेच

असे.



प्रत्येक झाडांच्या बुध्यावर डॉ. कार्व्हरांनी त्या झाडाच्या जातकुळाची

पाटटी लावलेली असे. टस्कगीतल्या रस्त्यांना दुतर्फा झाडं वाढलेली

दिसतात ती डॉ. कार्व्हरांच्या कृपेने. तशा पाटया लावून झाडांची

ओळख ठेवायची पद्धत आजही तिथे आहे.



त्यांची नजर द्रष्टयाची होती. काळाच्या पुढचं त्यांना दिसत होतं.

त्यांनी त्या दृष्टीने आखलेल्या योजना, मांडलेल्या कल्पना प्रत्यक्षात

उतरवायला अडचण पडे ती आजूबाजूच्या अदूरदृष्टीवाल्यांची. 1899

सालीच त्यांनी भूसंधारणाची योजना मंडली होती. वनसंपत्तीची राखण

व वृद्धी करणे आवश्यक कसे आहे हे सांगितले होते. परंतु ही योजना

प्रत्यक्षात उतरायला `ग्रेट डिप्रेशन' ची आपत्ती यावी लागली.

त्यानंतर सरकारने ती योजना विचारात घेतली. (1932-33 चा

काळ.)



`या जगात टाकाऊ असं काहीच नाही. सारे जपा. वेळेवर त्याचा



पान नं. 210

उपयोग होतो. या प्रा. कार्व्हर यांच्या बजावण्यावर साऱ्या अमेरिकेचे

लक्ष आता केंद्रित झाले होते.



डॉ. कार्व्हर यांच्या तंत्रशुध्द पद्धतीनुसार लागवडी केल्याने अमेरिकेत

प्रचंड प्रमाणावर शेती उत्पादन झाले होते. ते वाया जाऊ नये म्हणून

`अन्नःधान्य टिकविण्याच्या सुलभ पद्धती' त्यांनी शेतकऱ्यांना

शिकविल्या. अवजड शास्त्रीय भाषा व उपकरणे न वापरता अगदी

`वाळवा',`सुकवा',`उन्हं लावा ' अशा बोली भाषेत !! अनेक

प्रकारची फळे व भाज्या टिकविल्या जाऊ लागल्या. `पदार्थ दीर्घकाळ

सुस्थितीत टिकविण्याचे उपाय',`सोप्या पौष्टिक पाककृती' या

विषयांवर पत्रके काढली. साधा स्टोव्ह,तारेच्या जाळ्या,मच्छरदाणीचे

जाळीदार कापड, स्वच्छ सूर्यप्रकाश यांच्या साह्याने कोणते अन्नपदार्थ

टिकविता येतात याच्याही याद्या प्रसिध्द केल्या.



पहिल्या महायुद्धात डॉ. कार्व्हरांच्या रताळ्यांनी लोकांची आणि

सेनिकांची उपासमार टाळली. युद्धानंतर मोठया प्रमाणावर `निर्जली-

करण प्रकल्प' उभारला जाणार होता. तशी योजनाही आखली गेली.

होती-



पण तीही योजना प्रत्यक्षात उतरायला दुसरं महायुध्द यावं लागलं.

म्हणजे वीस वर्षाचा अवधी जावा लागला. आणि गंमत म्हणजे

निर्जलीकरणाच्या योजनेचे, तिच्या मागच्या कल्पनेचे श्रेय डॉ. कार्व्हरना

द्यायला लोक विसरून गेले होते. डॉ. कार्व्हरना मात्र त्याचे वेषम्य

वाटत नव्हते. श्रेय कोणी का घेईना, देशाला संकटकाळी आपला

थोडाफार उपयोग झाला याचेच त्यांना समाधान `भुईमूगाच्या

टरफलापासून जमीन भुसभुसीत बनवणारे खत तयार करता येते. त्या

टरफलापासून जमिनीला सेंद्रिय खत मिळते. तिची प्रत सुधारते. टर-

फलापासून बनवलेल्या कंडीशनरमध्ये आर्द्रता धारण करण्याची शक्ती

अधिक असून नायट्रोजन,पोटॅश,फॉस्फेट यांचेही प्रमाण त्यात अधिक

आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जर्मनीहून आयात केल्या जाणाऱ्या



पान नं. 211

पिटमॉस (Peat Moss) पेक्षा हे कंडिशनर अधिक उपयुक्त आहे.'



याही बाबतीत तेच झाले. असा प्रकल्प उभा राहायला 1940 साल

उजाडावं लागलं. मधल्या वीस वर्षात अमेरिकेत लाखो टन टरफलं

जाळली गेली.



ह्या अशा त्यांच्या अनेक गोष्टी. त्यांनी प्रयोगशाळेत यशस्वी करून

दाखविलेली उत्पादने बाजारपेठेत यायला वीस वर्षे जावी लागली.



1937 च्या सुमारास प्रा. कार्व्हर व सुप्रसिद्ध उद्योगपती हेन्री फोर्ड

यांची भेट झाली. रथी-महारथींची भेट ती. एक होता उपेक्षित, दलित

निग्रो समाजात जन्म घेतलेला, तर दुसरा होता समाजावर प्रभाव

टाकून असलेला धनत्तर कोटयधीश ! एक वय सोडलं तर कोणतंही

साम्य नव्हतं त्या दोघांत.



साम्य नव्हतं कसं ? दोघांचाही श्रमप्रतिष्ठेवर विश्वास होता. प्रयत्नावर

श्रध्दा होती.



`फोर्ड' मोटारीची निर्मिती करून हेन्री फोर्ड स्वस्थ बसले नव्हते.

नवनिर्मितीची जिद्द त्यांना अस्वस्थ करीत होती. काही तरी नवीन

घडवावं ही जाणीव टोचणी लावून होती. तशात डॉ. कार्व्हर यांचा

अविश्रांत परिश्रमातून साकारणाऱ्या समाजोन्नतीचा ध्यास त्यांच्या

कानी आला. वाट वाकडी करून फोर्डसाहेब टस्कगीला आले.



दोघेही परस्परांचा वकूब,परस्परांचे असीम कर्तृत्व ओळखून होते.

परस्परांविषयी आदरभाव ठेवून होते. पहिल्याच भेटीत अंतःकरणे खुली

झाली, अंतरीच्या खुणा पटल्या. हस्तांदोलन करताना दोघांच्याही मुद्रा

कशा कमालीच्या प्रफुल्लित झाल्या होत्या. !



हेन्री फोर्डना डॉ. कार्व्हर यांच्या निःस्पृह निर्विकल्प मनाचा मोठेपणा



पान नं. 212

जाणून घेण्यासाठी फार काळ जावा लागला नाही. ते दिसतात त्याही-

पेक्षा अधिक पटीने त्यांचं व्यक्तिमत्व विशाल आहे. या मुक्तात्म्याला

`गरज' कशाची ती नाहीच, याचा अनुभव फोर्डसाहेबांनाही आलाच.



`शाश्वत मूल्य पेशाच्या मोबदल्यात मिळत नसतात, किंबहुना पेशाच्या

मोबदल्यात जे विकत घेता येतं त्याला `शाश्वत मूल्य म्हणत नाहीत.'

हेन्री फोर्ड यांच्या या विधानाचे जिवंत उदाहरण म्हणजे डॉ. कार्व्हर !

पण ज्या परिस्थितीत, वातावरणात ते जगत होते, त्याने त्यांच्या

आचरणाचे मोल होत नव्हते. `काय बोलतो' यापेक्षा `कोण बोलतो'

याच्याकडेच लोकांचे अधिक लक्ष असते. भोवतालची परिस्थिती साथ

देणारी नसली की `असामान्य कर्तृत्व' लोकांच्या नजरेसमोर यायला

काळ जावा लागतो. तसंच काहीसं डॉ. कार्व्हर यांचं झालं होतं.



डियर बॉर्न येथे सोयाबीन्सची लागवड करून त्यापासून अनेक उपयुक्त

उत्पादने बनविण्यात श्री. फोर्ड यांनी यश मिळविले होते. डॉ. कार्व्हरना

फोर्ड साहेबांच्या या संशोधनाविशयी कमालीची उत्सुकता होती.

त्यामुळे त्यांनी पहिल्याच भेटीत `डियर बॉर्न' ला भेट देण्याचे आमंत्रण

स्वीकारले. आणि तेथून परतल्यावर आपल्या संशोधनांचा रोख

सोयाबीनवर वळवला.



लवकरच डॉ. कार्व्हरनी फोर्डना मोटारीचे काही सुटे भाग बनविण्यास

योग्य असे प्लॅस्टिक सोयाबीनपासून तयार करून दाखविले. तसेच

त्यांनी सोयाबीन्सपासून तयार केलेले तेल मोटारीसाठी वापराच्या

रंगाचे मूलाधार बनले.



फोर्डसाहेबांना आसा दक्षिणेची ओढ लागली होती. त्यांनी जॉर्जियात

बरीच जमीन खरीदली. तेथे मग `कृषि-संशोधन केन्द्र' उभारले.

काळ्या-गोऱ्यांना उद्योग मिळाला. कामगारांसाठी घरे उभारली.

त्यांच्या मुलांसाठी शाळा बांधल्या. एक शाळा डॉ. कार्व्हर यांच्या



पान नं. 213

नावे होती. डॉ. कार्व्र यांनी मातीपासून बनविलेल्या रंगाने तेथील

इमारती नटल्या.



टस्कगीला फोर्डसाहेबांच्या फेऱ्या वारंवार संस्थेकडे वळले. तेही टस्कगीला

भेट देऊ लागले.`टस्कगी' च्या अतिथ्यशील वागण्याने,शिस्तबद्ध

कारभाराने ते प्रभावित झाले. त्यांची सक्रिय सहानुभूती टस्कगीवा

मिळाली. टस्कगीला आर्धिक मदत मिळू लागली.



एकदा वृत्तपत्राद्वारे त्यांची एकत्रित मुलाखत घेतली गेली. श्री.

फोर्डनी आधीच त्यांना सांगून टाकलं.-"" तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं

डॉ. कार्व्हरच देतील. आमच्या दोघांचे विचार एकच असतात.""



एक निःस्पृह,निरिच्छ,कर्मयोगी सहकारी लाभला. म्हणून फोर्डना

समाधान,तर आपले स्वप्न वास्तवात साकारण्यासाठी आवश्यक ते

द्रष्टेपण आणि संपत्ती लाभलेला मित्र पाठीशी उभा राहिला म्हणून

डॉ. कार्व्हर खूष ! एक गर्भ-श्रीमंत तर दुसरा भूमिपुत्र, विश्वासा

स्वामी ! या दोघआंत आंतरिक भागीदारीबोरबर सामाजिक

जबाबदारीची भागीदारी झाली. कामं दुपटीने वाढली.



या दोन्ही महापुरूषांना त्यांच्या या उतारवयात जणू उत्साहाचं उधाण

आलं होतं. वेळाकाळाची पर्वा न करता कार्य चालू होतं. आपापल्या

नवनव्या कल्पना राबवून पाहात होते.



आपल्या ढासळत्या तब्येतीची फिकिर न करता ऐंशी वर्षआचे वृद्ध कार्व्हर

आपल्या मदतनिसाला-कर्टीसला-घेऊन डियर बॉर्नला हजर झाले. तेथे

फोर्डसाहेबांनी आपल्या मित्रासाठी खास प्रयोगशाळा उभारली होती.

त्या प्रयोगशाळेत टस्कगीतील `गुरूशिष्य' दाखल झाले.



पान नं. 214

`सांप्रती काय नवीन जन्म घेत आहे' या उत्सुकतेने वृत्तपत्रकार,

बातमीदार डियर प्रयोगशाळेभोवती घिरटया घालत होते.



एका- सुदिनी त्या प्रयोगशाळेत डॉ. कार्व्हर यांनी `कृत्रिम रबर'

जन्माला घातले.



`जन्म' शुभ नक्षत्रावरचा होता. स्वस्तात मुबलक रबर उपलब्ध होऊ

लागल्याने अमेरिकन उद्योजकांना रबरासाठी दुसऱ्या देशांच्या तोडांकडं

पाहण्याच कारण उरले नाही.



एका उन्हाळ्यात श्री.` फोर्ड मोटार' कारखान्यात प्रशिक्षण देण्यात आले. दक्षिणी

निग्रोंना स्थलांतर करून डेट्रॉईटला जाण्याची गरज आता उरली

नव्हती.



आपल्या धनाचा प्रभाव फोर्डसाहेब जाणून होते. इथं तर `काहीच

नको !' पण या भूमिपुत्राचं कौतुक करावं, अशी त्यांची इच्छा होती

त्यांनी डॉ. कार्व्हरना एक घर बांधून द्यायचे ठरविले. ते `घर' म्हणजे

एक प्रासादही होऊ शकला असता. पण नाही - डॉ. कार्व्हरना घर हवे

होतं ते त्यांच्या आईचं `डायमंड ग्रोव्ह' म्ध्ये होतं तसं साधं लाकडी

खोपट.



डॉ. कार्व्हरची मातृभक्ती पराहून फोर्डसाहेबांचं ह्दय भरून आलं. तेही

स्वतः माचृभक्तच होते.



उत्तमातील उत्तम वापरून `ग्रीनफील्ड' येथे `काव्हरभवन

उभारलं गेलं. डॉ. कार्व्हरना कोण आनंद ! एक साधी इच्छा पूर्ण



पान नं. 215

व्हायला किती काळ जावा लागला होता. वयाच्या ऐंशीच्या वर्षी

कार्व्हर आपल्या घरात राहायला गेले. घरात पाऊल टाकताना ते

क्षणभर थबकले. आईच्या स्मृतीने त्यांचे डोळे पाणावले.



फोर्डसाहेबांनी आपल्या मित्राला एक `खास भेट' दिली. फोर्ड-

साहेबांच्या मातेला तिच्या लग्नात माहेरून मिळालेल्या आहेरातील

एक कपबशी ` मातेची स्मृती' म्हणून त्यांनी जपून ठेवली होती. तीच

कपबशी ` मातेची स्मृती' म्हणून त्यांनी आपल्या दोस्ताला भेट दिली.

दोघंही थोर मातृभक्त.



1938 साली एका सभेत डॉ. कार्व्हरांचे व्याख्यान होते, एकाने

डॉ. कार्व्हरांशी ओळख करून दिली.-



""सॉक्रेटिसला आपण श्रेष्ठ तत्त्वज्ञानी समजतो, तो म्हणत असे की,

मला एवढचं माहीत आहे की, मला काहीच माहीत नाही. आज त्या

कसोटीला उतरणारी एकच व्यक्ती या जगात आहे, ती म्हणजे डॉ.

कार्व्हर ! त्यांनाही काहीच माहीत नाही. त्यांचे आईवडिलच काय,

पण त्यांची जन्मतारीखही त्यांना माहीत नाही. ज्ञानाच्या बाबतीत मते

एवढंच म्हणतात की सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान परमेश्वराकडून त्यांना

ज्ञान प्राप्त होते,""



यावर कार्व्हर मिष्किलपणे उद्गारले,""आज माझी खूप निराशा

झाली. सभेतून माझी ओळख करून दिली जाते तेव्हा पूर्वी माझ्याच

मला ज्ञात नसलेल्या कितीतरी गोष्टी नव्यानेच समजतात. आज मला

तसे काहीच समजले नाही.""



पण खरं म्हणजे आता त्यांना आपल्या व्यक्तिगत पूर्वतिहासाचे काहीच

वेषम्य वाटत नव्हते. त्यांनी आपल्या समाजाला अनेक प्रकारच्या

दास्यत्वातून-आर्थिक,शेक्षणिक,काही अंशी सामाजिक-मुक्त करण्यात



पान नं. 216`'`'``'`'`'`'

यश मिळवलं होतं. त्यांच्या पूर्वजांचा हिशोब कधीच लागणार नव्हत

त्यांचं नाव तरी स्वतःचं कुठं होतं ? पण भविष्यकाळ मात्र ही उणी

भरून काढणार होता. इतिहासात त्यांना अढळस्थान मिळालं होतं.



त्यांना टस्कगीत येऊन चाळीसहून अधिक वर्षे झाली होती. लोकांनी

त्यानिमित्त समारंभ करण्याचे ठरविले. डॉ. कार्व्हरांच्या विरोधाला न

जुमानता त्यांनी 2000 डॉलर्सचा निधी गोळा करून डॉ. कार्व्हरांचा

ब्रॉन्झचा अर्धपुतळी तयार करवला. आपल्याला भुकेच्या खाईतून वर

खेचणाऱ्या आपल्या या बांधवाविषयी त्या लोकांना कृतज्ञता व्यक्त

करायची होती. 2 जून 1937 रोजी त्या पुतळ्याचे अनावरण

करण्यात आले. लोक त्यांना भेटत होते. डॉक्टरांच्या अंगावर तोच

सूट होता. वर्गमित्रांनी प्रेमाने चढवलेला. वार्धक्याने झुकलेले कार्व्हर

भरल्या नजरेने साऱ्यांशी बोलत होते. अगत्याने चौकशी करत होते.



रसायनशास्त्राच्या असाधारण वापराने त्यांनी अमेरिकेचे जीवनमान

उन्नत केले. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून 1939 साली

त्यांना `रूझवेल्ट पदक' अर्पण करण्यात आले.



1940 साली फ्रँकलीन डी. रूझवेल्ट यांनी टस्कगीला भेट दिली.

त्या वेळी वृद्ध कार्व्हरना ते म्हणाले-



""तुम्ही एक थोर `अमेरिकन' आहात. तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेत

जे घडवलं त्याने अवघ्या राष्ट्राला बळकटी मिळाली. शक्ती मिळाली.



1940 सालापर्यंत टस्कगी शाळेच्या इमारतींची संख्या 83 झाली.

होती. 200 विद्याविभागात मिळून 2000 विद्यार्थी शिक्षण घेत होते.

डॉक्टरांच्या अंगावर अजूनही तोच कोट होता. या हिवाळ्यात मात्र

त्यांचे सहकारी श्री. हॅरि अँबट यांनी 125 डॉलर्स खर्चून नवा कोट

आणला. डॉ. कार्व्हरांनी तो अंगावर चढवायला नकार दिला. मग श्री.



पान नं. 217 शब्द :-1238



अँबटनी हुकमी एक्का वापरला- ""सर, या कोटाला 125 डॉलर्स पडले.

ते पेसे तुम्ही `फुकट' घालवणार का ?""

उभ्या आयुष्यात आपल्या कपडयावर सगळे मिळून 125 डॉलर्स खर्च

न केलेल्या प्रा. कार्व्हरनी तो कोट अंगावर चढवला.



असे काही प्रसंग सोडले तर त्यांचे बाकी सारे साधेच असे. पहाटे

चारपूर्वी उठून, फिरून आले की त्यांचे काम सुरू होई ते चांगले

अंधारून येईपर्यंत. आत्यंतिक निकड असेल तेव्हा रात्र रात्र संशोधनाचे

काम चालू असायचे. त्यांची प्रयोगशाळाही साधीच. प्रयोगाची साधनेही

साधीच. त्यांना बघायला येणाऱ्यांची सतत रीघ लागलेली असे. त्यांचे

ते अज्ञानाचे प्रदर्शन करणारे `चौकस' प्रश्न ऐकून डॉ.

कार्व्हरांच्या साध्या उपकरणांची अपूर्वाई वाटणारे `बघे' त्यांची

उपकरणे पळवत. एखादं मडकं दुधाची फुटकी बाटली किंवा असलंच

काही तरी. डॉ. कार्व्हरांना मात्र हे कोडं उलगडत नसे. `इथून असल्या

वस्तू उचलून नेण्यापेक्षा कमी कष्टात त्यांना त्यांच्या घरी नाही का

मिळणार त्या ? मग हा उपद््व्याप का ? ' मग पुन्हा बिचारे डबे

बाटल्या, मडकी गोळा करून आपली उपकरणं बनवीत. पण डॉ.

कार्व्हरांना हे कसं कळावं की त्यांच्या हातची असली `अधिकृत'

उपकरणे पळवण्यात त्या बघ्यांना प्रोढी वाटत असे.



कोणाला त्यांच्या उपकरणाविषयी कुतूहल, तर कोणाल त्यांच्या

निःस्पृहतेबद्दल. ते पगार वाढ घेत नाहीत. संशोधनाचं मानधन घेत

नाहीत, याचे अनेकांना आश्चर्य वाटे. डॉ. कार्व्हरांना लोकांना याचं

का आश्चर्य वाटतं याचं गूढ वाटे. ते म्हणत, ""ईश्वरदत्त देणगीबद्दल

मी लोकांकडून बक्षीस का घ्यावं ?"" यावर `अर्थदास' म्हणे ""तुम्ही

जर असे पेसे घेतले असलेत तर त्याचा विनियोग तुमच्याच बांधवांसाठी

नसता का करता आला ?""



""मी पेशाच्या मागे लागलो तर माझ्या बांधवांना विसरून गेलो

असतो...""



पान नं. 218

ऑस्टिन कर्टीसने बरीच धावपळ करून एक योजना आखली. डॉ.

कार्व्हर यांचे गेल्या पन्नास वर्षातील कार्याचे दर्शन भावी पिढयांना

घडावे, म्हणून `कार्व्हर संग्रहालय' उभारण्याच्या कामी तो लागला.

भुईमूग,रताळी,रानगवत,टाकाऊ वस्तू, कंदमुळं,हस्तकला,झालरी

(लेसेस्),विणकाम इ. अनेक विषयांवरील त्यांच्या कृती तेथे हारीने

मांडल्या गेल्या. तशीच त्यांची चित्रे ! अलाबामाची माती व आपल्या

हाताची बोटं एवढया साधनांनी उत्कृष्ट चित्रे कशी साकारता येतात,

हे आपल्या विद्यार्थ्यांना दाखवून देण्यासाठी तयार केलेल्या कलाकृती

तेथे मांडल्या गेल्या. (याच चित्रांपेकी एक चित्र पॅरिसच्या लुक्झेंबर्ग

गॅलरीने विकत घेतले.)



हे `कार्व्हर संग्रहालय' केवळ गतेतिहासाची जंत्री बनू नये, तर

भविष्यकाल घडविण्याचे शिक्षण घेण्याचे साधन बनावे, दक्षिणेच्या

भविष्याचा संदर्भ म्हणून त्याचा उपयोग व्हावा, अशा पध्दतीने

संग्रहालयाची उभारणी केली गेली.



विज्ञानशाखेत निग्रो मुलांनी कितीही हुशारी दाखवली तरी स्वतःच्या

उत्कर्षासाठी त्यांना त्या अभ्यासाचा उपयोग करता येत नसे. पदवी

घेऊन बाहेर पडलेल्या निग्रो केमिस्टला सौन्दर्य-प्रसाधने किंवा फार

तर एखादं दुसरं `पेटंट औषध' तयार करण्यापलीकडे अन्य काही

बनविण्यास वाव नसे. व्यावसायिक प्रयोगशाळांतून ""निग्रोंना मज्जाव""

अशा अलिखित पाटया. काही ठिकाणी तर कायद्याने बंदी. अशा

परिस्थितीत मोठया कष्टाने आत्मसात केलेले ज्ञान त्या खऱ्या अर्थाने

वापरून पाहता येत नसे. त्यामुळे साहजिकच पुढे. निरूपयोगी ठरणाऱ्या

या विषयाकडे विद्यार्थ्याचा ओढा कमी झाला. हा फार मोठा धोका

होता हुशारमुलांची बुद्धी वाया जाणार होती. डॉ. कार्व्हरांनी इलाज

शोधला कार्व्हर-प्रतिष्ठान स्थापण्यात आले.



पान नं. 219

`मी जॉर्ज डब्लू. कार्व्हर, स्वतः उभारलेले कार्व्हर-प्रतिष्ठान' माझ्या

जवळच्या मिळकतीसह(तेहेतीसहजार डॉलर्स) टस्कगी संस्थेला

अर्पण करीत आहे.' वृत्तपत्रातील ही बातमी साऱ्या जगाला अवाक्

करून गेली.



हे प्रतिष्ठान उभारण्यचा त्यांचे स्वप्न साकार करण्यात अनेकांचा

हातभार लागला. जवळ जवळ दोन लाख डॉलर्स किंमतीची वास्तू

उभी राहिली. हजारो संशोधकांना,विद्यार्थ्यांना तिचा लाभ मिळाला.

विज्ञान विषयात गती असणाऱ्या मुलांना,प्रगत अभ्यासक्रमात प्रयोग-

शाळेची उणीव भासू नये, म्हणून आपल्या आयुष्यभराची साठवण

खर्च करून त्यांनी हे प्रतिष्ठान उभारले.



उजाड माळावर फुलबाग फुलविल्याबद्दल,आपले हात केवळ निर्मिती-

साठी वापरल्याबद्दल डॉ. वॉशिग्टनला दिलेल्या वचनाची पूर्तता

केल्याबद्दल त्यांना संस्थेने जे काही मानधन दिले होते, तेही त्यांनी

संस्थेला साभार परत केले होते. कारण ते जाणून होते-काळाच्या

उदरात त्यांनी उत्तम बी पेरलं होतं. डोळस कष्टाच्या खतपाण्याने

अंकुरलेल्या कार्यानं मूळ धरलं होतं. नवीन धुमारे फुटत होते. लवकर

फळे लागणार होती.



त्यांच्या द्रष्टेपणाचं,कार्यरत वृत्तीचं कौतुक करणारा, त्यांच्या लोकोत्तर

समाजसेवेचं गुणगान करणारा जेव्हा त्यांचे आभार मानू लागे तेव्हा ते

विनयानं म्हणत.-



""माझी नाहीतर आणखी कोणाची नियुक्ती या कामी करून देवानं

आपलं काम करवून घेतलं असतंच. त्यानं माझी निवड केली यात माझी

प्रशंसा करण्याजोगं काय आहे !""



खरंच, अशा गुणी माणसाची नियुक्ती करून देवानं स्वतःचं देवपण

राखलं होतं.



पान नं. 220

अविरत चार तपे परिश्रम घेतल्याच्या खुणा आता त्यांच्या शरीरावर

चांगल्याच दिसत होत्या. कर्टीस शक्यतो त्यांना एकटे राहू देत नसे.

जेव्हा त्यांना कामामिनित्त बाहेर जावे लागे तेव्हा, त्यांची देखभाल

इतर विद्यार्थी करत. त्यांची जाग घ्यायला मधून मधून प्रयोग-शाळेत

डोकावत. या देखभालीचा डॉ. कार्व्हरना व्यत्यय व्हायचा.



`ही ये जा सहन करायचीच असती, तर मी लग्न नसतं का केलं ?'



मग विद्यार्थ्यांनी सुचवलं,प्रयोगशाळेत दाराला एक छोटे काचेचे

तावदान बसवा. म्हणजे आण्ही बाहेरूनच तुमची जाग घेऊ. मग त्यांनी

ती सोय करून दिली.



1935 च्या सुमारास ते बरेच आजारी झाले होते. अँनिमियचा खूप

त्रास झाला. पण त्यातून ते सावरले अन् पुन्हा कामाला लागले होते.

उतारवय आणि नुकतंच येऊन गेलंल आजारपण यामुळे ते थकले होते.

`म्युझियम' आणि `फाऊडेशन' कडची ये-जा करण्याचा त्रास कमी

व्हावा म्हणून नजीकचे निवासस्थान त्यांना देण्यात आले.



त्यांच्या उतारवयाकडे आणि थकत चाललेल्या शरीराकडे पाहून हेन्री

फोर्ड यांनी त्यांच्या निवासस्थानी लिफ्ट बसवून दिली. जिना चढण्या-

उतरण्याचा त्रास तेवढाच कमी व्हावा म्हणून डॉ. कार्व्हरांना त्या

लिफ्टचं एवढं कौतुक वाटे की, त्यांना भेटायला येणाऱ्यांना ती लिफ्ट

दाखविल्याशिवाय त्यांना चेन पडत नसे.



डॉ. कार्व्हरचं नाव घेतल्याखेरीच वृत्तपत्रवाल्यांना आत दिवस उजाडत

नव्हता. या महात्म्याला एकदा `पाहून घेण्याचं' पुण्य लाभावं म्हणून

बरेच वारकरी टस्कगीला येत. पण वार्धक्याने थकलेल्या कार्व्हरना

आता जनसंपर्क नको असे. स्वतःला प्रदर्शनीय वस्तू बनविणे तर

मुळीच नको असे. आपल्या लाजऱ्या-बुजऱ्या वृत्तीवर मात करणे

त्यांना कधीच जमले नाही. तेव्हा या `वारकऱ्यांपासून दूर राहण्या-

साठी भोजनाच्या वेळीही ते भोजनगृहात न जाता स्वयंपाकगृहात



पान नं. 221

एका कोपऱ्यात पडद्याच्या आडोशाने उरकत. तिथे त्यांचा संपर्क

येई ते स्वयंपाकघर सांभाळणाऱ्या विद्यार्थ्याबरोबर. त्याच्याशी मात्र

ते मोकळेपणानं हास्यविनोद करीत. दुर्मिळ क्षण वेचण्यासाठी, त्यांच्या

सहवासाचा आंनद लुटण्यासाठी विद्यार्थी स्वयंपाकगृह सांभाळण्याचे

काम आपणहून मागून घेत. आकाशवाणीवरच्या भाषणातून किंवा

सभा-व्याख्यानातून न सांगितल्या गेलेल्या अनेक गोष्टी ते मुलांना

सांगत. आपल्या विद्यार्थिदशेतील अनुभव सांगून त्यांना शहाणे करत.

धोक्याचे कंदिल दाखवत. रोज काही ना काही सांगून त्यांचे ज्ञान व

त्यांचा आत्मवशिव्सा वृद्धिंगत करत.



बाहेरचं जग मात्र डॉ. कार्व्हरना आता असं एकाकी ठेवायला राजी

नव्हतं. `इंटर नॅशनल फेडरेशन ऑफ आर्किटेक्टस्,इंजिनिअर्स,

केमिस्टस अँन्ड टेक्निशिअन्स' या संघटनेने त्यांची `194- सालचा

महामानव ' म्हणून निवड केली.



`दक्षिणेतील `सुंदर विषयाचे ' उत्तम चित्र काढल्याबद्दल चित्रकार

बेन्सफादर यांना बेंजामीन पारितोषिकाचे अडीचशे डॉलर्स बक्षिस

देण्यात आले ' वृत्तपत्राच्या मधल्या पानावर बातमी होती. सोबत त्या

सुंदर विषयाचा फोटो होता. तो फोटो होता नीटनेटका आणि

रूबाबदार पोषाख केलेल्या डॉ. कार्व्हर यांचा दक्षिणेतील सुंदर

विषय !!!



त्या दिवशी डॉ. कार्व्हर खुशीत होते ! त्यांचं चित्र काढणाऱ्या पोराला

प्रोत्साहन मिळालं होतं म्हणून !



टस्कगीत आताशी चित्रपट निर्मात्यांची धावपळ चालू होती. त्यांच्या

आयुष्यावर चित्रीकरण चालू होते. आपल्या ढासळत्या प्रकृतीकडे

दुर्लक्ष करून ते त्यांना सहकार्य देत होते. एखाद्या होतकरू पोराला

त्यामुळे पुढे यायला प्रोत्साहनच मिळणार होते नाही का ?



पान नं. 222

आता त्यांचा बहुतेक सारा कारभार खोलीतल्या खोलीत चाले. फारच

क्वचित ते प्रयोगशाळेत जात.



1942 साली कॉग्रेस पक्षाने ठराव मांडला- मोझेस कार्व्हरच्या घरा-

मागचं ते लाकडी खोपटं `राष्ट्रीय स्मारक' म्हणून जाहीर करण्यात

आले.





`महानिर्वाण'

पान नं. 223



टस्कगीचं वातावरण गेले काही दिवस जरा उदासच भासत होते. दोन

आठवडयांपूर्वी पोर्चबाहेरच्या बर्फावरून डॉ. कार्व्हरांचा पाय घसरला.

जवळून जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना सावरलं. त्यांच्या सांगण्यावरून

प्रयोगशाळेत घेऊन गेले. कर्टीसशी बातचीत केली. णग आपल्या खोलीत

परतले ते पुन्हा बाहेर न येण्यासाठीच. सारी टस्कगी चिंताग्रस्त होती.



डॉ. कार्व्हरनी पडल्यापडल्या निरवानिरव करण्यास सुरूवात केली होती.

संस्थेचे अध्यक्ष पॅटरसन यांना बोलावून त्यांच्या हाती `राष्ट्रीय बचत

योजने' च्या रोख्याचे पेसे दिले- `हे प्रतिष्ठानच्या कामी वापरा आणि

जगाला कळू द्या, मी हे मुद्दाम विकत घेतले होते. देशभक्ती ही

कोणत्याही वर्णाची ठेकेदारी नाही. ती बंधनातीत आहे...""



शेवटपर्यंत ते आपल्या कामाची व्यवस्था लावू देत होते. सवड मिळेल

तेव्हा मारियाआत्याने दिलेलं कातडी बांधणीचं बायबल उघडून वाचत

होते.



बायबल उघडताना त्यांना मारियाआत्या समोर दिसत होती. तिने

घातलेली आण... खूप खूप शीक आणि तुझ्या ज्ञानाचा उपयोग

तुझ्या बांधवांसाठी कर...



चित्रकार किंवा संगीतकार व्हायचं होतं.. बाकी त्या हौशी भागवून

घेतल्याच जमतील तशा... हे जातिवंत माळ्याचे हात...यायगरला



पान नं. 224

आवडलेले...आपल्या बांधवांचं जीवन सुसह्य करण्यासाठी खूप

धडपडले.



पाऊस कसा पानापानांतून ठिबकतोय. अलगद हिरव्या धरित्रीवर

उतरतोय. हलकेच जिरतोय. कुठे गेला त्याचा आक्रस्ताळेपणा... ही

खिडकीतून डोकावणारी फांदी तर नात्याचीच आहे. फार पूर्वी

लावलेल्या रोपांपेकी हे एक. केवढं उंच वाढलंय, डेरेदारपण झालंय...

डॉ. वॉशिंग्टन, आज तुम्ही हवे होतात. साधी हिरवळ रूजली,तर किती

आनंद झाला होता...आता हे सूर्याचे किरण अंगावर पडू न देणारे

टस्कगीचे रस्ते अन्, हा पर्णाच्छादित अलाबाम पाहून किती आनंदला

असता तुम्ही !



चर्चमधल्या ऑर्गनचे सूर वातावरणात भरून राहिलेत. मिलहॉलंडबाई

पण पिआनो काय सुरेख वाजवायची, पण तिचं वादन ऐकताना का

कुणास ठाऊक, खूप रडू आलं होतं. खरं म्हणजे संगीताने मन कसं

शांत व्हावं... अगदी आता वाटतं तसं...



अंधार पडू लागलाय. हवेत गारवा वाढतोय... या कोटानं बरीच वर्षे

ऊब दिली. काय उत्साहानं त्या मुलांनी माझ्या अंगावर चढवला होता

हा ! नाही तरी अशा कोटांची ऊब काही वेगळीच.. सुखद...



जिमदादाचं हे एवढंच रूप लक्षात... कधी तरी नेओशाच्या जत्रेत

काढलेला फोटो... बाकी हा नशीबवान...कशी होती कुणास

ठाऊक, पण याला निदान आई म्हणून हाक तरी मारायला मिळाली.



कशाचीच आस नव्हती. एका परेश्वराशिवाय कोणाची बांधिलकी

नव्हती. एका भूमीखेरीच कोणाशीच जवळीक नव्हती. अखंड पोरके-

पणानं सावलीसारखी सोबत केली होती....



पान नं. 225

स्वतःचं `काहीच' नसलेला हा मुक्तात्मा साऱ्या जगाला उधळून आता

पंचत्त्वात निघाला होता.



टस्कगीनं त्यांचा अखेरचा श्वास ऐकला 5 जून 1943.